अजित पवारांच्या निधनाचा निवडणुकांवर परिणाम? सुनेत्रा पवार ९ फेब्रुवारीला मंत्रालयात प्रवेश करणार

मुंबई: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादी काँग्रेससह राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवरही या घटनेचा परिणाम होण्याची शक्यता स्थानिक पातळीवर व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पवार कुटुंबीय दुःखातून सावरत हळूहळू राजकीय जबाबदाऱ्या स्वीकारताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी […]

अधिक वाचा..
jyoti-pachundkar

रांजणगाव-कारेगाव मूळ गटाचा कायापालट करणार : ज्योती मानसिंग पाचुंदकर

कान्हूर मेसाई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विकासाच्या संकल्पनेला अभिप्रेत असलेला रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गट नागरिकांची समस्या सोडवून प्रगतीपथावर आणून त्याचा कायापालट करणार आहे, असे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार ज्योती मानसिंग पाचुंदकर यांनी दिले आहे. View this post on Instagram रांजणगाव कारेगाव मुळ जिल्हा परिषद गटात अंतर्गत रस्ते, सांडपाणी, […]

अधिक वाचा..

भाजपशिवाय राष्ट्रवादीचे विलीनीकरण अशक्य; अजितदादांनंतर नेतृत्वावरही भुजबळांचे मोठे संकेत

नाशिक: राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून, त्यांच्या अस्थी कलशाच्या दर्शनासाठी जनसागर उसळला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) भवितव्याबाबत आणि दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या संभाव्य विलीनीकरणाबाबत चर्चांना उधाण आले आहे.या चर्चांवर ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलताना अत्यंत स्पष्ट आणि […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी 7 फेब्रुवारीला भरपगारी सुट्टी बंधनकारक; उद्योग व खासगी आस्थापनांना शासनाचे आदेश

मुंबई: राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत 125 पंचायत समित्यांसाठी शनिवार, दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी उद्योग, आस्थापना व कारखान्यांमधील कामगार व कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी देणे बंधनकारक असल्याचे परिपत्रक उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाने जारी केले […]

अधिक वाचा..

एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! आरक्षण नसतानाही महापालिकांवर शिवसेनेच्या लाडक्या बहिणींचा शिक्का

मुंबई: महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर आता राज्यभर महापौर निवडीची प्रक्रिया सुरू झाली असून ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि उल्हासनगर या तीन महत्त्वाच्या महापालिकांमध्ये यंदा अनपेक्षितपणे महिलाराज येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे या तिन्ही महापालिकांमध्ये महापौरपद महिलांसाठी आरक्षित नसतानाही शिवसेनेने महिला नगरसेविकांवर विश्वास टाकत ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शिवसेनेचे पक्षनेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ […]

अधिक वाचा..

संजय गांधी ते अजित पवार! विमान अपघातांत संपणारी राजकीय कारकीर्द

विमान अपघातांत मृत्यू झालेल्या नेत्यांची भयावह मालिका बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण देश हादरला आहे. धावपट्टीवर उतरत असतानाच विमान कोसळून भीषण स्फोट झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह वैमानिक, सहवैमानिक, अंगरक्षक आणि फ्लाइट अटेंडंट यांचा मृत्यू झाला. विमान अपघातात राजकीय नेत्यांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच […]

अधिक वाचा..

पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांवर 25 हजार कोटींच्या MSCB घोटाळ्याची सावली

सुनेत्रा पवारांवरील ED चौकशी अद्याप प्रलंबित मुंबई: महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यावर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSCB) घोटाळ्याप्रकरणी कायदेशीर तपासाची टांगती तलवार अजूनही कायम आहे. तब्बल 25 हजार कोटींच्या या कथित घोटाळ्यात सक्तवसुली संचालनालयाने (ED) आपल्या आरोपपत्रात सुनेत्रा पवार यांचे नाव अजित पवार यांच्यासह नमूद केले आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष ठरला! भाजप मंत्री पीयूष गोयल यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

मुंबई: बुधवारी २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळावर झालेल्या भीषण विमान अपघातात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, राजकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांकडे असलेली बहुतांश खाती सुनेत्रा पवार […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात निवडणूक रणधुमाळी! राष्ट्रवादीचा प्रभाव वाढतोय तर भाजपसमोर मोठं आव्हान…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा परिसरात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा प्रचार सध्या चांगलाच रंगात आला आहे. गावोगावी सभा, बैठका, संपर्क दौरे यामुळे संपूर्ण भागात राजकीय वातावरण तापले आहे. या निवडणूक प्रचाराला वेगळेच वळण मिळाले आहे ते अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे. मांडवगण-वडगाव रासाई गटात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुजाता पवार, भारतीय जनता पक्षाचे […]

अधिक वाचा..

अजित पवारांनंतर सत्तासंतुलन ढासळलं; सुनेत्रा पवारांसमोर चार मोठी आव्हान

मुंबई: अजित पवारांच्या आकस्मिक निधनानंतर केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सत्तेचा समतोल पुन्हा स्थिर होण्यासाठी वेळ लागणार असतानाच, या परिस्थितीत महायुती सरकारने अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी दिली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या महिलेकडे उपमुख्यमंत्रीपद आलं आहे. हा निर्णय राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा असला तरी, सुनेत्रा […]

अधिक वाचा..