राज्यातील महापालिका निकालात भाजपची मोठी मुसंडी; मुंबईत २५ वर्षांची ठाकरे सत्ता संपुष्टात

मुंबई: राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या निकालात भाजपने जोरदार कामगिरी करत बहुतेक महापालिकांवर वर्चस्व मिळवले आहे. मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवडसह अनेक महत्त्वाच्या शहरांत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने सत्ता मिळवली असून, मुंबई महापालिकेत तब्बल २५ वर्षांची ठाकरे गटाची सत्ता संपुष्टात आली आहे. मुंबईत भाजप-महायुतीला बहुमत, ठाकरे युगाचा अंत मुंबई महापालिकेत भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीने बहुमत मिळवले आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालानुसार […]

अधिक वाचा..

महाबळेश्वर येथे १८ जानेवारीला ३६१ वा सुवर्णतुला दिन महोत्सव

महाबळेश्वर: राजमाता जिजाऊ यांच्या मातृभक्तीचा, उच्च संस्कारांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाचा साक्षीदार असलेला ऐतिहासिक ‘सुवर्णतुला’ प्रसंग यंदा ३६१ वर्षांचा होत आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. १८) श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे ‘३६१ वा सुवर्णतुला दिन महोत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या महोत्सवाचे आयोजन श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. […]

अधिक वाचा..

मुंबई महापालिका निवडणुकीत मोठे उलटफेर; वायकर कुटुंबाला धक्का

मुंबई: मुंबई महापालिकेची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरत असून मतमोजणीच्या प्रत्येक फेरीत चित्र बदलत असल्याचे पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या कलात महायुती आघाडीवर असली तरी अनेक ठिकाणी ठाकरे गट आणि काँग्रेसने निर्णायक धक्के दिले आहेत. मुंबईतील वॉर्ड क्रमांक ७३ मध्ये मोठा उलटफेर झाला आहे. शिंदे गटाचे खासदार रविंद्र वायकर यांच्या कन्या दीप्ती वायकर-पोतनीस यांचा पराभव झाला आहे. […]

अधिक वाचा..

काँग्रेसचे पाच शहरात महापौर तर ३५० नगरसेवक; १० ठिकाणी सत्तेत सहभागी होऊ

भाजपा महायुतीच्या विजयात बोगस मतदान, पैशाचे वाटप व निवडणूक आयोगाच्या मदतीची साथ मुंबई: महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मिळालेले यश समाधानकारक नसले तरी यश अपयशाची पर्वा न करता आम्ही वैचारिक लढाई लढलो. जनतेचा विश्वास व कार्यकर्त्यांचा निर्धाराचा लढा या जोरावर काँग्रेस पक्ष राज्यातील सर्वात मोठा विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसत आहे. पाच शहरात काँग्रेसचा महापौर तर ३५० […]

अधिक वाचा..

मुंबईचा किंग कोण! महाराष्ट्रातील २९ महापालिकांचा निकाल आज

बीएमसीकडे राज्याचे लक्ष मुंबई: महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी आज सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. राज्यभरात एकूण ८९३ जागांसाठी २,८०० हून अधिक नगरसेवकांचे भवितव्य आज मतमोजणीत ठरणार आहे. मात्र, सर्वांच्या नजरा मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) निकालावर केंद्रित झाल्या आहेत. मुंबईतील २२७ वॉर्डांसाठी २३ मतमोजणी केंद्रांवर मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. अनेक दशकांपासून शिवसेनेचे बीएमसीवर वर्चस्व राहिले […]

अधिक वाचा..

ठाणे-मुंबईत वाढता मतदानाचा टक्का; लोकशाही उत्सवात नागरिकांचा सहभाग

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कुटुंबासह बजावला मतदानाचा हक्क ठाणे: राज्यभरात आज महापालिकांच्या निवडणुकांसाठी शांततेत आणि उत्साहात मतदान सुरू आहे. ठाण्यात कुटुंबासह मतदान केल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधत सर्व मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते. उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ठाण्यातील वागळे इस्टेटसह संपूर्ण शहरात मतदारांमध्ये प्रचंड उत्साह दिसून […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजनेची ‘सुवर्ण’ भरारी; सोलार अ‍ॅग्रो पॉवर कंपनीला राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई (प्रतिनिधी): राज्यातील ४५ लाखांवर शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे स्वप्न पुर्णत्वास नेणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी एमएसईबी सोलार अॅग्रो पॉवर लिमिटेडला नवी दिल्ली येथे शनिवारी (दि. १०) स्कोच समूहाच्या वतीने राष्ट्रीय सुवर्ण पुरस्काराने गौरविण्यात आले. राज्याच्या अपर मुख्य सचिव (ऊर्जा) श्रीमती आभा शुक्ला यांच्या नेतृत्वात एमएसईबी सोलार अॅग्रो पॉवर लिमिटेड अंतर्गत […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुका! ‘पॅनेल पद्धती’बाबत मतदारांच्या सर्व शंका दूर

मुंबई: महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली असून गुरुवार, १५ जानेवारी रोजी राज्यभर मतदान होणार आहे. तर १६ जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहेत. मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी सर्व राजकीय पक्षांसह निवडणूक आयोगाकडून मतदारांना आवर्जून मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यंदाच्या महापालिका निवडणुका ‘पॅनेल पद्धतीने’ होत असल्याने अनेक मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. […]

अधिक वाचा..

मतदार कार्ड नसल्यास ‘या’ 12 पुराव्यांपैकी कोणताही एक दाखवून करा मतदान

औरंगाबाद: महापालिका निवडणूक मतदानाच्या दिवशी मतदारांनी मतदान केंद्रावर मतदार ओळखपत्र (Voter ID) दाखवून मतदान करता येते. मात्र, जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल, तरीही काळजी करू नका. राज्य निवडणूक आयोगाने मान्य केलेल्या खालील 12 ओळखीच्या पुराव्यांपैकी कोणताही एक पुरावा दाखवून तुम्ही मतदान करू शकता Voter ID नसल्यास हे 12 पुरावे ग्राह्य धरले जातील पासपोर्ट आधार कार्ड […]

अधिक वाचा..

भाजपाने राज्यात विषवल्ली जन्माला घातली, महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाची विषवल्ली कापा

महाराष्ट्राचा बिहार करू इच्छिणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या कूनितीची फळं महाराष्ट्र भोगतोय… मुंबई: भारतीय जनता पक्ष व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील वातावरण अत्यंत गढूळ करून ठेवले आहे. महाराष्ट्राचा बिहार करू इच्छिणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तयार केलेल्या निवडणूक कूनितीची फळं आज महाराष्ट्र भोगतोय, हे राज्यातील जनतेने लक्षात घ्यावे. देवेंद्र फडणवीस या व्यक्तीने व त्यांच्या भारतीय जनता […]

अधिक वाचा..