जनतेचे प्रश्न विचारणे म्हणजे देशाची बदनामी नव्हे; तेच लोकशाहीचे कर्तव्य; ॲड. अमोल मातेले

मुंबई: विरोधी पक्षांनी देशातील जनतेच्या अडचणी, महागाई, बेरोजगारी, गॅस व इंधन दरवाढ, शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा सरकारच्या धोरणांवर टीका केली की लगेच त्याला “देशाची बदनामी” असे नाव देणे ही सत्ताधाऱ्यांची सोयीस्कर भूमिका असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केली आहे. लोकशाही व्यवस्थेमध्ये सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे […]

अधिक वाचा..

देशाची बदनामी करून राजकारण करणाऱ्यांना जनता ओळखते; एकनाथ शिंदे

मुंबई: आंतरराष्ट्रीय पातळीवर इराण इस्राईल आणि अमेरिका यांच्यात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर देशात गॅस किंवा इंधनाचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी केंद्र सरकार अत्यंत बारकाईने परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार आणि खरमरीत शब्दात टीका केली. मुंबई येथे पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील […]

अधिक वाचा..

मुंबईतील विधानभवन, उच्च न्यायालय, बीएसई व मेट्रोला बॉम्बची धमकी; सरकारने गांभीर्याने दखल घ्यावी; विजय वडेट्टीवार

मुंबई: मुंबईतील विधानभवन, मुंबई उच्च न्यायालय, बीएसई आणि मेट्रोला बॉम्बने उडवून देण्याची धमकी ई-मेलद्वारे आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची सरकारने अत्यंत गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. सध्या विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असतानाच अशा प्रकारची धमकी येणे ही चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. औचित्याच्या […]

अधिक वाचा..

गॅस तुटवड्यासाठी भाजपा सरकार जबाबदार; दांडी मार्चच्या प्रेरणेने आंदोलन करा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: आखाती युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला असला तरी त्यामागे भाजपा सरकारची चुकीची धोरणे आणि नाकर्तेपणा कारणीभूत असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. दांडी मार्चची प्रेरणा घेऊन जनतेने आंदोलन करावे आणि सरकारला धारेवर धरावे, असे आवाहन त्यांनी केले. त्र्यंबकेश्वर येथे काँग्रेसच्या लोकप्रतिनिधी कार्यशाळेच्या उद्घाटनावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सपकाळ […]

अधिक वाचा..

जेवणावरून वाद पेटला अन् सिलिंडरने ठेचून सहकाऱ्याचा जीव घेतला

पिंपरी-चिंचवड: पुण्यातील पिंपरी-चिंचवड शहरात एका कामगाराची गॅस सिलिंडरने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोशी परिसरातील कुदळे वस्ती येथील बांधकाम प्रकल्पावर जेवण बनवण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून ही घटना घडली. या घटनेत बालाजी खंदाडे (वय २९) यांचा मृत्यू झाला असून पोलिसांनी आरोपी प्रदीप गुंडारे (वय ३२) याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोशीमधील कुदळे […]

अधिक वाचा..

किर्तनातील वक्तव्याचा राग; किर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकरांवर हल्ला

छत्रपती संभाजीनगर: किर्तनात केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याच्या रागातून किर्तनकाराला घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गांधिली गावात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या कीर्तनातील एका वक्तव्यामुळे […]

अधिक वाचा..

इराणचा जगाला इशारा; कच्च्या तेलाचे दर 200 डॉलरवर जाण्याची शक्यता, होर्मुज सामुद्रधुनी बंद

इराण: मध्य पूर्वेत सुरू असलेल्या तणावामुळे जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणवर सुरू असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर इराणनेही जोरदार प्रत्युत्तर देत मिसाईल हल्ले सुरू ठेवले आहेत. या संघर्षामुळे परिस्थिती आणखी गंभीर बनत चालली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्या वक्तव्यांवरून अमेरिकेला हे युद्ध लवकर संपवण्याची इच्छा असल्याचे संकेत मिळत आहेत. इराणच्या […]

अधिक वाचा..

एस.टी.च्या जागांचा पीपीपी तत्त्वावर विकास! प्रवाशांना आधुनिक सुविधा व स्थानिकांना रोजगार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) ताब्यातील अतिरिक्त व मोकळ्या जागांचा अधिक परिणामकारक वापर करून महसूल वाढविणे, प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणे आणि स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती साध्य करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. या विषयावर महाराष्ट्र विधानपरिषदेत अर्धा तास चर्चेची सूचना देण्यात आली […]

अधिक वाचा..

बहुजन हिताय, बहुजन सुखाय’ हे यशवंतराव चव्हाणांचे विचार आजही मार्गदर्शक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या ११३ व्या जयंतीनिमित्त आज विधानभवन येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यात आले. विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनीही पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. या प्रसंगी विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री आणि आमदारांनी […]

अधिक वाचा..

महाविद्यालयीन शुल्कातील अनियमिततेची चौकशी; निवृत्त उच्च न्यायालय न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती

मुंबई: महाविद्यालयीन शुल्क निर्धारण प्रक्रियेत होत असलेल्या अनियमिततेच्या तक्रारींची शासनाने गंभीर दखल घेतली असून यासंदर्भात निवृत्त उच्च न्यायालय न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री Chandrakant Patil यांनी विधानसभेत केली.सदस्य महेश शिंदे यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. या चर्चेत सदस्य प्रशांत बंब यांनीही सहभाग घेतला. मंत्री पाटील म्हणाले […]

अधिक वाचा..