जन्मभूमीतून कर्मभूमीकडे! गोदा ते नर्मदा जलयात्रा; नारीशक्ती आणि विकासाचा नवा महामंत्र

अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी म्हणजे नारीशक्ती, असा प्रभावी संदेश देत उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी ‘गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रा २०२६’चा शुभारंभ केला. जलसंवर्धन, संस्कृती आणि विकास यांचा संगम घडवणारे हे नवे विकास मॉडेल त्यांनी यावेळी मांडले. श्रीक्षेत्र चौंडी येथे पार पडलेल्या या सोहळ्यात […]

अधिक वाचा..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अवमानावरून काँग्रेस आक्रमक

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली आहे. सपकाळ यांनी आरोप केला की, धिरेंद्र शास्त्री यांनी शिवाजी महाराजांबद्दल केलेले वक्तव्य अत्यंत आक्षेपार्ह असून, त्या वेळी उपस्थित असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन […]

अधिक वाचा..

विधानसभा निवडणूक २०२४!  ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने द्या; काँग्रेसची मागणी

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर, मतदारसंघनिहाय ‘परिशिष्ट ४४’च्या प्रती तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस ॲड. संदेश कोंडविलकर यांनी केली आहे. यासंदर्भात ॲड. कोंडविलकर यांनी आज मंत्रालयात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांची भेट घेत पत्र सादर केले. त्यांनी […]

अधिक वाचा..

‘खाकी’च्या बळावर विकासाला गती; महाराष्ट्र पोलीसांना ग्लोबल बनवण्याचा शिंदेंचा निर्धार

मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला जागतिक स्तरावर नेण्याचा निर्धार व्यक्त केला. ३६ व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कलीना (सांताक्रूझ पूर्व) येथील सशस्त्र पोलीस मुख्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला मंत्री Mangal Prabhat Lodha, गृहराज्यमंत्री […]

अधिक वाचा..

पद्म पुरस्कार 2027 साठी राज्यस्तरीय समिती स्थापन

मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य शासनाने राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती स्थापन केली आहे. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार गठीत करण्यात आलेल्या या समितीवर प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2027 रोजी जाहीर होणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी पात्र व्यक्तींची नावे केंद्र शासनाकडे पाठविण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. […]

अधिक वाचा..

पुण्यात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी बस सुविधांमध्ये सुधारणा; लवकरच उच्चस्तरीय बैठक; डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली. परिसर संरक्षण संवर्धन संस्थेचे अध्यक्ष रणजित गाडगीळ आणि श्वेता वेरणेकर यांनी उपसभापतींच्या दालनात महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी आवश्यक उपाययोजना, राज्य रस्ता सुरक्षा कृती आराखडा आणि वेग व्यवस्थापन […]

अधिक वाचा..

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य; धीरेंद्र शास्त्रीविरोधात संतापाची लाट

मुंबई: महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत कथित वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. विविध सामाजिक व राजकीय स्तरांवरून या वक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेसाठी दिलेल्या संघर्षपूर्ण लढ्याचा इतिहास लक्षात घेता, त्यांच्या पराक्रमाबाबत कोणतेही अवमानकारक विधान अस्वीकार्य असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. आदिलशाही, कुतुबशाही, निजामशाहीसह मोगल […]

अधिक वाचा..

आमदार संजय गायकवाडांचे विधान विकृत; कारवाईस सरकार का घाबरते? हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाच्या प्रकाशकांबाबत गायकवाड यांनी केलेली भाषा अत्यंत घाणेरडी, विकृत आणि गुन्हेगारी स्वरूपाची असल्याचा आरोप त्यांनी केला. गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, आमदार गायकवाड […]

अधिक वाचा..

हाच का डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपचा आदर? अनंत गाडगीळ यांचा संतप्त सवाल

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ परिसरातील परिस्थितीवरून काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते अनंत गाडगीळ यांनी भाजप आणि मुंबई महापालिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. १४ एप्रिल रोजी डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त मोठ्या संख्येने अनुयायी ‘राजगृह’ येथे दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून राजगृहासमोरील पदपथावर फिरती शौचालये उभारण्यात आली होती. त्या दिवशी स्थानिक […]

अधिक वाचा..

मुंबईत 27-28 एप्रिलला आंतरराष्ट्रीय रिव्हर्स बायर-सेलर मीट; एमएसएमई उद्योगांना निर्यातीच्या नव्या संधी

मुंबई: महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादिततर्फे महाराष्ट्र शासनाच्या ‘रॅम्प’ (रायझिंग अँड ॲक्सेलेरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स) उपक्रमांतर्गत चौथ्या रिव्हर्स बायर-सेलर मीटचे आयोजन करण्यात आले आहे. हा आंतरराष्ट्रीय व्यापार कार्यक्रम इंडिया एसएमई फोरमच्या सहकार्याने 27 व 28 एप्रिल 2026 रोजी द लीला हॉटेल, अंधेरी, मुंबई येथे पार पडणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या उपक्रमातून निर्याताभिमुख एमएसएमई उद्योगांना जागतिक […]

अधिक वाचा..