काँग्रेसची हाक, कोल्हापुरकरांनो मराठवाड्याला साथ देऊया; आमदार सतेज पाटील

कोल्हापूर: सध्या मराठवाडा अतिवृष्टीच्या भयंकर संकटातून जात आहे. अनेक गावे पाण्याखाली गेल्याने शेती, घरे, स्वप्नं आणि भविष्य सगळंच वाहून गेलं आहे. त्यामुळे संकटग्रस्त मराठवाड्याच्या मदतीला धावून जाण्याचे आवाहन कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने कोल्हापूरकरांना केले आहे. काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते तथा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांच्या पुढाकारातून पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी हात पुढे करुया हा मदतीचा […]

अधिक वाचा..

पुरस्कार प्राप्त शिक्षक हे राज्याचे ब्रँड ॲम्बेसेडर; उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई: विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश देण्याचे काम शिक्षक करतात. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान हा राष्ट्रनिर्मितीचा सन्मान आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते न शिकवता, कौशल्याधारित शिक्षण, समस्यांचे निराकरण, टीमवर्क आणि मूल्याधारित शिक्षण, ज्ञानासोबत सद्गुणांची शिकवणूक देऊन स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण होईल अशी सशक्त पिढी घडवावी. पुरस्कार प्राप्त शिक्षक हे राज्याचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

मेट्रोचे सर्व टप्पे 2026 च्या अखेरपर्यंत प्रवाशांकरिता खुले होतील; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मेट्रो मार्ग-4 व 4 अ, टप्पा-1, गायमुख ते विजय गार्डन स्टेशन पर्यंत मेट्रोची तांत्रिक तपासणी व चाचणी संपन्न ठाणे: मेट्रो 4 आणि मेट्रो 4 अ या मार्गिका वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सला जोडणाऱ्या मेट्रो 11 या मार्गिकेला जोडण्यात येणार असल्याने ही 58 किमी लांबीची देशातील सर्वात मोठी मेट्रो मार्गिका ठाणेकर आणि मुंबईकरांसाठी उपलब्ध होणार […]

अधिक वाचा..

राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाला तातडीने मदत पुरवण्याचे पुराच्या वेढ्यात अडकलेल्या नागरिकांची त्वरित सुटका करण्याचे निर्देश

ठाणे: मराठवाड्यातील काही जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी फोनवरून संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या नागरिकांना तातडीने मदत करून त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले. मराठवाड्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत शिंदे यांनी पूरपरिस्थितीचा आढावा घेऊन लोकांना तत्काळ मदत पुरवण्याचे […]

अधिक वाचा..

GST दर कमी करण्याचे श्रेय घेणा-या पंतप्रधानांनी आठ वर्ष वाढीव दराने केलेल्या लुटीची जबाबदारी घ्यावी

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पुन्हा एकदा आपल्या सवयीप्रमाणे GST दर कपातीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. २०१७ मध्ये मोदीजींनीच स्वतः प्रचंड वाढीव दराने GST आणून देशातील उद्योग, व्यापारी आणि सामान्य नागरिक यांना त्रस्त केले, त्यांची प्रचंड आर्थिक लूट केली. तेच मोदीजी आज GST दर कमी केले म्हणून स्वतःची पाठ थोपटून […]

अधिक वाचा..

दस्त नोंदणीच्या आधी जमीन मोजणी बंधनकारक; नोंदणी झाल्याशिवाय फेरफार नाही

औरंगाबाद: आता महाराष्ट्रात जमीन खरेदी-विक्री किंवा दस्त नोंदणी करण्याआधी जमिनीची मोजणी करणे बंधनकारक असेल कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ही नवी पद्धत लागू केली जाणार आहे. खासगी एजन्सीमार्फत जमिनीची मोजणी राज्यात जमाबंदी आयुक्तालयांच्या अखत्यारित १० ते १५ खासगी एजन्सी नेमल्या जाणार आहेत. या एजन्सींच्या भूकरमापकांमार्फत जमिनीची मोजणी केली जाईल. मोजणी पूर्ण झाल्यानंतरच दस्ताची नोंदणी […]

अधिक वाचा..

जुनी पेन्शन २०२६ पासून पुनर्संचयित होणार! सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

औरंगाबाद: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा दिलासा दिला आहे. २०२६ पासून जुनी पेन्शन योजना (OPS) पुन्हा सुरू होणार असल्याची घोषणा झाली आहे. निवृत्तीनंतरची आर्थिक सुरक्षितता प्रत्येक कर्मचाऱ्याची सर्वात मोठी चिंता म्हणजे निवृत्तीनंतरचे उत्पन्न जुनी पेन्शन योजना (OPS) ही चिंता कमी करायची परंतु OPS बंद झाल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये असुरक्षितता वाढली होती आता पुन्हा OPS लागू झाल्याने […]

अधिक वाचा..

साक्षरतेच्या समान अधिकारा’चा आदर करून श्रीगणेशाचे आशीर्वाद व प्रसाद वाटण्याचा अनोखा मार्ग…

मुंबई: सुमनालय फाऊंडेशन या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेने १९ सप्टेंबर २०२५ रोजी शांतीवन आश्रम शाळेतील वंचित मुलांसोबत प्रेम , बाप्पाचा आशीर्वाद आणि वही आणि लेखन साहित्याचा प्रसाद वाटून गणेशोत्सव साजरा केला. शाळेतील विद्यार्थ्यांनी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी काही शिक्षकांसह सुमनालय फाऊंडेशनच्या अध्यक्ष डाॅ प्रा.सुजाता वॉरियर आणि कोषाध्यक्ष रुद्रन यांचे स्वागत केले . अंटार्क्टिका, कासा रिओ, […]

अधिक वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाकडून तीव्र निषेध

मुंबई: त्र्यंबकेश्वर येथे टोल वसुली करणाऱ्या कंत्राटी कर्मचारी गुंडांकडून पत्रकारांवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा ‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया'(माई) कडून तीव्र शब्दात निषेध करत आहे. या हल्लेखोरांवर तत्काळ कठोर कारवाई करावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून ही गुंडगिरी का होते आहे? याचा शोध घेऊन अशा व्यक्ती, प्रवृत्तींचा कायमचा बिमोड करण्याची गरज आहे. त्र्यंबकेश्वर येथे कुंभ मेळ्यासंदर्भात […]

अधिक वाचा..

सरकार मधील मंत्री बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव टाकत आहे

नागपूर: सरकारने काढलेल्या शासन निर्णयामुळे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अस मुख्यमंत्री आणि ओबीसी उपसमितीतील मंत्री सांगत असले तरी ओबीसींच्या हक्कावर गदा येत आहे. म्हणूनच हा शासन निर्णय रद्द व्हावा यासाठी सकल ओबीसी संघटनांचा महामोर्चाचे आयोजन नागपुरात करण्यात आले आहे अशी माहिती काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली. नागपुरात ओबीसी समाजाच्या महामोर्च्याची माहिती देण्यासाठी […]

अधिक वाचा..