राज्यसभा जागेवर काँग्रेसचा ठाम दावा; महाविकास आघाडीची निर्णायक बैठक

मुंबई: आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी माध्यमांशी संवाद साधत आघाडीची भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने राष्ट्रीय राजकारणाचा विचार करून राज्यसभेची जागा काँग्रेसला मिळावी, असा प्रस्ताव पक्षाच्या वतीने मांडण्यात आल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले. बैठकीत नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी […]

अधिक वाचा..

इंडिया ऑल इम्पॅक्ट सुममित मध्ये गोंधळ; एकनाथ शिंदे यांची काँग्रेसवर टीका

मुंबई: भारताचे तंत्रवैभव जगासमोर मांडले जात असताना भारत मंडपम येथे युथ काँग्रेस कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करत शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसवर तीव्र टीका केली. इंडिया ऑल इम्पॅक्ट सुममित च्या पार्श्वभूमीवर झालेल्या या प्रकाराला त्यांनी “देशप्रेम नव्हे, तर देशद्रोह” असे संबोधले. काँग्रेसने आणि त्यांच्या […]

अधिक वाचा..

भारत–अमेरिका व्यापार कराराविरोधात काँग्रेसचा एल्गार; ७ मार्चला यवतमाळात आंदोलन; विजय वडेट्टीवार

नागपूर: भारत–अमेरिका नव्या व्यापार करारामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. या कराराविरोधात काँग्रेसकडून राज्यभर आंदोलन छेडण्यात येणार असून ७ मार्च रोजी यवतमाळ येथे मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. दिल्ली येथे काँग्रेस पक्षश्रेष्ठींसोबत झालेल्या बैठकीत भारत–अमेरिका व्यापार करार आणि त्याचे शेतकऱ्यांवर होणारे परिणाम […]

अधिक वाचा..

शिवरायांचा काँग्रेसकडून अवमान? उद्धव ठाकरे गप्प का? भाजपा माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा सवाल

मुंबई: स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना टिपू सुलतानशी केल्याच्या आरोपावरून राजकीय वातावरण तापले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून भाजपाने तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे.भारतीय जनता पार्टीचे माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यावर थेट निशाणा साधला. “शिवरायांचा अवमान होत असताना तीन दिवस उलटूनही उद्धव ठाकरे गप्प […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या ‘विमुक्त जाती व भटक्या जमाती विभागा’च्या प्रमुखपदी ॲड. पल्लवी रेणके

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत असलेल्या ‘विमुक्त जाती व भटक्या जमाती सेल’चे रूपांतर आता ‘विमुक्त जाती व भटक्या जमाती विभाग’ असे करण्यात आले आहे. या नव्या विभागाच्या प्रमुखपदी ॲड. पल्लवी रेणके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशानुसार जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रात विमुक्त जाती व भटक्या जमातींची लोकसंख्या […]

अधिक वाचा..

मंत्रालयात लाचखोरी प्रकरण: मंत्री नरहरी झिरवळ यांच्या राजीनाम्याची काँग्रेसची मागणी

मुंबई: राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील कर्मचाऱ्याला मंत्रालयात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित मंत्री कार्यालय सील केले आहे. या घटनेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका सुरू केली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंत्री झिरवळ यांच्या तात्काळ […]

अधिक वाचा..

भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने शिवसेना (उबाठा)ला पाठिंबा देऊन आघाडी धर्म पाळला

चंद्रपुरात शिवसेना (उबाठा)ने घेतलेली भूमिका चुकीचीच, पक्षपातळीवरून चुकीचे होणारे समर्थन काँग्रेस कदापी खपवून घेणार नाही मुंबई: चंद्रपुरात शिवसेना (उबाठा)ने भाजपाला पाठिंबा देऊन आघाडीचा धर्म पाळला नाही पण काँग्रेसने मात्र परभणी महापौरपदाच्या निवडणुकीत आघाडीचा धर्म पाळला आहे. परभणीमध्ये शिवसेना (उबाठा)चा महापौर व काँग्रेसचा उपमहापौर झाला आहे. भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी, इंडिया आघाडी, मविआ, लोकशाही तसेच संविधानासाठी […]

अधिक वाचा..

केंद्र सरकारच्या कामगार कायद्याविरोधातील उद्याच्या ‘भारत बंद’ला काँग्रेसचा पाठिंबा

मुंबई: केंद्रातील भाजपा सरकारने कामगार कायद्यात केलेल्या बदलाला देशभरातून तीव्र विरोध केला जात आहे. या कामगार कायद्यांविरोधात देशभरातील दहा कामगार संघटनांनी उद्या गुरुवार दिनांक १२ फेब्रुवारी २०२६ रोजी भारत बंदची हाक दिली आहे. शेतकऱ्यांच्या विविध संघटनांनीही या भारत बंदला पाठिंबा दिला असून अखिल भारतीय काँग्रेस कमिटीनेही उद्याच्या भारत बंदला पाठिंबा दिलेला आहे. केंद्र सरकारने कामगार […]

अधिक वाचा..

राज्यातील दोन जिल्हा परिषदांमध्ये काँग्रेसची सत्ता तर दोन ठिकाणी सत्तेत सहभागी; हर्षवर्धन सपकाळ

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेसचा विचार व संघटन विस्तारासाठी स्वबळावर लढलो मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका काँग्रेसचा विचार व संघटनेचा विस्तार करण्यासाठी स्वबळावर लढवल्या. काही ठिकाणी राजकीय परिस्थिती पाहून स्थानिक पातळीवर युती वा आघाडी करण्यात आली होती. या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असल्याने त्यांना जास्तीत जास्त संधी दिली पाहिजे, जे की आघाडी केल्यानं मिळू शकत नाही. […]

अधिक वाचा..

काँग्रेसचा धक्कादायक विजय; ऋषिकेश लाड यांनी धनश्री लाड यांचा पराभव करत वचपा काढला

कुंडल: कुंडल जिल्हा परिषद गटात काँग्रेसने मोठा राजकीय धक्का देत भाजपला पराभवाचा सामना करायला लावला आहे. काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजित कदम यांचे भाचे ऋषिकेश महेंद्र लाड यांनी भाजपच्या धनश्री शरद लाड यांचा पराभव करत लक्षवेधी विजय मिळवला. मागील निवडणुकीत धनश्री लाड यांचे पती व भाजप नेते शरद लाड यांनी ऋषिकेश लाड यांचे वडील महेंद्र लाड […]

अधिक वाचा..