खरात म्हणजे महाराष्ट्राचा ‘आसाराम बापू’; हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप

मुंबई: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी तीव्र प्रतिक्रिया देत खरातला थेट आसाराम बापू आणि गुरमीत राम रहिम सिंह यांच्यासारखा संबोधले. महिलांचे शोषण करणाऱ्या या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास “५८ नव्हे तर शेकडो व्हिडिओ समोर येतील,” असा गंभीर दावा त्यांनी केला.गांधी भवन येथे माध्यमांशी बोलताना सपकाळ म्हणाले की, “महाराष्ट्रात अंधश्रद्धाविरोधी कायदा […]

अधिक वाचा..

धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६! संरक्षण की स्वातंत्र्यावर गदा? महाराष्ट्रात नवा वाद पेटला

मुंबई: राज्य सरकारने सादर केलेल्या ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयक २०२६’ मुळे राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापले आहे. बेकायदेशीर, फसवणूक किंवा सक्तीच्या धर्मांतरांवर आळा घालण्याच्या उद्देशाने हे विधेयक मांडण्यात आले असले, तरी त्यातून वैयक्तिक स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षतेवर गदा येत असल्याची तीव्र टीका होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, हा कायदा कोणत्याही धर्माच्या […]

अधिक वाचा..

बेकायदा धर्मांतर रोखण्यासाठी ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026’ विधेयक विधानसभेत

मुंबई: बेकायदा व सक्तीच्या धर्मांतराच्या घटना रोखण्यासाठी आणि दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या उद्देशाने महायुती सरकारने ‘महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026’ हे विधेयक शुक्रवारी विधानसभेत मांडले. राज्य मंत्रिमंडळाने गेल्या आठवड्यात या विधेयकाला मंजुरी दिली असून अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विधेयकाचा उद्देश व प्रमुख तरतुदींची माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अशा प्रकारचा कायदा […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राचे खरे ‘बिग बॉस’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; अंकिता वालावलकर

मुंबई: सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि Bigg Boss Marathi च्या पाचव्या पर्वामुळे घराघरात पोहोचलेली Ankita Walawalkar सध्या सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. अंकिताचे सोशल मीडियावर सुमारे 1.1 मिलियन फॉलोअर्स असून ती विविध सामाजिक विषयांवर मत मांडत समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते. अंकिता म्हणाली की, नेतृत्व, निर्णयक्षमता आणि मार्गदर्शन या तीन गोष्टींचा विचार केला […]

अधिक वाचा..

काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींसाठी त्र्यंबकेश्वरमध्ये उद्या गुरुवार पासून २ दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा

मुंबई: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या उत्तर महाराष्ट्र विभागातील सर्व उमेदवारांसाठी दोन दिवसांच्या निवासी प्रशिक्षण कार्यशाळा त्र्यंबकेश्वर येथे आयोजित केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आयोजित केलेल्या या लोकप्रतिनिधी प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन उद्या गुरुवार दिनांक १२ मार्च रोजी श्रीचंद्र गार्डन लॉन्स येथे होणार असून १३ मार्चला कार्यशाळेची सांगता होणार आहे. […]

अधिक वाचा..
sanjeev-palande-pabal

शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांचे शिबीरातून होणार निराकरण : संजीव पलांडे

शिरूर : ग्रामीण भागातील नागरिकांचे महसूल, जमीन नोंदी, विविध दाखले तसेच शासकीय योजनांशी संबंधित प्रश्न गावपातळीवरच सोडविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा पहिला टप्पा पुणे जिल्ह्यात सुरू करण्यात आला असून मंडळ स्तरावर विशेष शिबिरांचे आयोजन करून नागरिकांच्या तक्रारी आणि प्रलंबित […]

अधिक वाचा..

विकसित महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणारा सर्वसमावेशक अर्थसंकल्प; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

मुंबई: राज्याचा आज सादर झालेला अर्थसंकल्प हा विकसित महाराष्ट्राच्या दिशेने वाटचाल करणारा दूरदृष्टीपूर्ण, सर्वसमावेशक आणि व्हिजन डॉक्युमेंटची प्रभावी अंमलबजावणी करणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केली. दरम्यान मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला यंदाचा अर्थसंकल्प आदरणीय अजितदादा पवार यांना समर्पित केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. […]

अधिक वाचा..

अजितदादांच्या दूरदृष्टीला समर्पित अर्थसंकल्प; विकसित महाराष्ट्राचा पाया; सुनिल तटकरे

मुंबई: यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प अजितदादांना समर्पित करून विकसित महाराष्ट्राचा पाया रचणारा ठरल्याबद्दल महायुती सरकार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी अभिनंदन करत आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प मांडला आहे. त्याच धर्तीवर विकसित महाराष्ट्राचा वेध घेणारा आणि पायाभरणी करणारा हा अर्थसंकल्प असल्याचे तटकरे […]

अधिक वाचा..

विकसित महाराष्ट्र नव्हे, घोषणांचा महाराष्ट्र! राज्याच्या अर्थसंकल्पावर अमोल मातेले यांची घणाघाती टीका

मुंबई: महाराष्ट्र सरकारने सादर केलेला 2026 चा अर्थसंकल्प हा विकसित महाराष्ट्राचा नसून “घोषणांचा महाराष्ट्र” घडविण्याचा अर्थसंकल्प असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ता तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी केली आहे. सरकारने अर्थसंकल्पात प्रगतीशील, शाश्वत, सर्वसमावेशक आणि सुशासन या चार स्तंभांची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात हा अर्थसंकल्प “नाव मोठे […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमध्ये मद्यपानास ‘शून्य सहनशीलता’

चालक-वाहकांची दररोज अल्कोटेस्ट सक्ती मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) सेवेत असताना मद्यपानास पूर्णविराम देण्यासाठी प्रशासनाने ‘शून्य सहनशीलता’ धोरण जाहीर केले आहे. आगारात हजर होणाऱ्या सर्व चालक व वाहकांची दररोज अल्कोटेस्ट मशीनद्वारे तपासणी अनिवार्य करण्यात आली असून योग्य नोंदीनंतरच कर्तव्यावर पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक […]

अधिक वाचा..