दरडग्रस्त भागांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे नागरिकांच्या जीवित व मालमत्तेला निर्माण झालेल्या गंभीर धोक्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) तर्फे मुंबई उपनगराचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. यावेळी पक्षाचे प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले, महाराष्ट्र प्रदेश […]

अधिक वाचा..

डिजिटल परिवर्तनामुळे तंत्रशिक्षण प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम; ई-गव्हर्नन्स पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रात प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम, उत्तरदायी आणि डेटा-आधारित करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आलेल्या विविध डिजिटल उपक्रमांची माहिती देणाऱ्या ‘ई-गव्हर्नन्स’ पुस्तिकेचे प्रकाशन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री Chandrakant Patil यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमांमुळे राज्यातील सुमारे २,२०० तंत्रशिक्षण संस्था, ६ हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचारी आणि लाखो विद्यार्थ्यांना थेट लाभ होत आहे. गेल्या तीन वर्षांत […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात सामाईक इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या भावाकडून मारहाण

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या भावासह वहिनीने शेतकऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप कारभारी कोळपे (वय ३८, रा. गुनाट, ता. शिरुर, जि.पुणे) यांनी याबाबत फिर्याद दिली असुन ७ जून २०२६ […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यातील भीषण अपघातात पत्नीच्या मृत्यू प्रकरणी; पतीवर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी कार चालक असलेल्या तिच्याच पतीविरुद्ध शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेदरकारपणे व निष्काळजीपणे वाहन चालविल्याने हा अपघात घडल्याचा निष्कर्ष तपासात समोर आल्यानंतर पोलिसांनी हि कारवाई केली आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास नानाभाऊ इथापे (रा. गणेश […]

अधिक वाचा..

भाजलेल्या हरभऱ्याचे फायदे

चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून वाचवता येते. भाजलेल्या हरभऱ्याचा वजन कमी करण्यासाठी आहारात समावेश करावा. याचे नियमित सेवन केल्याने रक्तातील साखर आणि मधुमेह नियंत्रणात राहतो. याशिवाय हाडांना निरोगी ठेवण्यास मदत होते. हृदयासाठीही ते फायदेशीर आहे. पोटाची समस्या असो किंवा वाढलेल्या वजनाची समस्या, भाजलेले हरभरे खाल्ल्याने […]

अधिक वाचा..

जेवण केल्यावर लगेच टॉयलेटला जावं लागतं का? वाचा ‘हे’ नॉर्मल की एखाद्या आजाराचा संकेत

सकाळी टॉयलेटला जाऊन पोट साफ करणं ही एक नॅचरल प्रोसेस आहे. शरीर निरोगी ठेवण्यासाठी ही क्रिया गरजेची असते. ही क्रिया पचन तंत्राचा महत्वाचा भाग आहे, ज्यामुळे शरीरातून अपशिष्ट पदार्थ बाहेर निघतात. एक निरोगी व्यक्ती रोज टॉयलेटला जाते. त्याशिवाय दिवसातून दोन वेळा आणि आठवड्यातून तीन वेळ संडासला जाणं सामान्य मानलं जातं. पण असे बरेच लोक असतात, […]

अधिक वाचा..

पावसाळ्यात मुंबईत शून्य जिवितहानीचे उद्दिष्ट; यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: पावसाळ्यात मुंबई आणि महानगर परिसरात शून्य जिवितहानी हे उद्दिष्ट ठेवून सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुंबई आणि परिसरातील पावसाळापूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत त्यांनी प्रशासनाला विविध सूचना केल्या. दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीस मुंबई महापालिका, रेल्वे, पोलीस, सिडको, म्हाडा, एमएमआरडीए, एसआरए, तटरक्षक दल, नौदल, एनडीआरएफ आणि बेस्ट […]

अधिक वाचा..

विद्याधाम विद्यालयात प्रवेशोत्सवाचा उत्साहपूर्ण जल्लोष

शिक्षण सहसंचालक हरून आतार यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन पाबळ (सुनिल जिते): नवशैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी कान्हूर मेसाई येथील विद्याधाम विद्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाचे शिक्षण सहसंचालक हरून आतार यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत नवागत विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विद्यालय परिसर आकर्षक […]

अधिक वाचा..

शिरुर तालुका हादरला; नातवाकडून ८५ वर्षीय वयोवृद्ध आजोबांचा खून

न्हावरे (ओमकार भोरडे) शेतातील कामे करण्यास सांगितल्याच्या किरकोळ कारणावरुन संतापलेल्या एका 26 वर्षीय नातवाने आपल्या 84 वर्षीय आजोबांवर लोखंडी गजाने जीवघेणा हल्ला करुन त्यांची निघृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शिरुर तालुक्यातील बाभुळसर बुद्रुक येथे सोमवार (दि 15) रोजी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, शिरुर पोलिसांनी आरोपी नातवाला अवघ्या काही तासांत ताब्यात […]

अधिक वाचा..

‘ओबीसी आमचा डीएनए आहे’ म्हणणारे भाजप सरकार ओबीसी विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत इतके उदासीन का?

मुंबई: निवडणुकांच्या वेळी ओबीसी समाजाच्या दारात जाऊन मतांची याचना करायची आणि सत्ता मिळाल्यानंतर शिक्षण, वसतिगृहे, शिष्यवृत्ती, भत्ते आणि प्रशिक्षण योजनांमध्ये त्यांच्याच मुलांना डावलायचे, ही कोणती सामाजिक न्यायाची भूमिका आहे? राज्यातील सर्वात मोठा समाजघटक असलेल्या ओबीसी समाजाला योजनांच्या लाभात कायम दुय्यम स्थान का दिले जाते? जाहिरातींवर हजारो कोटी रुपये खर्च करणाऱ्या सरकारकडे ओबीसी विद्यार्थ्यांसाठी आवश्यक निधी […]

अधिक वाचा..