कोविडमुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांची फी माफ या निर्णयाची अंमलबजावणी करावी…

महाराष्ट्र

मुंबई: कोविड काळात ज्या विद्यार्थ्यांचे आई, वडील मयत झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांचे पदवी/पदव्युत्तर शिक्षण अर्धवट राहू नये किंवा ते विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत. यासाठी त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत संपूर्ण फी माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्या निर्णयाची यावर्षीही काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी, अशा सूचना उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

विद्यार्थी हित लक्षात घेता अशा विद्यार्थ्यांच्या शिक्षणामध्ये खंड पडू नये, किंवा त्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये,यासाठी विद्यापीठ, अनुदानित महाविद्यालय यांनी याकडे विशेष लक्ष द्यावे, असेही उच्च तंत्रशिक्षण मंत्री पाटील यांनी सांगितले.