महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा खळबळ! महायुतीत तणाव; मंत्री भरत गोगावले यांचा भाजप-राष्ट्रवादीला थेट इशारा

रायगड: महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवणारी घडामोड रायगड जिल्ह्यातून समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर महायुतीतील तणाव उघडपणे समोर येऊ लागला असून, महायुती सरकारमधील मंत्री भरत गोगावले यांनी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांना थेट इशारा दिला आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तास्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाला सत्तेबाहेर ठेवत भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येत असल्याची […]

अधिक वाचा..

सांगली जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेचा पेच; जयंत पाटील मैदानात, रोहित पाटील यांचा ठाम शब्द

सातारा: साताऱ्यानंतर आता सांगली जिल्हा परिषद (Sangli Zilla Parishad) मध्येही सत्तास्थापनेचा पेच कायम असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यादृष्टीने सांगलीत पक्षाचे नेते, आमदार आणि जिल्हा परिषद सदस्यांची बैठक पार पडली. या बैठकीत आमदार रोहित पाटील (Rohit […]

अधिक वाचा..

राजकीय उलथापालथ; ठाकरे गटाचे विलीनीकरण, काँग्रेसचे संख्याबळ वाढले

अमरावती: राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होऊन महिना उलटला असला तरी काही ठिकाणी सत्तासमीकरणांची जुळवाजुळव अद्याप सुरू आहे. अमरावती महानगरपालिकेत तर स्थायी समिती आणि स्वीकृत सदस्य निवडीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय उलथापालथ घडली आहे. काँग्रेसचे बळ वाढले, वंचितचा पाठिंबा निवडणुकीच्या तोंडावर वंचित बहुजन आघाडीच्या एका सदस्याने काँग्रेस गटात विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे काँग्रेसप्रणीत […]

अधिक वाचा..
ajit pawar

अजित पवार यांच्यावर स्मरणग्रंथ होणार प्रकाशित; शिरूरकरांना आठवणी पाठविण्याचे आवाहन…

शिरुर (तेजस फडके) राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यभरातून शोकभावना व्यक्त केल्या जात आहेत. शिरूर तालुक्यातही त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत असून, शिरूर तालुक्याशी असलेल्या त्यांच्या जिव्हाळ्याच्या नात्याच्या अनेक आठवणी पुन्हा उजाळल्या जात आहेत. अजित पवार यांचे शिरूर तालुक्यावर विशेष प्रेम होते. विकासकामे, पायाभूत सुविधा, उद्योग, पाणीपुरवठा, शेती आणि विविध प्रशासकीय प्रश्नांबाबत त्यांनी […]

अधिक वाचा..

शिवप्रेमींची दिलगिरी! भाजपावर हल्लाबोल; टिळक भवन बैठकीत काँग्रेसचा आक्रमक सूर

मुंबई: भाजपाने माझ्या विधानातील एका शब्दाचा संदर्भ तोडून जाणीवपूर्वक विपर्यास केला, सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या मोहिमा चालवून मी जे बोललोच नाही ते माझ्या तोंडी घातले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केली, असा चुकीचा समज निर्माण केला आला. भाजपा आणि त्यांच्या पिलावळीकडून हा अपप्रचार नियोजनपूर्वक पसरवण्यात आला व त्याआधारे राज्यात धार्मिक तेढ निर्माण करून दंगली घडवण्याचा […]

अधिक वाचा..

सुनेत्रा वहिनी अन् पार्थ पवारांनी मौन का सोडलं नाही?

मुंबई: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच अधिकृत स्तरावर महत्त्वाची माहिती समोर आली आहे. एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) ने दिलेल्या निवेदनानुसार, अपघातग्रस्त विमानातील फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर (CVR) हे दोन्ही रेकॉर्डर भीषण आगीत बराच वेळ राहिल्यामुळे उच्च तापमानाचा गंभीर परिणाम सहन करावा लागला. तरीही तपास यंत्रणेला काही महत्त्वाचा […]

अधिक वाचा..

पुष्पगुच्छ नको, महापौर निधीस हातभार लावा; महापौर रितू तावडे यांचे आवाहन

मुंबई: मुंबईकरांनी स्वागतासाठी शाल–पुष्पगुच्छ आणण्याऐवजी महापौर निधीस आर्थिक मदत करावी, असे आवाहन मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी केले आहे. महापौर म्हणून मिळणारे संपूर्ण मानधन स्वतः महापौर निधीस देत असल्याचे सांगत त्यांनी नगरसेवक, तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकाचे अधिकारी व कर्मचारी यांनीही या निधीस आर्थिक हातभार लावावा, असे आवाहन केले. या निधीतून दुर्धर आजारांनी ग्रस्त असलेल्या गरजू रुग्णांना […]

अधिक वाचा..

‘जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी थांबणार नाही’; हर्षवर्धन सपकाळ यांचा भाजपवर घणाघात

मुंबई: अदानी-अंबानी आणि अमेरिकेचे भले करणाऱ्या तसेच संविधान बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजपचा पर्दाफाश करत राहणार असल्याचा ठाम इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला. भाजपाला माझी जीभ कापायची असेल तर खुशाल कापा, पण मी थांबणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. सपकाळ म्हणाले की, काही भाजपा आमदार व नेत्यांनी “माझी जीभ कापून आणणाऱ्याला […]

अधिक वाचा..
nirmala-navale

Video: कारेगावच्या सरपंच मॅडमला पुन्हा डिवचलं…

शिरूर: कारेगावमध्ये (ता. शिरूर) पंचायत समिती निवडणुकीनंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. कारेगावच्या सरपंच निर्मला नवले यांच्या पराभवानंतर भाजपच्या विजयी उमेदवाराकडून ग्रामपंचायत कार्यालयासमोर नोटांची उधळण केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   View this post on Instagram   A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) पंचायत समिती कारेगाव गणातून भाजपच्या मनीषा पाचंगे […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात राजकीय खळबळ! शिंदे गटात राजीनामा, भाजपात गटबाजी, ठाकरे गटात निलंबनाची टांगती तलवार

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात एकाच वेळी अनेक घडामोडींनी वेग घेतला आहे. शिंदे गटातील तडकाफडकी राजीनामा, भाजपातील उफाळलेली गटबाजी, ठाकरे गटातील नगरसेवकांवरील कारवाईची शक्यता, तसेच टिपू सुलतान वादावरून आरोप-प्रत्यारोप… या सर्व घटनांनी राजकीय वातावरण तापले आहे. शिंदेंच्या शिलेदाराचा तडकाफडकी राजीनामा सिंधुदुर्ग येथील शिंदे गटाचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. […]

अधिक वाचा..