औरंगाबाद: चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीसह अडीच वर्षाच्या मुलाची गळा दाबून हत्या केल्याची धक्कादायक घटना शहरातील कांचनवाडी परिसरात आज सकाळी घडली असून आरती समीर म्हस्के (वय २९, रा. भाग्यनगर, आनंदविहार रोड), निशांत समीर म्हस्के अशी मृतांची नावे आहेत.
औरंगाबाद शहरातील सातारा पोलिसांनी आरोपी पती समीर विष्णू म्हस्के याला ताब्यात घेतले आहे. समीरच्या आईचाही आरोपींमध्ये समावेश आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रशांत पोतदार यांनी दिली.
आरोपीनेच फोन करुन दिली गुन्ह्याची माहिती
चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी आणि मुलाचा गळा आवळून खून केल्याची माहिती आरोपीनेच फोन करुन पोलिसांना दिल्याचे, पोलीस उपनिरीक्षक संभाजी गोरे यांनी सांगितले