शिरुर (किरण पिंगळे-शेलार) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिरुर शहर महिला आघाडी तसेच रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्था यांच्या वतीने आज (दि ९) रोजी नागपंचमीचे औचित्य साधुन वारुळाला दुध ओतण्याऐवजी समाजातील वंचित घटकातील मुलांना दुध देण्यात आले.
नागपंचमी हा सण ग्रामीण तसेच शहरी भागात मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. महिलां फेर धरुन गाणी म्हणतात तसेच वारुळाला जाऊन त्याचे पुजन करुन नागपंचमी साजरी केली जाते. बऱ्याच ठिकाणी दूध आणि लाह्या त्या वारुळ मध्ये ओतल्या जातात. नाग दूध पितो असा महिलांचा समज आहे. परंतु वारुळामध्ये ओतलेले दुध वायाला जाते. त्या ऐवजी ते दुध गोरगरीब मुलांना प्यायला दिल्यास उपयोगी येते.
त्यामुळे नागपंचमीला आपण दुध वारुळामध्ये न ओतता त्यावेळी ते दुध वारुळाच्या मातीत मध्ये झिरपुन वायाला जाते. तेच दुध ज्या मुलांना दुध प्यायला मिळत नाही, गोड जेवण मिळत नाही, तिथे ते दिले पाहिजे. म्हणुन सर्व महिलांनी आपला दृष्टीकोन बदलुन गरजूंना मदत करावी. तरच खऱ्या अर्थाने नागपंचमी हा सण साजरा होईल असे मत रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले यांनी व्यक्त केले.
शिरुर येथील नेत्ररोग तज्ञ डॉ सोनल भालेकर यांच्या मुलीचा वाढदिवस आणि नागपंचमी एकाच दिवशी असल्याने त्यांनी मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजातील वंचित घटकातील मुलांना दुध व पुरण पोळीचे जेवण दिल्याने या लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. यावेळी राणी कर्डिले, डॉ स्मिता कवाद, राणी शिंदे, रुपाली बोर्डे, ज्योती पारधी, शितल कापरे, ज्योती दळवी, माया दळवी व अनेक महिला उपस्थित होत्या.
शिरुर येथील बहुचर्चित बीओटी प्रकल्पातील ठेकेदाराकडुन महीलेची फसवणुक; मुख्यमंत्र्याकडे केली तक्रार
शिरुर; सासऱ्याचा सुनेबरोबर झाला वाद अन सुनेच्या दोन भावांनी व बहिणीने सासर्याला केले ठार
कारेगाव येथील यश इन चौकात हाकेच्या अंतरावर पोलिस स्टेशन असुनही खुले आम चालतोय वेश्या व्यवसाय…?