डॉ. नितीन सोनवणे यांना महात्मा गांधी शांती पुरस्कार प्रदान

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील डॉ. नितीन सोनवणे यांना नुकतेच नॅशनल ह्यूमन राइट्स फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने देण्यात येणारा महात्मा गांधी शांती पुरस्कार २०२२ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील डॉ. नितीन सोनवणे यांनी अनेक सामाजिक कामे करत शालेय मुलांचा गुणगौरव, शालेय मुलांना मदत करत शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी बिबट्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जनावरांवर मोफत उपचार केले आहेत, तर शिक्रापूर येथील कचरा समस्या तर करंदी येथील शौचालय याबाबत आवाज उठवला आहे.

शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी प्राणीमित्रांना मिळून आलेल्या जखमी प्राण्यांसह पक्षांवर देखील मोफत उपचार केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत नॅशनल ह्यूमन राइट्स फेडरेशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मुंबई पोलीस आयुक्त कैजर खालिद यांच्या हस्ते महात्मा गांधी शांती पुरस्कार २०२२ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

याप्रसंगी ठाणे चे उपायुक्त योगेश चव्हाण, वीरचक्र विजेते कॅप्टन अरुण माळी, नॅशनल ह्युमन राईट्स फेडरेशनचे ठाणे जिल्हाध्यक्ष अब्दुल जब्बर शेख, शब्बीर खान, प्रशांत ढोले, दीपक पुजारी यांसह आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते. तर डॉ. नितीन सोनवणे यांना पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचे परिसरातून कौतुक होत तर याबाबत बोलताना केलेल्या कार्याचा गौरव असून यामुळे पुढील कामांना प्रेरणा मिळाली असल्याचे डॉ. नितीन सोनवणे यांनी सांगितले.