आंबेगावचा बिहार झालाय का…? पत्रकार स्नेहा बारवे यांच्यावर गावगुंडांचा हल्ला

शिरुर (तेजस फडके): समर्थ भारत या वृत्तपत्राच्या संपादिका स्नेहा बारवे आणि त्यांचे सहकारी पत्रकार समीर राजे यांना मंचर येथील एका राजकीय पुढाऱ्याने आणि त्यांच्या नातेवाईकांनी अश्लील शिवीगाळ, धक्काबुक्की करत, मारहाण केली असून याबाबत पोलिसांत तक्रार दिल्यास या गुंडांनी पत्रकार स्नेहा बारवे आणि समोर राजे यांना जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिलीये. या घटनेने पुणे जिल्ह्यात […]

अधिक वाचा..

सविंदणेत बिबट्याने शेळीवर हल्ला केला अन…

शिरूर (अरुणकुमार मोटे): सविंदणे (ता. शिरूर) येथील नाथनगर येथे गोठ्यातील शेळीवर हल्ला करून शेळीला घेऊन जात असताना जवळील विहिरीचा अंदाज न आल्याने बिबट्या शेळीला घेऊन थेट विहिरीत कोसळला. सदर घटना मंगळवारी (दि.१८) रोजी पहाटेच्या सुमारास घडली. त्यांनतर वनविभागाच्या रेस्क्यू टिमने शर्थीचे प्रयत्न करत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढून ताब्यात घेतले. सविंदणे (ता. शिरूर) येथील नाथनगर येथे […]

अधिक वाचा..

शिक्रापुरच्या माजी उपसरपंचावर प्राणघातक हल्ला, उपचारापुर्वीचं मृत्यू

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिक्रापुरचे माजी उपसरपंच व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बंडू गिलबिले (वय ५१) यांची आज (दि १) रोजी दुपारी १२:१५ च्या सुमारास एका अज्ञात तरुणाने धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करत निर्घृण हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असुन यामुळे शिक्रापुर परिसरातील वातावरण तणावग्रस्त झाले आहे. या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ […]

अधिक वाचा..

ज्येष्ठ पत्रकार निखील वागळे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी; शीतल करदेकर

मुंबई: जेष्ठ पत्रकार निखिल वागळे व सहकाऱ्यांवर पुण्यात हल्ला करण्यात आला. याचा तीव्र निषेध तसेच या हल्लेखोर गुंडावर कठोर कारवाई सरकारने  करायला हवी, अशी  महाराष्ट्राचे गृहमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांना मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या (माई) संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर यांनी केली आहे. वागळेंच्या कार्यक्रमाची पोलीसांना पूर्व सूचना दिली होती. त्यांनी कार्यक्रमाची पुर्व  परवानगीही मागितली होती, […]

अधिक वाचा..

शिक्रापुरातील कुटुंब मनालीला तर चोरट्यांचा घरावर डल्ला

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण रोडलगत असलेले कुटुंब कुलूमनाली शिमला येथे फिरायला गेलेले असताना चोरट्यांनी बंगल्याच्या दरवाजाचे कुलूप तोडून बंगल्यातील सोन्या चांदीचे दागिन्यांसह रोख रक्कम असा साडे आठ लाखांचा ऐवज चोरून नेला असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे 4 अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील येथील सुभाष धुमाळ […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात पिसाळलेल्या कोल्हयाचा तीन शेतकऱ्यांवर हल्ला…

शिरुर (अरुणकुमार मोटे): बेट भागात बिबटयाच्या हल्ल्यानंतर आता कोल्हयानेही शेतकऱ्यांवर हल्ला चढवला असून तीन शेतकऱ्यांना गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना समोर आलीआहे. शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील तामखरवाडीचे शेतकरी दशरथ मारुती मुंजाळ (वय ७०) , पूजा विनोद कळकुंबे (वय २५), सुरेश मारुती चोरे (वय ४०) या 3 व्यक्तींवर कोल्हयाकडून वेगवेगळ्या ठिकाणी सोमवारी चार ते पाच […]

अधिक वाचा..

कर्नाटकाकडून मराठी बांधवांवर हल्ले होत असताना मुख्यमंत्री गप्प कसे?

मुंबई: सीमा भागात कर्नाटकातून मराठी बांधवांवर होत असलेले हल्ले अत्यंत गंभीर असून सीमा प्रश्नाने वेगळे वळण घेतले आहे. महाराष्ट्रातील ट्रक, बस व वाहनांची तोडफोड केली जात आहे. महाराष्ट्र कर्नाटकची अशा प्रकारची दंडेली सहन करणार नाही. सीमाप्रश्नावर महाराष्ट्रातील विरोधी पक्ष चिंता व्यक्त करुन मराठी बांधवांच्या पाठीशी उभे राहिले पण मुख्यमंत्री मात्र गप्पच आहेत. सीमा प्रश्नावर महाराष्ट्राची […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या सरपंचांवर हल्ला करणाऱ्यांना अटक करा

सरपंच रमेश गडदे यांच्यावरील हल्ल्याचा सभेतून निषेध शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सरपंच रमेश गडदे यांच्यावर चार दिवसांपूर्वी गावातील काही युवकांनी हल्ला करत मारहाण केली असल्याने गावातील आम्ही शिक्रापूरकर ग्रुपच्या युवकांनी नुकतेच निषेध सभेचे आयोजन केले होते. यावेळी हल्ला करणाऱ्यांना तातडीने अटक करुन त्यांच्यावर कठोर शासन करण्याची मागणी करत पोलिसांना निवेदन देण्यात आले. […]

अधिक वाचा..

बिबट्याने हल्ला केलेल्या त्या तरुणीवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार…

शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबूत (ता. शिरुर) येथे बुधवार (दि. १२) रोजी बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या पूजा नरवडे या तरुणीवर काल गुरुवार (दि.१३) रोजी सकाळी जांबूत (ता. शिरुर) येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अद्यापपर्यंत या भागात तीन जणांना बिबट्याच्या हल्ल्यात आपले प्राण गमवावे लागल्याने संतप्त झालेल्या जांबूत ग्रामस्थांनी प्रशासनाला धारेवर धरत गावच्या मुख्य चौकातच अंत्यसंस्कार […]

अधिक वाचा..

अब्दुल सत्तार भयंकर चिडले आणि थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पीएलाच झापले…

औरंगाबाद: विकास कामांचा आढावा घेतला निधी न मिळाल्याचा मुद्दा उपस्थित करत अब्दुल सत्तार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खासगी सचिव यांच्यात जोरदार बाचाबाची होऊन सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांचे खाजगी सचिव अर्थात ओएसडी यांच्यासोबत बाचाबाची केल्याचे समजते. 100 दिवसांपासून मतदार संघाला निधी न मिळाल्याने, तसंच इतर कामं न झाल्याने सत्तार भडकल्याचे समजते. सरकार स्थापन होऊन 100 दिवस […]

अधिक वाचा..