लोकपाल विधेयक संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून तपासावे; नीलम गोऱ्हे

मुंबई: विधान मंडळाच्या सभागृहात आलेले लोकपाल विधेयक संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून तपासावे. त्यासाठी कालमर्यादा निश्चित करण्यात यावी, अशी सूचना आज विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज केले. लोकपाल विधेयकाबाबत आज आयोजित केलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. यावर उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी लोकपाल विधेयक संयुक्त चिकित्सा समितीच्या माध्यमातून तपासण्यासाठी देण्यात येईल. ही […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका नाव असलेला ‘तो’ फोटो बनावट…

औरंगाबाद: औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाला राज्य आणि केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. या निर्णयानंतर शहरातील अनेक ठिकाणी औरंगाबाद नाव बदलून छत्रपती संभाजीनगर असे लिहिण्यात येत आहे. तर शहरातील शासकीय कार्यालयावरील फलकाचे नावं देखील बदलली जात आहे. मात्र महानगरपालिकेवरील नाव औरंगाबाद असल्याने मोठ्या प्रमाणात टीका होत होती. दरम्यान आता महापालिका प्रशासनाने देखील […]

अधिक वाचा..

तुमच्या नेत्यांच्या फोटोला जोड्यांनी मारले तर चालेल का?

विधानसभा परिसरात राहुल गांधींच्या बॅनरला जोडे मारणाऱ्यांवर कडक कारवाई करा; बाळासाहेब थोरात मुंबई: विधानभवन परिसरात राहुल गांधी यांच्या बॅनरवरील फोटोला चपला, जोड्यांनी मारहाण करण्याचा प्रकार दोन दिवसापूर्वी घडला. अशा प्रकराचे विकृत प्रकार होणे पुर्णपणे चुकीचे, निंदनीय व लोकशाहीस मारक आहे. अशा प्रकारचे गैरवर्तन आपल्या कार्यकाळात झाले असून विधानसभा अध्यक्षांसाठीही हे योग्य नाही. या घटनेबाबत दोषींवर […]

अधिक वाचा..

दि मॅजेस्टिक आमदार निवासाच्या नुतनीकरण कामाचे भूमिपूजन

मुंबई: ‘दी मॅजेस्टिक’ या महाराष्ट्र राज्य विधानमंडळ अतिथीगृह तथा आमदार निवास वास्तुच्या नुतनीकरण कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज करण्यात आले. त्याचबरोबर या वास्तुच्या कोनशिलेचे अनावरणही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संसदीय कामकाज तथा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सार्वजनिक […]

अधिक वाचा..

ओबीसींना लुटुन मुठभर मित्रांना देण्यासाठी मोदींना सत्तेत बसवलेले नाही

मुंबई: राहुलजी गांधी यांनी ओबीसी समाजाचा अपमान केल्याचे थोतांड रचत भारतीय जनता पक्ष राज्यात व देशात आंदोलनाची नौंटकी करत आहे. ओबीसी समाजाबद्दल भाजपाला किती प्रेम आहे हे दिसून आलेले आहे. निरव मोदी, ललित मोदी, विजय मल्ल्या, अदानी हे ओबीसींचे नाहीत, त्यांचा पुळका भाजपाला येण्याचे काय कारण? ओबीसी समाजाला लुटून मुठभर मित्रांना देण्यासाठी ओबीसी समाजाने नरेंद्र […]

अधिक वाचा..

हा पुरस्कार माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या तमाम मायबाप मतदारांचा; डॉ. अमोल कोल्हे

पुणे: दुसऱ्यांदा पुरस्कार मिळाल्याचा नक्कीच आनंद आहे. पण हा पुरस्कार माझा एकट्याचा नाही तर, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या शिरुर लोकसभा मतदारसंघातील तमाम मायबाप मतदारांचा आहे. त्यामुळे यापुढेही जनसामान्यांचे प्रश्न व मुद्दे लोकसभेत मांडण्याची जबाबदारी मी नक्की निभावेन अशी विनम्र प्रतिक्रिया पुन्हा एकदा संसदरत्न पुरस्कार मिळालेल्या खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. आपल्या खासदारकीच्या पहिल्याच […]

अधिक वाचा..

औरंगाबाद नव्हे तर छत्रपती संभाजीनगरच…

सर्वोच्च न्यायालयाने ‘ती’ याचिका फेटाळली… औरंगाबाद: संभाजीनगर शहाराच्या नामांतराला विरोध करणाऱ्यांना अखेर सुप्रीम कोर्टाकडूनही फटकारलं असून नामांतराला विरोध करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. महाराष्ट्र सरकारने छत्रपती संभाजीनगर नामांतरावाचा ठराव मंजूर केल्यानंतर नुकतीच केंद्र सरकारनेही या प्रक्रियेला मंजुरी दिली. त्यानंतर नामांतरविरोधी संघटनांनी याविरोधात कायदेशीर लढा देण्याचा निश्चय केला होता. नामांतराला आक्षेप घेणारी याचिका सुप्रीम कोर्टात […]

अधिक वाचा..

मुंबई विद्यापीठाने हंगामी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत तोडगा काढावा…

मुंबई: मुंबई विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या हंगामी कर्मचाऱ्यांना नियमीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सोईसुविधा मिळणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठाने हंगामी कर्मचाऱ्यांच्या सेवेबाबत सिनेट समिती सदस्य आणि कर्मचारी संघटना यांच्या समावेत चर्चा करून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुढकार घ्यावा, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. आज विधानभवन येथील मा. उपसभापती यांच्या दालनात मुंबई विद्यापीठाच्या कंत्राटी कर्मचारी […]

अधिक वाचा..

राज्यात कायदा सुव्यस्था राखण्यास सरकार अपयशी 

मुंबई: मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नाशिक ते संभाजीनगर सारख्या ग्रामीण भागात कायदा व सुव्यस्था ढासळली आहे. मुंबई ठाण्यात दिवसा डान्सबार सुरू असून अवैध धंदे करणाऱ्या गुन्हेगाराला सरकारकडून संरक्षण दिल जात आहे, असा आरोप करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेप्रश्नी हे सरकार अपयशी ठरल्याची टीका केली. शेतकऱ्यांचे व आरोग्याचे प्रश्न सोडवण्यास, […]

अधिक वाचा..

२ वर्षांत बारामती परिमंडलाने दिल्या ६१७९४ शेती वीजजोडण्या

बारामती: दोन वर्षांत महावितरण बारामती परिमंडलाने शेतीपंपाच्या वीज जोडण्या देण्यात आघाडी घेतली असून, एकूण ६१ हजार ७९४ वीजजोडण्या देण्याचे काम केले आहे. ३० मीटर अंतरातील प्रतिक्षा यादी जवळपास संपली आहे. त्यामुळे अस्तित्वात असलेल्या वीज यंत्रणेपासून जोडणीचे ठिकाण ३० मीटरपर्यंत असलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने अर्ज करुन कोटेशन भरावे अशा सर्व शेतकऱ्यांना ३१ मार्चच्या आत कनेक्शन देण्याचे निर्देश […]

अधिक वाचा..