महाराष्ट्रातील ७ राज्यसभा जागांसाठी रणधुमाळी! महायुतीला ६ जागांचा फायदा, शरद पवारांच्या उमेदवारीकडे लक्ष

मुंबई: येत्या एप्रिल महिन्यात महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात खासदारांचा कार्यकाळ संपत असून, या निवडणुकीकडे राज्याच्या राजकारणाचे लक्ष लागले आहे. संख्याबळ पाहता यंदाच्या राज्यसभा निवडणुकीत महायुतीला मोठा फायदा होण्याची शक्यता असून, सातपैकी सहा जागा महायुतीच्या पारड्यात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीला केवळ एकाच जागेवर समाधान मानावे लागू शकते. राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवाराला ३७.५ मतांची आवश्यकता असते. […]

अधिक वाचा..

विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर ममता बॅनर्जींना सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका

मुंबई: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदारयादींची पुनर्पडताळणी सुरू असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी थेट सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या मुख्यमंत्र्यांनी स्वतः सुप्रीम कोर्टात युक्तिवाद केल्याने हा प्रकार चर्चेत आला होता. मात्र, निवडणूक आयोगावर टीका करणाऱ्या ममतांना आज सुप्रीम कोर्टानेच जोरदार झटका दिला आहे. सुप्रीम कोर्टाने पश्चिम बंगाल सरकारला […]

अधिक वाचा..

महापौर-उपमहापौर निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग

शिवसेना–एमआयएम एकत्र येण्याची शक्यता, गुप्त बैठकींनी चर्चांना उधाण मालेगाव: महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी शनिवारी (दि. ७) होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकारण तापले असून घडामोडींना वेग आला आहे. गुरुवारी (दि. ५) एमआयएमचे आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद इस्माईल आणि माजी महापौर तथा एमआयएमचे गटनेते अब्दुल मलिक यांनी शिवसेनेचे नेते व राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांची […]

अधिक वाचा..

पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक घटना; परप्रांतीय तरुणाने फेसबुक लाईव्हकरत उडी मारून जीवन संपवलं

पिंपरी-चिंचवड: शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, एका परप्रांतीय तरुणाने पत्नीपासून झालेल्या विभक्ततेच्या नैराश्यात फेसबुक लाईव्ह करत इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केसरी प्रसाद शाहू (वय अंदाजे …) असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. तो मूळचा मध्यप्रदेशमधील रहिवासी होता. मंगळवारी दुपारच्या सुमारास भोसरी […]

अधिक वाचा..

मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर ३३ तासांची कोंडी; ‘विकास’ की व्यवस्थेचे अपयश?

पुणे: मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर गुरुवारी संध्याकाळपासून भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली असून हजारो प्रवासी तब्बल ३३ तासांहून अधिक काळ महामार्गावर अडकून पडले. अडकलेल्या ट्रक एकाच वेळी सोडण्यात आल्याने घाट परिसरात मोठा गोंधळ उडाला.खालापूर टोल नाका ते अमिटी युनिव्हर्सिटी, अटल सेतू परिसर पूर्णतः जाम झाला होता. तीनही लेनमधून मोठ्या प्रमाणात ट्रक सुरू असल्याने वाहने अक्षरशः रांगत […]

अधिक वाचा..

एसटी प्रवाशांना महागाईचा नवा झटका! सर्व बससेवांच्या तिकीट दरात २ टक्के वाढ होण्याची शक्यता

मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागातील जनतेसाठी प्रवासाचे हक्काचे साधन असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) प्रवाशांना महागाईचा आणखी एक झटका बसण्याची शक्यता आहे. एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने सर्व प्रकारच्या बस सेवांसाठी २ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव सादर केला असून, यावर आज अंतिम निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. भाडेवाढीमागचं कारण काय? एसटी महामंडळाच्या सूत्रांनुसार, गेल्या काही […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार सत्तेच्या केंद्रस्थानी; पक्षातील नेते-मंत्र्यांशी थेट संवाद

मुंबई: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल घडताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राज्याचा कारभार हाती घेतला आहे. राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी इतिहास रचला आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास ही […]

अधिक वाचा..

देवमाणूसच्या सेटवर आई–लेकाचं नातं जिवंत

अपर्णा क्षेमकल्याणी यांनी ऑनस्क्रीन लेकासाठी विणला खास मफलर मुंबई: मालिका आणि चित्रपटांमधील कलाकारांचे पडद्यामागील नाते कसे असते, याची उत्सुकता प्रेक्षकांना नेहमीच असते. सोशल मीडियामुळे आता हे नातेसंबंध, त्यामधील आपुलकी आणि भावूक क्षण चाहत्यांसमोर येत आहेत. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका देवमाणूस मधला अध्याय सध्या प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. मालिकेतील गोपाळ, लाली, आप्पा, सुधाकर, रंजना, हृतिक, […]

अधिक वाचा..

सोयाबीन पावणेसहा, तूर आठ हजारांवर; बाजारपेठेत भाववाढ, आवक मात्र मंद

मुंबई: बाजारपेठेत सोयाबीनच्या दरामध्ये मोठी वाढ झाली असली तरी आवक मात्र लक्षणीयरीत्या घटली आहे. सध्या सोयाबीनला प्रतिक्विंटल सुमारे ५ हजार ७०० रुपयांचा भाव मिळत असून, मागील १५ ते २० दिवसांपासून दररोज नियमितपणे दरात वाढ होत असल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोयाबीनची मागणी वाढल्याने सोयाबीन डीओसी (ढेपी)लाही मोठी मागणी निर्माण झाली आहे. ढेपीच्या दरात वाढ झाल्यामुळे […]

अधिक वाचा..

जरांगे पाटलांच्या विधानानं घातपाताचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; मुंडेंवर थेट हत्येचा कट रचल्याचा आरोप

बीड: मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या ताज्या विधानामुळे घातपाताचा मुद्दा पुन्हा एकदा चांगलाच पेटला आहे. काही महिन्यांपूर्वी जरांगे पाटील यांनी केलेल्या गंभीर आरोपांनंतर या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आली होती. यातील अमोल खुणे या आरोपीला नुकताच जामीन मंजूर झाल्यानंतर त्याने जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप करत थेट नार्को टेस्टची मागणी केली आहे. […]

अधिक वाचा..