परदेशात नोकरीचं आमिष; पोर्तुगालमध्ये महिलेला शरीरविक्रीसाठी दबाव? पुण्यात आंतरराष्ट्रीय रॅकेटचा गंभीर आरोप

पुणे : नोकरीच्या शोधात परदेशात जाणाऱ्या महिलांना चांगला पगार आणि उज्ज्वल भविष्याचं आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यात समोर आला आहे. पोर्तुगालमध्ये नोकरीच्या आमिषाने नेल्यानंतर एका महिलेवर शरीरविक्री करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप करण्यात आला आहे. भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह पीडित महिलेने या कथित रॅकेटचा पर्दाफाश केल्याचा दावा केला आहे. मिळालेल्या […]

अधिक वाचा..

अमित शाहांच्या राजीनाम्याची मागणी म्हणजे निव्वळ राजकीय स्टंट; विरोधकांनी संसदेत चर्चेला यावे; एकनाथ शिंदे

जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांचे आंदोलन संपले, तरी काँग्रेसकडून राजकारण सुरूच; शिवसेना पक्ष-चिन्हाच्या सुनावणीवरून उबाठावरही निशाणा नवी दिल्ली: जंतर-मंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला. मात्र, आंदोलन संपल्यानंतरही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांच्या आडून काँग्रेस आणि विरोधक केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी करत संसदेबाहेर राजकीय स्टंट करत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे मुख्य […]

अधिक वाचा..

गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या कामाचा बोजवारा; वर्षभरातच भेगा अन् बांधकाम खचले

२३५ कोटींच्या कंत्राटातील अवघे १५ टक्के काम पूर्ण; वडेट्टीवारांकडून कंत्राटदार-अभियंत्यांना धारेवर धरत उच्चस्तरीय चौकशीची मागणी ब्रम्हपुरी : तालुक्यातील तोरगाव परिसरातून जाणाऱ्या गोसेखुर्द उजव्या कालव्याच्या कामाचा दर्जा आणि संथगतीचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कोट्यवधी रुपयांचा सार्वजनिक निधी खर्च करून उभारण्यात आलेल्या कालव्याला अवघ्या वर्षभरातच अनेक ठिकाणी भेगा पडल्या असून काही ठिकाणी बांधकाम खचले आहे. त्यामुळे […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योगांची ‘पंचाईत’! ५ दिग्गज कंपन्यांची मोठ्या भूखंडांसाठी मागणी; हजारो रोजगाराच्या संधी

छत्रपती संभाजीनगर : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत (DMIC) विकसित होत असलेल्या ऑरिक सिटीमुळे छत्रपती संभाजीनगर पुन्हा एकदा देशातील मोठ्या उद्योगांचे आकर्षण ठरत आहे. टोयोटा, जेएसडब्ल्यूसह नामांकित कंपन्यांनी ऑरिकमध्ये गुंतवणुकीची तयारी दर्शवल्यानंतर आता आणखी पाच मोठ्या कंपन्यांनी औद्योगिक भूखंडांसाठी रस दाखविल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये दोन स्टील आणि तीन ऑटोमोबाईल कंपन्यांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. […]

अधिक वाचा..

राजकीय पक्ष श्रेष्ठ, विधिमंडळ पक्ष नव्हे’; शिवसेना वादाच्या सुनावणीत ठाकरे गटाचा जोरदार युक्तिवाद

नवी दिल्ली : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरील वादासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी पुन्हा सुनावणी झाली. ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार बाजू मांडत निवडणूक आयोगाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सुनावणीनंतर विधीतज्ज्ञ असीम सरोदे यांनी पत्रकार परिषदेत युक्तिवादाची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, न्यायालयात राजकीय पक्ष हा विधिमंडळ पक्षापेक्षा श्रेष्ठ असल्याचा मुद्दा […]

अधिक वाचा..

भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

दक्षिण रत्नागिरीतील भाजप संघटनेचे शिल्पकार हरपले; गुरुवारी मूळ गावी अंत्यसंस्कार मुंबई: राजेश सावंत यांच्या निधनाने रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. भारतीय जनता पक्षाच्या दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते राजेश सावंत यांचे बुधवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते कोल्हापूरहून रत्नागिरीकडे परत येत असताना पाली परिसरात त्यांना अचानक अस्वस्थता […]

अधिक वाचा..

राज्यात ३०,२०९ शिक्षक पदांची भरती सुरू; ११ ऑगस्टपर्यंत पसंतीक्रम लॉक करण्याची मुदत

पवित्र पोर्टलवरून गुणवत्ताधारित प्रक्रिया; १.७० लाख उमेदवारांनी स्वप्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षण सेवक व शिक्षकांच्या ३० हजार २०९ रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला पवित्र (Pavitra) पोर्टलवरून सुरुवात झाली आहे. ही भरती पूर्णपणे पारदर्शक आणि गुणवत्ताधारित पद्धतीने करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी दिली. टीएआयटी-२०२५ परीक्षेसाठी […]

अधिक वाचा..

मुंबईत प्राइम फोकसचा अत्याधुनिक स्टुडिओ सुरू; सर्जनशील अर्थव्यवस्थेला मोठी चालना; देवेंद्र फडणवीस

मुंबई: गोरेगाव येथील फिल्मसिटी परिसरात प्राइम फोकसच्या जागतिक दर्जाच्या अत्याधुनिक स्टुडिओच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारताला सर्जनशील अर्थव्यवस्थेचे (क्रिएटर इकॉनॉमी) जागतिक केंद्र बनविण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि दर्जेदार पायाभूत सुविधा आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, ‘वेव्ह्स 2025’ परिषदेदरम्यान झालेल्या सामंजस्य करारानंतर अवघ्या एका वर्षात या […]

अधिक वाचा..

नियमांनुसार काम करायचे नसेल तर राजीनामा द्या! एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांचा कर्मचाऱ्यांना स्पष्ट इशारा

प्रयोगशाळेतील कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर मुंढे यांची भूमिका; “एफडीएची लॅब ही २४ तास कार्यरत आणीबाणीची सेवा” मुंबई : राज्यभरात अन्नभेसळ आणि नियमबाह्य कारभाराविरोधात धडक कारवायांमुळे चर्चेत असलेले अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विभागातील कर्मचाऱ्यांना स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे. “शासनाच्या नियमानुसार काम करायचे नसेल, तर राजीनामा देऊन निघून जावे,” असे ठाम विधान त्यांनी […]

अधिक वाचा..

दिल्लीत सचिन अहिर यांची केंद्रीय मंत्र्यांशी बैठक; मुंबईच्या पुनर्विकास, रेल्वे आणि मिठागरांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा

मुंबई: मुंबईतील केंद्र सरकारच्या अखत्यारीतील जमिनींवरील रखडलेले पुनर्विकास प्रकल्प, मुंबई पोर्ट ट्रस्टच्या जमिनी, रेल्वेच्या जागा, मिठागरांचा विकास आणि विविध पायाभूत सुविधांच्या प्रश्नांवर महाराष्ट्र विधानपरिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी नवी दिल्लीत केंद्रीय मंत्र्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासोबत झालेल्या या दौऱ्यात विविध महत्त्वाच्या विषयांवर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती अहिर […]

अधिक वाचा..