मोबाईल टॉवरमधून २० हजारांची कॉपर केबल चोरी

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील प्रीतमप्रकाश नगर येथील मोबाईल टॉवर (इंडस टॉवर क्र. 1052242) येथून अज्ञात चोरट्याने तब्बल २०,००० रुपयांच्या कॉपर व सोलर केबल्सची चोरी केली आहे. ही घटना १३ जून रोजी संध्याकाळी ५ ते १४ जून रोजी रात्री २.३५ च्या दरम्यान घडली आहे. याबाबत फिर्याद युवराज ईरभान वानखेडे (वय ५६), रा. कुंभारवाडा, शिक्रापूर यांनी […]

अधिक वाचा..

घोड धरणात वाळूचोरी… ११२ ला कॉल अन तब्बल तीन तासात तत्परता दाखवत पोलिस हजर

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील घोड धरणात गेल्या दोन वर्षांपासुन बेकायदेशीररीत्या वाळू उपसा चालु असुन महसूल आणि पोलिस विभाग जाणीवपुर्वक या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. यांत्रिक बोटीच्या साह्याने घोड धरणातुन बेकायदेशीररीत्या वाळू उपसा चालु असल्याबाबत एका जागरुक युवकाने डायल ११२ ला कॉल केला. पण शिरुर पोलिस मात्र तब्बल तीन तासानंतर तत्परता दाखवत घटनास्थळी हजर झाले. […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील एका शिक्षकाचा प्रताप; आदिवासी महिलेची केली छेडछाड

शिक्रापुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत असताना शिरुरच्या पश्चिम भागातील एका गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असणाऱ्या एका अंदाजे ४५ वर्षीय शिक्षकाने घरी कोणी नसल्याचा गैरफायदा घेत एका आदिवासी समाज्यातील महिलेची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. खात्रीलायक सूत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार हा शिक्षक काही खाजगी कामानिमित्त पिडीत महिलेच्या घरी गेला […]

अधिक वाचा..

शिरुर; पारोडीत वीज पडून दुमजली बंगल्याचे नुकसान घरातील सर्व विद्युत उपकरणे जळून खाक

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील पारोडी गावात मंगळवार (दि १२) जुन रोजी रात्री ८:४५ च्या दरम्यान किरण टेमगिरे यांच्या दुमजली बंगल्यावर वीज कोसळून घराचे मोठे नुकसान झाले आहे. विजेचा जोरदार धक्का बसल्याने बंगल्यावरील टोपीचा काही भाग जमिनीत कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र सुमारे २ लाख ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले […]

अधिक वाचा..

आमदार माऊली कटके यांच्या दुर्लक्षाने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी…?

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तहसील कार्यालयाच्या आवारात आमदाबाद-मलठण या खराब रस्त्याच्या कामाबाबत आणि कोंढण ओढयाच्या पुलाच्या चुकीच्या कामाविषयी सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आणि उपोषण आंदोलन सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या शांततापूर्ण आंदोलनाला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. मात्र या आंदोलनाकडे शासकीय यंत्रणेच्या दुर्लक्षामुळे संतापाची […]

अधिक वाचा..

निमोणेकरांनी जपली माणुसकी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या थोरात यांच्या कुटुंबियांना लाखोंची आर्थिक मदत

शिंदोडी (तेजस फडके) निमोणे (ता. शिरुर) येथील हॉटेल व्यावसायिक बाळासाहेब रंगनाथ थोरात यांचा करडे (ता. शिरुर) येथे (दि ८) जुन रोजी अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुःखाच्या प्रसंगी निमोणे ग्रामस्थांसह अनेक नातेवाईकांनी थोरात कुटुंबीयांना धीर दिला. तसेच निमोणे गावातील काही सोशल मिडिया ग्रुपच्या माध्यमातुन ग्रामस्थांनी या कुटुंबाला आर्थिक […]

अधिक वाचा..

मळगंगा कुंड मृत्यू प्रकरण; पोलिसांच्या दुर्लक्षामुळे नातेवाईकांची परवड, संतप्त नागरिकांची पोलिस प्रशासनावर टिका

शिरूर (अरुणकुमार मोटे): मळगंगा कुंडात पडून २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची गंभीर घटना समोर आली असतानाही, पोलिस प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मृतदेह तब्बल अनेक तास कुंडातच पडून राहिलाआहे. नगर-पुणे जिल्ह्याच्या सीमेच्या वादात पारनेर पोलिस व शिरूर पोलिसांनी जबाबदारी झटकत कारवाईस टाळाटाळ केल्याने नातेवाईकांसह ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव शिवा दाराभाऊ ठाकरे (वय २८ वर्षे) […]

अधिक वाचा..

माजी विद्यार्थ्यांनी ४० वर्षांनी पुन्हा भरवली शाळा; १९८६च्या आठवणींना दिला हृदयस्पर्शी उजाळा

शिरूर (अरुणकुमार मोटे): “शाळा म्हणजे केवळ शिक्षणाचे ठिकाण नाही, तर ती आठवणींची ठेव असते” हे विधान खरं ठरवत १९८६ साली दहावीमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांनी तब्बल ४० वर्षांनंतर पुन्हा शाळेत हजेरी लावली. मलठण येथील रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मलठण मध्ये ६० माजी विद्यार्थी एकत्र जमून आपल्या बालपणाच्या आणि शालेय जीवनाच्या आठवणींना नव्याने उजाळा दिला. पन्नाशीत […]

अधिक वाचा..

वाघाळे गावात बिबट्याचे दर्शन; ग्रामस्थांमध्ये घबराहट, पिंजरा लावण्याची मागणी

रांजणगाव गणपती (किरण शेलार-पिंगळे) शिरुर तालुक्यातील वाघाळे गावात माजी सरपंच पप्पु भोसले यांच्या घराजवळ काल (दि ११) रोजी बिबटया दिसल्याने नागरीक भयभीत झाले आहेत. या बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने तातडीने पिंजरा लावला अशी मागणीही ग्रामस्थांनी केली आहे. चासकमानच्या पाण्यामुळे वाघाळे गावातील अनेक एकर जमीन ओलिताखाली आली असुन गावात ऊस पिकाचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. […]

अधिक वाचा..

उरळगाव येथे ऊस पिक परिसंवादाचे कृषी विभाग व ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

न्हावरे (तेजस फडके) महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि ग्रामपंचायत कार्यालय उरळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस पिक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या परिसंवादात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. संदीप घोले, राजेश थोरात आणि योगेश गाडे उपस्थित होते. डॉ. घोले यांनी ऊस लागवडीत वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली. त्यांनी तण नियंत्रण, […]

अधिक वाचा..