राज्यातील विश्रामगृहे सुस्थितीत असावीत; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे 

मुंबई: “शासकीय विश्रामगृह हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा  विषय आहे. अनेक विश्रामगृहाची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्याचप्रमाणे देवस्थानच्या ठिकाणी  असणारी विश्रामगृहे अस्वच्छ व दूरावस्थेत आहेत. त्यामुळे संसर्ग होऊन आजार होण्याची शक्यता आहे. त्यांची पुनर्बांधणी अथवा दुरुस्ती होणे आवश्यक आहे. तसेच स्वच्छता राखणे  आवश्यक आहे. तसेच या विषयावर प्रश्नोत्तराच्या तासात मर्यादित वेळेत मर्यादित उत्तर देने योग्य होणार नाही. या […]

अधिक वाचा..

भाजपचे माजी नगरसेवक पालिका कार्यालयात बसणार असतील तर…

मुंबई: भाजपचे माजी नगरसेवक जर पालकमंत्र्यांच्या कार्यालयात बसणार असतील तर इतर पक्षांची पक्ष कार्यालये देखील खुली करण्यात यावीत, अशी मागणी आमदार अस्लम शेख यांनी केली आहे. विधानभवन परिसरात प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना शेख यांनी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या पालिकेतील कार्यालयावर आक्षेप नोंदवत पालिकेतील पालकमंत्र्यांच्या कार्यालयाबाबत कोणतीही तरतुद नसल्याचे सांगितले. शेख म्हणाले, पालकमंत्री महानगरपालिकेत जाऊन आपलं […]

अधिक वाचा..

‘फार्मसी’ च्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याना ‘कॅरी ऑन’चा लाभ

मुंबई: फार्मसी पदविकेच्या ‘उन्हाळी परीक्षा २०२३’ च्या प्रथम वर्षाचा निकाल अत्यंत कमी लागल्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक चिंतेत होते. याप्रश्नी लक्ष घालून काही तरी सकारात्मक तोडगा काढण्याचे साकडे राज्यातील फार्मसी महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केले होते. याप्रश्नी विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी तातडीने कार्यवाही करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फार्मसी कॉन्सिल ऑफ इंडियाच्या कार्यालयाकडे याविषयी पाठपुरावा केला […]

अधिक वाचा..

मुस्लीम समाजाला मागासलेपणानुसार ५ टक्के आरक्षण लागू करा; नसीम खान

मुंबई: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने २०१४ साली मुस्लीम समाजाला मागासलेपणानुसार ५ टक्के आरक्षण दिले होते. परंतु नंतरच्या सरकारने हे आरक्षण कायम ठेवले नाही. हे आरक्षण धर्माच्या आधारित नाही, शैक्षणिक व शासकीय नोकऱ्यासाठी हे आरक्षण देण्यात आले होते. अल्पसंख्याक मुस्लिम समाजाच्या मागासलेपणानुसार मुस्लिम आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी माजी मंत्री व प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम […]

अधिक वाचा..

पुनमनगर येथील पीएमजीपीच्या १७ धोकादायक इमारतींचा पुनर्विकास म्हाडाने तात्काळ करावा

मुंबई: जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रातील पुनमनगर येथील धोकादायक १७ इमारतींच्या पुनर्विकासाचे काम म्हाडाने तात्काळ सुरू करून येथील रहिवाशांच्या जिवीताचे रक्षण करावे, अशी मागणी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी मंगळवारी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून केली. येथील इमारत क्रमांक ४ च्या चौथ्या माळ्यावरील एका घरातील सिलिंगचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने यात कुठलीही जिवीत हानी झाली नाही. […]

अधिक वाचा..

राज्याच्या विकासासाठी उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यावर भर देणार; अजित पवार 

मुंबई: राज्यातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्या विकासासाठी राज्य सरकार कटीबध्द आहे. ग्रामीण भागासह शहरी भागाचा समतोल विकास साधत राज्याच्या सर्वांगीण विकासाचे सरकारचे उद्दीष्ट असून त्यासाठी राज्याच्या उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण करण्यावर भर देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिली. विधानसभेत पुरवणी मागण्या बहुमताने मंजूर करण्यात आल्या. पावसाळी अधिवेशनात […]

अधिक वाचा..

माझ्या मतदारसंघाला ५८० कोटी रुपयांचा निधी मिळाल्याची माहिती चुकीची; जयंत पाटील

मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या सातव्या दिवशी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत पॉंईट ऑफ इन्कॉर्मशनच्या माध्यमातून निधीचा मुद्दा उपस्थित केला. माझ्या वाळवा मतदारसंघाला निधी वाटप संदर्भात ५८० कोटीचा निधी मिळाला असल्याची माहिती चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत सविस्तर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, लोकमत वृत्तपत्रामध्ये माझ्या मतदारसंघाला निधी वाटप संदर्भात ५८० कोटी रुपये […]

अधिक वाचा..

मणिपूर महिला अत्याचार विरोधात मौन निषेध राष्ट्रवादी काँग्रेसच आंदोलन

मुंबई: मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार होत आहे. महिलांवर झालेल्या अत्याचाराविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभर मौन निषेध आंदोलन करण्यात आले आहे. मुंबई विभागातील मंत्रालया जवळील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील प्रमुख उपस्थित होते. मणिपूरमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून हिंसाचार होत आहे तसेच महिलांवर अत्याचारी मोठ्या प्रमाणात होत आहेत या […]

अधिक वाचा..

सलग दोन महिने मणिपूर धगधगतंय मात्र सरकार निष्क्रिय; जयंत पाटील 

मुंबई: मणिपूर येथे घडणाऱ्या हिंसाचार विरोधात व केंद्र सरकारच्या निष्क्रियतेविरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभर आंदोलन करण्यात आले. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालय परिसरातील गांधी पुतळ्यासमोर मौन व्रत धारण करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाबाबत माहिती देताना जयंत पाटील म्हणाले की, भारतात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती किती ढासळलेली आहे हे मणिपूर […]

अधिक वाचा..