शिरूरमध्ये अवैध गोहत्या प्रकरणातील सराईत आरोपी एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात अवैधपणे गोहत्या करून गोमांस विक्री करणाऱ्या तसेच वारंवार गंभीर गुन्ह्यांत सहभागी असलेल्या एका सराईत आरोपीवर कठोर कारवाई करत त्याला एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. पोलिसांनी शोधमोहीम राबवून आरोपीला ताब्यात घेत अकोला मध्यवर्ती कारागृहात दाखल केले असून या कारवाईमुळे परिसरातील गुन्हेगारी प्रवृत्तींना मोठा धक्का बसला आहे. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक […]

अधिक वाचा..

औरंगाबादात ‘हायड्रो गांजा’चे जाळे उघड; दोन तरुण अटकेत

औरंगाबाद: औरंगाबाद शहरात विदेशी ‘हायड्रो गांजा’ची विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून गुन्हे शाखेने दोन तरुणांना अटक केली आहे. त्यांच्या ताब्यातून २८५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने एन-४ परिसरातील राजवीर चरणसिंग बिरग (२०) आणि ओम रवींद्र शिंदे (२३) यांना मंगळवारी रात्री छावणीतील लोखंडी पुलावर सापळा रचून रंगेहाथ पकडले. राजवीरच्या बॅगेत […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा-बस व्यवस्थेवर कडक नियम व पालकांचा सहभाग वाढवा; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

शाळांमधील अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी नवीन परिपत्रकात सर्व सूचनांचा समावेश करणार; मंत्री दादा भुसे मुंबई: महाराष्ट्रातील शाळांमध्ये शिकणाऱ्या अल्पवयीन मुला-मुलींवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांबाबत विधान परिषदेत लक्षवेधी क्र. ३ अंतर्गत चर्चा करण्यात आली. या विषयावर सदस्य डॉ. मनीषा कायंदे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या चर्चेदरम्यान पिठासीन अधिकारी म्हणून बोलताना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे […]

अधिक वाचा..

प्रत्येक महाराष्ट्रीयनच खरा ‘बिग बॉस’; अभिनेत्री निवेदिता सराफ यांचे स्पष्ट मत

मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर नाटक, मालिका आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या अभिनयाची छाप अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये तसेच ‘वाडा चिरेबंदी’सारख्या नाटकांतून उमटली आहे. निवेदिता सराफ या नेहमीच आपले मत स्पष्टपणे आणि बिनधास्तपणे मांडताना दिसतात. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी “महाराष्ट्राचा खरा […]

अधिक वाचा..

पंचायत समित्यांत भाजपला मित्रपक्षांकडूनच धक्का; जुन्नर-मिरज-हवेलीत वेगवेगळी समीकरणे

महायुतीत अंतर्गत तणाव उघड; स्थानिक राजकारणामुळे भाजप सत्तेबाहेर मुंबई: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर महायुतीने अनेक ठिकाणी सत्ता स्थापन केली असली तरी काही पंचायत समित्यांमध्ये मित्रपक्षांनी वेगवेगळी भूमिका घेतल्याने भाजपला धक्के बसले आहेत. गेल्या २४ तासांत तीन पंचायत समित्यांच्या सभापती-उपसभापती निवडणुकीत महायुतीतीलच पक्षांनी वेगवेगळ्या राजकीय समीकरणांमुळे भाजपला सत्तेपासून दूर ठेवले.पुणे जिल्ह्यातील जुन्नरमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र […]

अधिक वाचा..

मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम; भारतात गॅस तुटवडा? केंद्र सरकारने दिली महत्त्वाची माहिती

इराण: हॉरमुझ स्ट्राईट परिसरात सुरू असलेल्या तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत असताना भारतातील इंधन स्थितीबाबत केंद्र सरकारने महत्त्वाची माहिती दिली आहे. इराण कडून होर्मुज सामुद्रधुनीतील वाहतूक बंद केल्याने अनेक कच्च्या तेलाची जहाजे अडकून पडल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे मध्यपूर्वेत तणाव वाढला असून त्याचा परिणाम भारतासह अनेक देशांवर होत असल्याची चर्चा […]

अधिक वाचा..

शिवसेना नाव-धनुष्यबाण वादावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; पुढील तारीख अद्याप निश्चित नाही

मुंबई शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’ यावरून सुरू असलेल्या वादावर Supreme Court of India मध्ये गुरुवारी पुन्हा सुनावणी झाली. मात्र या प्रकरणाचा अंतिम निकाल अद्याप लागलेला नसून पुढील सुनावणीची तारीख नंतर निश्चित करण्यात येईल, असे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणात Uddhav Thackeray गट आणि Eknath Shinde गट यांच्यातील वादावर दोन्ही बाजूंनी अंतिम युक्तिवाद […]

अधिक वाचा..

पाबळ कान्हूर मेसाईत टँकरची मागणी

पाबळ (सुनील जिते): शिरूर तालुक्यातील पाबळ व कान्हूर मेसाई परिसरातील विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गावाचा पाणीपुरवठा विस्कळित झाला असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पाबळ व कान्हूर मेसाई ही गावे दुष्काळग्रस्त म्हणून ओळखली जातात. उन्हाळ्यात […]

अधिक वाचा..

मलठण केंद्र शाळेत रंगला ‘आठवडा बाजार’; चिमुकल्यांनी अनुभवले खरेदी-विक्रीचे व्यवहार

शिरूर (सुनील जिते): मलठण येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, मलठण व शालेय व्यवस्थापन समितीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘आठवडा बाजार’ व ‘आनंद मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले होते. पुस्तकी ज्ञानासोबतच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहाराचे शिक्षण मिळावे, या उद्देशाने भरवण्यात आलेल्या या बाजाराला ग्रामस्थांनी मोठा प्रतिसाद दिला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रांगणात विविध स्टॉल्स लावले होते. यात प्रामुख्याने ताजी […]

अधिक वाचा..

शेतकरी कर्जमाफीची घोषणा म्हणजे शेतकऱ्यांचा विश्वासघात, सरकार फक्त लाडक्या कंत्राटदारांचे हित जपण्यात व्यस्त

मुंबई: महायुती सरकारने अर्थसंकल्प मध्ये जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही निव्वळ धूळफेक असून, सरकारने ३० सप्टेंबर २०२५ ची अट घालून शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे, असा आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज केला. अर्थसंकल्पीय चर्चेदरम्यान बोलताना त्यांनी शेती, सिंचन आणि राज्यातील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेवरून सरकारवर कडक ताशेरे ओढले. शेतकरी प्रश्नांवर बोलताना वडेट्टीवार यांनी कर्जमाफीच्या निकषांवर […]

अधिक वाचा..