सुनेत्रा पवारांसमोर तिहेरी कसोटी; नेतृत्व, विलिनीकरण आणि चौकशीचा मुद्दा ऐरणीवर

मुंबई: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अप) पक्षाची धुरा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या हाती सोपवण्यात आली आहे. दुःखद घटनेनंतर अवघ्या चार दिवसांत त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाली आणि त्याच दिवशी मुंबईत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ त्यांनी घेतली. या घाईबद्दल राजकीय वर्तुळात टीका झाली असली तरी सुनेत्रा पवार यांनी कोणतीही प्रतिक्रिया […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या विमान दुर्घटनेवर रोहित पवारांचे सवाल; राज्यात युवा नेतृत्व म्हणून ठसठशीत छाप

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणावर आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक तांत्रिक मुद्दे उपस्थित केले असून सखोल आणि पारदर्शक चौकशीची मागणी केली आहे. अपघातातील तांत्रिक बाबींवर शंका रोहित पवार यांनी ब्लॅक बॉक्सची स्थिती, विमानात अतिरिक्त इंधन होते का, अपघाताच्या शेवटच्या क्षणी ट्रान्सपॉन्डर […]

अधिक वाचा..

महाविकास आघाडीत राज्यसभा जागेवरून रस्सीखेच; ठाकरेंकडून महिला नेत्याला संधीचे संकेत

मुंबई: मार्च महिन्यात होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत (MVA) एकाच जागेवरून चुरस निर्माण झाली आहे. या जागेवर आपला दावा असल्याचे सांगत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पक्षाकडे सर्वाधिक 20 आमदार असल्याचा दावा करत ही जागा शिवसेनेकडेच यावी, अशी भूमिका मांडली जात आहे. दुसरीकडे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस देखील या जागेसाठी […]

अधिक वाचा..

अधिवेशनकाळात एकनाथ शिंदे यांच्या खात्यांची तात्पुरती फेरवाटप; कारण काय?

मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे असलेली काही महत्त्वाची खाती शिवसेनेतील इतर मंत्र्यांकडे तात्पुरत्या स्वरूपात सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र पाठवले आहे. कोणाकडे कोणते खाते? पत्रानुसार पुढीलप्रमाणे जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत: सार्वजनिक बांधकाम विभाग – दादा भुसे नगरविकास मंत्रालय – उदय सामंत गृहनिर्माण विभाग […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या मृत्यूचा तपास थातूरमातूर नको, अन्यथा…

मुंबई: अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, या प्रकरणाच्या तपासावरून संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार Rohit Pawar यांनी या संपूर्ण प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत सखोल आणि पारदर्शक चौकशीची जोरदार मागणी केली आहे. “चौकशी नावापुरती नको” “अजित पवार यांच्या मृत्यूची चौकशी केवळ नावापुरती नको, तर ती सखोल आणि पारदर्शक व्हायला हवी. […]

अधिक वाचा..

मंत्रालयातील ‘लक्ष्मीदर्शन’ प्रकरणावरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल; चहापानावर बहिष्कार

मुंबई: राज्यातील महायुती सरकारच्या कथित भ्रष्ट कारभाराचा निषेध करत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित अधिकृत चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला. मंत्रालयात सुरू असलेल्या ‘लक्ष्मीदर्शन’ प्रकारावरून तसेच घटनात्मक पदांच्या कथित अवमानावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूबाबतही प्रश्न उपस्थित केले. हा घातपात की अपघात, याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी […]

अधिक वाचा..

रोहित पवारांचा विमान अपघात प्रकरणात घाताचा संशय; केंद्रीय मंत्री राम नायडूंवर टीका

बारामती: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणानंतर अनेक राजकीय आरोप-प्रत्यारोपांची धारा सुरू आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी शनिवारी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात गंभीर आरोप केले. त्यांनी म्हटले की, हा अपघात नाही, तर घात झाल्याची शक्यता आहे. रोहित […]

अधिक वाचा..

मुंबईत युवक काँग्रेसचा भाजप कार्यालयासमोर निषेध आंदोलन; कार्यकर्ते ताब्यात

मुंबई: वसंत स्मृती येथील भाजप कार्यालयासमोर आज मुंबई युवक काँग्रेसच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत भाजपविरोधात निषेध व्यक्त केला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजप कार्यालयासमोर प्रतीकात्मक फुलांचा वर्षाव करून […]

अधिक वाचा..

राहुल गांधी भारतीय जनता पक्षाच्या धमक्यांना घाबरणारे नेते नाहीत; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई विमानतळावर राहुल गांधी यांचे काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत मुंबई: जननायक राहुल गांधी हे देशहितासाठी निडर आणि बेधडकपणे काम करत आहेत. देशातील लोकशाही व संविधान रक्षणासाठी ते कशाचीही तमा न बाळगता लढत आहेत. स्वतःच्या जिवाला धोका असतानाही कन्याकुमारी ते काश्मीर व मणिपूर ते मुंबई अशी हजारो किलोमिटरची पदयात्रा काढून ‘भारत जोडो’ व ‘डरो […]

अधिक वाचा..

सांगली जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेचा तिढा कायम; राष्ट्रवादीत खल, अंतिम निर्णय सुनेत्रा पवारांकडे

सांगली: सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीचा कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नसतानाही सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. भाजपकडून महायुती म्हणून सत्ता स्थापन करण्याचा विश्वास व्यक्त केला जात असला, तरी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत मात्र एकमत झालेलं नाही. सहा सदस्य आणि सहा नेते अशी परिस्थिती निर्माण झाल्याने अंतर्गत चर्चा आणि बैठकींचे सत्र सुरू आहे. राष्ट्रवादीत अंतर्गत खलबते […]

अधिक वाचा..