नसरापूर येथे चार वर्षीय चिमुकलीवरील अत्याचारानंतर हत्या; आरोपी अटकेत, ग्रामस्थ संतप्त

नसरापूर: येथील राम मंदिर परिसरातून शुक्रवारी दुपारी बेपत्ता झालेल्या चार वर्षीय चिमुकलीचा मृतदेह सायंकाळी संशयास्पद अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका ६५ वर्षीय संशयिताला ताब्यात घेतले असून, घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चिमुकली दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास मंदिराजवळ खेळताना दिसली होती. त्यानंतर ती […]

अधिक वाचा..

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील शब्दवीर आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांचा टोकदार वार

मुंबई: “मुंबई महाराष्ट्राची कधीच होणार नाही!” ही घोषणा त्या काळातील केवळ राजकीय भूमिका नव्हती, तर मराठी अस्मितेवर केलेला उघड प्रहार होता. तत्कालीन सत्ताधीश स. का. पाटील आणि मोरारजी देसाई यांनी अशा गर्विष्ठ वक्तव्यांद्वारे महाराष्ट्राच्या भावनांना आव्हान दिले होते. मात्र महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला धक्का बसला की तो तीव्रपणे उभा राहतो, हे त्यांनी दुर्लक्षित केले. या पार्श्वभूमीवर आचार्य […]

अधिक वाचा..

ठाण्यात पहिली इलेक्ट्रिक डबल डेकर बस सुरू; प्रवास होणार अधिक सुखकर

ठाणे: ठाणे महानगरातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी महापालिका भवन ते लुईसवाडी आणि पुन्हा महापालिका भवन असा प्रवास या बसमधून करत सुविधेची पाहणी केली. या प्रसंगी महापौर शर्मिला पिंपळोलकर, महापालिका आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपमहापौर कृष्णा पाटील आदी […]

अधिक वाचा..

सातारा जिल्ह्याला राज्यात अव्वल करण्यासाठी कटिबद्ध; पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा: महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाया घालणारे यशवंतराव चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत सातारा जिल्ह्याला राज्यात अव्वल स्थानावर नेण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त साताऱ्यातील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल येथे राष्ट्रध्वजवंदनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी पालकमंत्री देसाई बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाधिकारी […]

अधिक वाचा..

महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली; आम्ही ती वेगाने कनेक्ट केली; एकनाथ शिंदे

रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली नाही, तर विकासाला वेग देणारी नवी कनेक्टिव्हिटी निर्माण केली,” असा घणाघाती हल्ला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. या प्रकल्पामुळे घाटातील ट्रॅफिक जामची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होणार […]

अधिक वाचा..

पुरोगामी महाराष्ट्राचा गायपट्टा करण्याचा सत्ताधा-यांचा डाव; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत धर्मांमध्ये भांडवणे लावण्याचे कारस्थान सुरु आहे, आपण सर्वांनी मिळून हा कुटील डाव हाणून पाडण्याची आवश्यकता असून महाराष्ट्र धर्माचे रक्षण करण्याचा संकल्प आजच्या दिवशी करू असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. महाराष्ट्र दिनानिमित्त दादर येथील टिळक भवन येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या […]

अधिक वाचा..

१०७ हुतात्म्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र कुठे? कामगार, भाषा आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर प्रश्नचिन्ह

महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सामाजिक, आर्थिक आणि कामगार क्षेत्रातील स्थितीवर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०७ हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानातून उभा राहिलेला महाराष्ट्र आज त्यांच्या स्वप्नांप्रमाणे घडतो आहे का, यावर चर्चा रंगत आहे. राज्यात […]

अधिक वाचा..

पत्नी खून प्रकरणात दत्तात्रय गायकवाड निर्दोष; परिस्थितीजन्य पुरावे ठरले अपुरे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय गायकवाड यांची मा. न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. जवळपास सहा वर्षे चाललेल्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर मा. अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी उपलब्ध पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि कायदेशीर बाबींचा सखोल विचार करून हा निकाल दिला. या प्रकरणात दत्तात्रय गायकवाड यांच्यावर […]

अधिक वाचा..

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. तंत्रज्ञान व पायाभूत सुविधांच्या विकासामुळे रोजगाराच्या संधी वाढत असल्या, तरी नव्या कामगार कायद्यांमुळे कामगारांच्या हक्कांबाबत अनिश्चितता निर्माण झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्रात असंघटित क्षेत्रातील कामगारांची संख्या मोठी असून, ई-श्रम पोर्टलवर सुमारे १.८३ कोटी कामगारांची नोंदणी झाली आहे. यात महिलांचे प्रमाण […]

अधिक वाचा..

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व सविस्तर चर्चा पार पडली असून, सर्व निवडणुका एकसंघपणे लढण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. विधान परिषद निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी दिली. गांधी भवन येथे झालेल्या […]

अधिक वाचा..