इराण-अमेरिका संघर्षाचा फटका; पेट्रोल-डिझेल पुन्हा महाग

दहा दिवसांत तिसऱ्यांदा दरवाढ, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ नवी दिल्ली: देशभरातील नागरिकांना महागाईचा आणखी एक मोठा धक्का बसला असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ करण्यात आली आहे. अवघ्या दहा दिवसांत तिसऱ्यांदा इंधन दरवाढ जाहीर करण्यात आली असून, शनिवारी पेट्रोलच्या दरात ८७ पैशांनी तर डिझेलच्या दरात ९१ पैशांनी वाढ करण्यात आली. यापूर्वीही केंद्र सरकारने इंधन दरात […]

अधिक वाचा..

आदिवासी सामूहिक विवाह सोहळ्यात उपमुख्यमंत्री शिंदे यांचा व्हिडीओ कॉलद्वारे संवाद

२०१ जोडप्यांना दिल्या शुभेच्छा बोईसर: शिवसेनेच्या वतीने पालघर जिल्ह्यातील आदिवासी युवक-युवतींसाठी दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्याला यंदा उपमुख्यमंत्री Eknath Shinde प्रत्यक्ष उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे नववधू-वरांशी संवाद साधत त्यांना शुभेच्छा दिल्या. बोईसरमधील शिवसेना आदिवासी समाज विभाग आणि आधार प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला […]

अधिक वाचा..

शिरूर पोलिसांचा मानवतेचा चेहरा! शेतकरी महिलेसाठी नाथा जगताप ठरले ‘देवदूत’

शिरूर (अक्षय टेमगिरे): आधीच कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असताना, एका शेतकरी महिलेसाठी शिरूर पोलिसांनी देवदूताची भूमिका बजावत मानवतेचे दर्शन घडवले आहे. दुपारच्या चार वाजण्याच्या सुमारास कांदा विक्रीचे पैसे हरवल्यानंतर हवालदिल झालेल्या महिलेला अवघ्या दीड ते दोन तासांत तिची रोख रक्कम आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली पर्स परत मिळवून देण्यात शिरूर पोलीस स्टेशनचे […]

अधिक वाचा..

कोकणातील काजू उत्पादकांवर अन्याय? ‘महाराष्ट्र काजू बोर्ड’ चंदगडला नेण्यावरून संताप

रत्नागिरी: महाराष्ट्रातील प्रमुख काजू उत्पादक पट्टा असलेल्या कोकणातून ‘महाराष्ट्र काजू बोर्ड’चे मुख्यालय चंदगड येथे स्थापन करण्याच्या निर्णयावरून नाराजी व्यक्त होत आहे. कोकणातील शेतकरी, प्रक्रिया उद्योग आणि स्थानिक कार्यकर्त्यांकडून हा निर्णय अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. राज्यातील सुमारे १ लाख हेक्टर क्षेत्रावर काजू लागवड असून, त्यातील मोठा हिस्सा कोकणात आहे. तसेच काजू प्रक्रिया करणारे […]

अधिक वाचा..

वरळीतील नाला सफाईची राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रत्यक्ष पाहणी

मुंबई: मान्सूनपूर्व तयारीच्या पार्श्वभूमीवर वरळी येथील मोठ्या नाल्याच्या साफसफाईच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. मुंबई अध्यक्ष तथा माजी आमदार मिलिंद आण्णा कांबळे, मुंबई कार्याध्यक्ष सोहेल सुभेदार, दक्षिण मुंबई जिल्हाध्यक्ष रुपेश खांडगे आणि प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी नाल्यात उतरून कामांचा आढावा घेतला. यावेळी नाला सफाईची […]

अधिक वाचा..

मुंबई ते सुरजागड! विकासाच्या महामार्गावर महाराष्ट्र; १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; एकनाथ शिंदे

मुंबई: “विकसित भारत २०४७”च्या दिशेने वाटचाल करताना महाराष्ट्र वेगाने प्रगती करत असून मुंबईपासून गडचिरोलीतील सुरजागडपर्यंत विकासाचा नवा एक्सप्रेसवे उभारला जाणार आहे. उद्योग, आधुनिक पायाभूत सुविधा, वेगवान दळणवळण, कौशल्य विकास, गृहनिर्माण आणि पर्यावरणपूरक प्रकल्पांच्या माध्यमातून राज्याचा सर्वांगीण विकास साधला जात असून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था १ ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचेल, असा विश्वास उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी व्यक्त केला. The […]

अधिक वाचा..

वोटचोरी करून भाजप सत्तेत; लोकशाहीशी खेळ करणाऱ्यांना जेलमध्ये जावे लागेल; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : भाजपने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतदार यादीत फेरफार करून महाराष्ट्रात सत्ता मिळवली असून बिहार आणि बंगालमध्येही मतदारांची नावे वगळून विजय मिळवला, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी केला. लोकशाहीची हत्या करणाऱ्या आणि मतदार यादीत घोळ करणाऱ्यांना आगामी काळात जेलमध्ये जावे लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. राज्यात निवडणूक आयोगामार्फत राबविण्यात […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील निखिल इचके मृत्यू प्रकरणात “अपघात की घातपात…?”

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कवठे येमाई येथील युवक निखिल संदीप इचके यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असुन, महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोगाने या प्रकरणाची अधिकृत दखल घेतल्याने पुणे ग्रामीण पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. आयोगाने केस क्रमांक ३१८६/१३/२३/२०२६ अंतर्गत प्रकरण नोंद करुन संबंधित यंत्रणांकडुन अहवाल मागविल्याची माहिती समोर आली आहे. निखिल […]

अधिक वाचा..

‘कॉकरोच जनता पार्टी’ ते संविधानप्रेम; बदलले फक्त शब्द नव्हे, भूमिकाही!

मुंबई : सार्वजनिक जीवनात काही घटना अशा घडतात की त्यांची नोंद इतिहासापेक्षा विनोदाच्या पुस्तकात व्हावी असे वाटते. कालपर्यंत सोशल मीडियावरील एका काल्पनिक “कॉकरोच जनता पार्टी”कडे हेटाळणीने पाहणारी मंडळी आज संविधानाचे महत्त्व सांगताना दिसत आहेत, हा त्यापैकीच एक राजकीय चमत्कार ठरत आहे. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सूर्यकांत यांनी नुकत्याच एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात “संविधान हे सर्व […]

अधिक वाचा..

रिक्षा-टॅक्सी चालकांना १५ ऑगस्टपर्यंत मराठी शिकणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता यावा यासाठी अमराठी चालकांना १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा शिकणे सक्तीचे करण्यात आले आहे. १६ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला. मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस विविध साहित्य […]

अधिक वाचा..