मुंबई: जेष्ठ पत्रकार निखिल वागळे व सहकाऱ्यांवर पुण्यात हल्ला करण्यात आला. याचा तीव्र निषेध तसेच या हल्लेखोर गुंडावर कठोर कारवाई सरकारने करायला हवी, अशी महाराष्ट्राचे गृहमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांना मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या (माई) संस्थापक अध्यक्ष शीतल करदेकर यांनी केली आहे.
वागळेंच्या कार्यक्रमाची पोलीसांना पूर्व सूचना दिली होती. त्यांनी कार्यक्रमाची पुर्व परवानगीही मागितली होती, पण त्यांना खूप वेळ रोखून धरले आणि जाताना त्यांच्यावर समाजकंटकानी जिवघेणा हल्ला केला. हे निंदनीय आहे, हल्लेखोर कोणत्याही पक्षाचे असोत कारवाई व्हायलाच हवी, असे स्पष्ट मत माई चे संस्थापक सरचिटणीस डॉ. सुभाष सामंत यांनी व्यक्त केले.