पुतळ्यांवरून वाद! महाराष्ट्रात वाढते तणावाचे राजकारण; नियम असूनही संघर्ष का?

अंजनगाव: महाराष्ट्रात महापुरुषांच्या पुतळ्यांवरून पुन्हा एकदा सामाजिक तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या स्थापनेवरून मराठा आणि धनगर समाज आमनेसामने आले असून, परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. खेळोबा देवस्थानाजवळ पुतळा उभारण्यात आल्याने धनगर समाजाने आक्षेप घेतला आहे. ही जागा त्यांच्या देवस्थानाची असल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर मराठा समाजाचे प्रतिनिधी […]

अधिक वाचा..

ठाण्यातून राष्ट्रवादीचा पलटवार! रोहित पवारांचे राजकारण ‘घृणास्पद’; आनंद परांजपे

ठाणे: अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाती निधनावरून आमदार रोहित पवार राजकारण करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी रोहित पवारांचे वर्तन “अत्यंत चुकीचे आणि घृणास्पद” असल्याचे म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील […]

अधिक वाचा..

बीडच्या प्रश्नांसाठी मुंबईत धाव! देवेंद्र फडणवीस यांची भेट; राजकारण तापलं

बीड: मागील वर्षभरापासून बीड जिल्हा राज्यभरात चर्चेचा विषय ठरला आहे. वाढती गुंडगिरी, खंडणीचे प्रकार, दहशत, महिलांवरील अत्याचार, खून आणि दरोडे यामुळे कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ढासळल्याची टीका होत आहे.मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खंडणीसाठी अपहरण व निर्घृण हत्येने संपूर्ण राज्य हादरले होते. या घटनेनंतर जिल्ह्यातील परिस्थिती अधिकच गंभीर बनली. उपमुख्यमंत्री असताना अजित पवार यांनी बीडचे पालकमंत्रीपद स्वतःकडे […]

अधिक वाचा..

अजितदादांच्या विमान अपघातावरून राजकारण तापलं; संजय राऊत–रोहित पवारांवर भाजपाचा हल्लाबोल

मुंबई: दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत संजय राऊत आणि रोहित पवार यांच्यावर “प्रसिद्धी स्टंट” केल्याचा आरोप करत प्रखर टीका केली. भाजपा प्रदेश कार्यालयात बोलताना बन म्हणाले, “अजितदादांच्या निधनानंतर काही नेते रोज उठून तेच मुद्दे मांडत […]

अधिक वाचा..

एकनाथ शिंदेंना भेटलो, उद्या मुख्यमंत्र्यांनाही भेटेन! प्रत्येक भेटीत राजकारण शोधू नका; राज ठाकरे

ठाणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील ‘नंदनवन’ या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले. संभाव्य आघाडी किंवा नव्या राजकीय समीकरणांची चर्चा रंगू लागली असताना राज ठाकरेंनी स्वतः पुढे येत या भेटीमागील कारण स्पष्ट केले. “निवडणुका आत्ता नाहीत; सूचना देण्यासाठी भेटलो” राज ठाकरे म्हणाले, “आपल्याकडे पूर्वीसारखं निकोप राजकारण […]

अधिक वाचा..

आम्ही देखील आमचं दैवत गमावलं आहे; मात्र दुर्दैवी राजकारण शरदचंद्र पवार गटाकडून केलं जातं; आनंद परांजपे

मुंबई: आम्हीदेखील आमचं दैवत गमावलं आहे. आजदेखील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते… पदाधिकारी… लोकप्रतिनिधी हे ‘दादा’ आपल्यात नाहीत या भावनेने शोकाकुल आहेत. त्यात आम्ही एकमेकांना सावरतोय… एकमेकांना धीर देतोय… पण जे काही दुर्दैवी राजकारण शरदचंद्र पवार गटाकडून केलं जातंय ते अत्यंत चुकीचे आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी माध्यमांशी बोलताना नाराजी व्यक्त केली […]

अधिक वाचा..
nirmala-navale

Video: कारेगावच्या सरपंच मॅडमला पुन्हा डिवचलं…

शिरूर: कारेगावमध्ये (ता. शिरूर) पंचायत समिती निवडणुकीनंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे. कारेगावच्या सरपंच निर्मला नवले यांच्या पराभवानंतर भाजपच्या विजयी उमेदवाराकडून ग्रामपंचायत कार्यालयासमोर नोटांची उधळण केल्याचा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.   View this post on Instagram   A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) पंचायत समिती कारेगाव गणातून भाजपच्या मनीषा पाचंगे […]

अधिक वाचा..

मेट्रो स्लॅब दुर्घटनेवरून राजकारण तापले; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: वडाळा–कासारवडवली मुंबई मेट्रो लाईन 4 (ग्रीन लाईन) प्रकल्पांतर्गत मुलुंड येथील एलबीएस रोडवर सुरू असलेल्या कामादरम्यान मेट्रोचा स्लॅब कोसळल्याची गंभीर घटना घडली. या दुर्घटनेत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. सपकाळ यांनी […]

अधिक वाचा..
Deepali-Gawhane

शिरूर! नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या दिपाली गव्हाणे ॲक्शन मोडमध्ये…

न्हावरे (अक्षय टेमगिरे) : शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस गणातील जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल लागून अवघे दोनच दिवस झाले असतानाच नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्या दिपाली राहुल गव्हाणे यांनी कामाला सुरुवात केली आहे. दिपाली गव्हाणे यांनी आपल्या कार्यपद्धतीची वेगळी छाप उमटवण्याचा निर्धार केला आहे. पदाचा आनंद साजरा करण्यापेक्षा जनतेच्या समस्या सोडवण्याला प्राधान्य देणारी त्यांची भूमिका सध्या सर्वत्र […]

अधिक वाचा..
grampanchayat

शिरूर तालुक्यात निवडणूक जल्लोषानंतर शांतता अन् चर्चांना उधाण…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात गेल्या तीन महिन्यांपासून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून गावागावांत रात्रंदिवस प्रचार सुरू होता. मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक ठिकाणी जेवणाच्या पंगती, देवदर्शन यात्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि बैठका घेऊन मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. […]

अधिक वाचा..