‘आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही’! होमगार्डचा आक्रोश; ४० हजार कुटुंबांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही… आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील होमगार्ड जवानांची. वर्षानुवर्षे सेवेत असतानाही अस्थिर रोजगार, अनिश्चित उत्पन्न आणि ‘गरज पडली की बोलावणं’ या व्यवस्थेमुळे सुमारे ४० हजार कुटुंबांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रातील होमगार्ड दलाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच गृह विभागाला निवेदन देत वर्षभर […]

अधिक वाचा..

साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी

मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून आला आहे. बदलीच्या दिवशीच त्यांनी ‘पॉवर प्ले’ करत जिल्ह्यातील सहा ते सात पोलीस अधिकाऱ्यांच्या कथित नियमबाह्य बदल्या केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून शिवसेना सातारा जिल्ह्याने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली आहे. […]

अधिक वाचा..

एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या अंतर्गत २.५७ मेगावॉट क्षमतेच्या ग्रीड सोलर प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी सुमारे ₹१३.०३ कोटींच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता मिळाली असून, यामुळे एसटी महामंडळाच्या वीज वापरात मोठी बचत […]

अधिक वाचा..

काँग्रेसचे ‘पुतना मावशीचे प्रेम’; महिलांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका; डॉ. नीलम गोऱ्हे

महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता कमी झाल्यानंतर काँग्रेस व इंडिया आघाडीतील खासदारांकडून वस्तुस्थितीचा विपर्यास करून जनतेची दिशाभूल केली जात असल्याची टीका विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. एका महिला खासदारांनी माध्यमांमध्ये Rajiv Gandhi यांनी १९८८ सालीच महिला आरक्षण दिल्याचा दावा केल्याचा […]

अधिक वाचा..

मानवतेसाठी बलिदान देणारा आदिल देशाचा जाज्वल्य दीप; कुटुंबाला शिवसेनेकडून नवे घर

जम्मू-काश्मीर: “धर्म, भाषा आणि पंथाच्या पलीकडे जाऊन मानवतेसाठी स्वतःचा जीव अर्पण करणारा आदिल हा देशाच्या अस्मितेचा जाज्वल्य दीप आहे,” असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी काढले. पहेलगाम येथे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या सय्यद आदिल हुसेन शाह यांच्या कुटुंबाला दिलेले आश्वासन पूर्ण करत शिवसेनेकडून आर्थिक मदत आणि नवे घर सुपूर्द करण्यात आले. या कार्यक्रमात शिंदे यांनी […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांना जर्मनी आणि जपानमध्ये रोजगाराच्या संधी; राज्य तंत्रशिक्षण मंडळ–सीआयआयमध्ये सामंजस्य करार

मुंबई: विद्यार्थ्यांना विदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक असते. यासाठी जर्मनी, जपान आणि रशिया या देशांच्या भाषांचे प्रशिक्षण देण्यावर विशेष भर देण्यात येत आहे. या भाषा प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय कामकाज संस्कृतीशी जुळवून घेण्याची क्षमता, संवाद कौशल्ये आणि व्यावसायिक आत्मविश्वास वाढेल. परिणामी, परदेशातील रोजगाराच्या संधींमध्ये लक्षणीय वाढ होईल, असे उच्च […]

अधिक वाचा..

भाजप महिला आरक्षणाची ‘सिरियल किलर’; विजय वडेट्टीवार यांचा जोरदार प्रहार

मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेस विधिमंडळ नेते Vijay Wadettiwar यांनी भाजपवर जोरदार टीका केली. २०२३ मध्ये महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसने समर्थन देत एकमताने ते मंजूर करण्यात मदत केली होती. मात्र त्या वेळी पंतप्रधान Narendra Modi यांनी काँग्रेसला श्रेय दिले नाही, असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. “भाजपच महिला आरक्षणाची सिरियल किलर आहे,” असा घणाघात त्यांनी […]

अधिक वाचा..

संपर्क मंत्री अभियानातून शिवसेनेचे रणशिंग; स्थानिक सत्तेसाठी आक्रमक ब्लूप्रिंट

मुंबई: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेने थेट रणशिंग फुंकले असून “संपर्क मंत्री अभियान” हे केवळ कार्यक्रम नसून सत्तेवर झेप घेण्याचा आक्रमक आराखडा असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील २२ जिल्ह्यांमध्ये संघटन मजबूत करत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांवर ताबा मिळवण्याचा निर्धार पक्षाने केला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी प्रत्येक संपर्क मंत्र्यांवर […]

अधिक वाचा..

संसदीय कार्य विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त मार्गदर्शक पुस्तिकांचे प्रकाशन

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या संसदीय कार्य विभागाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त तीन महत्त्वपूर्ण मार्गदर्शक पुस्तिकांचे प्रकाशन उच्च व तंत्रशिक्षण तसेच संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मंत्रालयात आयोजित विशेष कार्यक्रमात करण्यात आले. संसदीय कार्य विभागाची स्थापना १ जुलै १९७५ रोजी झाली होती. सुरुवातीला सामान्य प्रशासन विभागाचा भाग असलेला हा विभाग ८ जानेवारी २०१६ पासून स्वतंत्र विभाग म्हणून […]

अधिक वाचा..

‘नालंदा’चा नाद करून स्तुतीचा अतिरेक; कृष्णराज महाडिकांवर टीकेची झोड

मुंबई: भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी कृष्णराज महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना “माझे नालंदा विद्यापीठ” असे संबोधत केलेल्या भाषणावरून राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विरोधकांनी या वक्तव्यावर घणाघाती टीका करत याला “ज्ञानाचा अपमान आणि चापलुसीचा अतिरेक” असे संबोधले आहे. टीकाकारांच्या मते, नालंदा हे प्राचीन भारतातील ज्ञान, चिंतन आणि बौद्धिक परंपरेचे प्रतीक आहे. अशा ऐतिहासिक […]

अधिक वाचा..