सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे शिरूर–मलठण रस्त्याची दुरावस्था कायम; नागरिक संतप्त

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर ते मलठण दरम्यानचा मुख्य मार्ग गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत राहिला आहे. तालुक्यातील दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा रस्ता आजही खड्डेमय अवस्थेत असल्याने वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कोंढण ओढ्याच्या जवळ रस्ता अतिशय खराब झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे.अनेक वेळा डागडुजी करण्यात आली, निधी खर्च झाल्याचे सांगण्यात आले; […]

अधिक वाचा..

शिरुरमधील रुबी हॉल संलग्न हॉस्पिटलवर गंभीर आरोप आयुष्यमान कार्ड असुनही गोरगरीबांची आर्थिक लुट…?

शिरुर (तेजस फडके): शासकीय आयुष्यमान भारत योजना तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे कार्ड असतानाही अपघातग्रस्त गोरगरीब रुग्णांकडुन बळजबरीने हजारो रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार शिरुर येथे उघडकीस आला आहे. अपघातग्रस्तांना मोफत उपचार नाकारत हजारो रुपये उकळल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणात शिरुर येथील रुबी हॉल क्लिनिक (ग्रँट मेडिकल फाउंडेशन संलग्न) आणि […]

अधिक वाचा..

सार्वजनिक बांधकाम यांच्या दुर्लक्षपणामुळे अन्नापुरातील निकृष्ट सिमेंट रस्त्याचे काम अखेर दुबार

सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील अन्नापुर गावठाणातील (रंगाअण्णा पवार यांच्या घरासमोरून अंगणवाडीकडे) जाणाऱ्या दहा लाखांचा निधी असलेल्या सीमेंट रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे निकृष्ट झाल्याबाबत “सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज” यांनी सा.बां. उपविभागाकडे वेळोवेळी प्रत्यक्ष भेटून, तसेच फोन/व्हॉट्स ॲप याद्वारे , जवळपास एक वर्षाहून अधिक पाठपुरावा केला […]

अधिक वाचा..

शेतकरी हा गरीब आणि गरजूच, सरसकट कर्जमाफी द्या; नाना पटोले 

मुंबई: राज्यातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडला असून त्याला मदतीची नितांत गरज आहे. शेतकरी कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा केला पाहिजे. देशात सर्वात जास्त शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होतात हे लाजीरवाणे आहे. भाजपाचे नेते व सरकारमधील मंत्री मात्र शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी वाह्यात बडबड करून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. शेतकरी हा गरीब व गरजू असून […]

अधिक वाचा..

शिरूर – पाबळ रस्ता क्र. १०३ चे निकृष्ट काम; निलेश वाळुंज यांचे शिरूर तहसील कार्यालय येथे उपोषण सुरु

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर ते पाबळ मार्गावरील रस्ता क्रमांक १०३ वरील डांबरीकरणाच्या कामात गंभीर अनियमितता आणि निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरल्याच्या तक्रारीनंतर नागरिकांत तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या निषेधार्थ निलेश वाळुंज यांनी शिरूर तहसील कार्यालय येथे दिनांक २ जून पासून ठिय्या आंदोलन व उपोषण सुरू केले आहे. स्थानिक नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी वारंवार संबंधित […]

अधिक वाचा..

गोरगरीब हिंदू कुटुंबांना टार्गेट करून धर्मांतर करणाऱ्या नराधमाला पक्षातून तातडीने हाकला

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचा पदाधिकारी असलेल्या शंतूने कुकडे याच्यावर धर्मांतराबाबतचे गंभीर आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी केले आहेत. गोरगरीब हिंदू कुटुंबांना टार्गेट करून धर्मांतर करणाऱ्या नराधमाला पक्षातून तातडीने हाकला, अशी मागणी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे धंगेकारांनी केली आहे. रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावरती पोस्ट केली आहे. त्यात म्हटले आहे […]

अधिक वाचा..

फ्रिजमध्ये ‘हे’ पदार्थ २४ तासांपेक्षा जास्त वेळ ठेवणं पोटासाठी अत्यंत घातक, बिघडेल तब्येत

कोणताही पदार्थ जास्त झाला की सरळ उचलायचा आणि फ्रिजमध्ये ठेवून द्यायचा. नंंतर हळू हळू तो संपवायचा असं जवळपास प्रत्येक घरांतच होतं. पण काही पदार्थ असे असतात जे २४ तासांपेक्षा जास्त वेळ जर फ्रिजमध्ये ठेवून तुम्ही वापरत असाल तर ते तुमच्या आरोग्यासाठी अतिशय घातक ठरू शकतात. यापैकी पहिला पदार्थ आहे सोललेला लसूण लसूण फ्रिजमध्ये जास्त वेळ […]

अधिक वाचा..

या सरकारचा उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय…

महाविकास आघाडीच्या आमदारांनी चूल रचून गॅस दरवाढीचा केला निषेध… मुंबई: या सरकारचा उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय… खावटी अनुदान न देणार्‍या, एसटी कर्मचाऱ्यांना वार्‍यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो… खोके सरकार आले, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले…बजेटमध्ये भोपळा देणार्‍या सरकारचा धिक्कार असो… महागाई वाढवणार्‍या सरकारचा धिक्कार असो…अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत जोरदार निदर्शने […]

अधिक वाचा..

संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गोरगरीब रुग्णांसाठी देवदूत; प्रा डॉ तानाजीराव सावंत

करमाळा: सध्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत असून सर्वसामान्यांना उपचार करणे आटोक्याच्या बाहेर जात आहे अशा परिस्थितीत शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष घेत असलेली वैद्यकीय शिबिरे सर्वसामान्य रुग्णांसाठी आधार ठरत आहेत असे मत शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी व्यक्त केले. आज करमाळा येथे शिवसेनेच्या महाआरोग्य शिबिराचे उद्घाटन प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. या […]

अधिक वाचा..

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच मोदी सरकारने गरिबांच्या तोंडचा घास हिरावला

मुंबई: नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत गरिबांना अतिरिक्त ५ किलो अन्नधान्य पुरवणारी प्रधानमंत्री गरीब अन्न कल्याण योजना मोदी सरकारने बंद केली आहे. गेल्या दोन वर्षांपासून ८१ कोटी गरिबांना महिन्याला १० किलो धान्य मिळत होते परंतु आता फक्त ५ किलोच मिळणार आहे. मोदी सरकारने […]

अधिक वाचा..