तळेगावातील फडणवीस वाडा मोडकळीस; नागरिकांच्या जिवास धोका

तळेगाव ढमढेरे: शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथे जीर्ण झालेला फडणवीस वाडा मोडकळीस आला असुन त्या वाड्याभोवती लोकवस्ती असल्याने वर्दळ असते. त्याचबरोबर मुख्य पेठेत जुनी इमारत झाली असल्याने नागरिकांच्या जिवास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या पावसाळा सुरु असल्याने एखादी अनुचित घटना घडली. तर या घटनेला जबाबदार कोण…? असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. त्यामुळे येथील […]

अधिक वाचा..

औरंगाबाद नावात तूर्तास कोणताही बदल न करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश…

संभाजीनगर: छ .संभाजीनगर जिल्ह्याच्या नामांतराच्या मुद्द्यावरून जिल्हाधिकारी यांनी महत्त्वाचे आदेश काढले असून सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांनी तूर्तास औरंगाबाद विभाग, जिल्हा, उपविभाग, तालुका व गावाच्या नावात कोणताही बदल करू नये, असे आदेश औरंगाबादचे जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी 4 जुलै 2023 रोजी दिले असून शहराच्या नामांतरासंदर्भात मुंबई उच्च याचिकांच्या सुनावणी दरम्यान न्यायालयाच्या मुख्य पीठात प्रलंबित शासनाच्या […]

अधिक वाचा..

राज्यात दोन उपमुख्यमंत्री तर दोन उपसरपंच पद्धतही लागू करा…

वैजापुर तालुक्यातील माजी सरपंचांची मुख्यमंत्र्यांकडे अजब मागणी… संभाजीनगर: राज्यात अजित पवार यांना उपमुख्यमंत्री करण्यात आल्याने आता राज्यात दोन उपमुख्यमंत्री झाल्याच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील वैजापुर तालुक्यात असलेल्या मनूर येथील माजी सरपंच राजीव सुदामराव साळुंके यांनी ज्याप्रमाणे राज्यात दोन उपमुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील गावांच्या विकासासाठी दोन उपसरपंच निवड पद्धत लागू करण्याची मागणी मुख्यमंत्री […]

अधिक वाचा..

गर्भवती महिलांना मिळणार मोफत उपचार; केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेच्या असा घ्या लाभ…

संभाजीनगर: शहरी भाग असो की ग्रामीण भाग, सरकारी योजनांचा लाभ सर्वत्र पोहोचवला जात आहे. या योजनांच्या माध्यमातून सरकार लोकांना अनेक फायदे देत आहे. विमा, पेन्शन, घर, बेरोजगारी भत्ता, शिक्षण, रेशन योजना अशा अनेक योजना ते चालवत आहे. अशीच एक योजना गरोदर महिलांसाठी चालवली जात असून तिचे नाव आहे प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व योजना. या योजनेअंतर्गत गरोदर […]

अधिक वाचा..

शिरुर नगरपालिकेतील बेकायदेशीर बांधकाम व इतर प्रश्नांसाठी मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे उपोषण सुरु 

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर शहरामध्ये अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात झाली आहेत. येथील पांजरपोळ या ठिकाणचे वृक्ष तोड करून अमरधामाची भिंत तोडली आहे. तसेच सुभाष चौक या बाजारपेठेत अनाधिकृत बांधकामे मोठया प्रमाणावर केली आहे. या प्रश्नांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष महिबुब सय्यद यांनी आमरण उपोषण सुरु केले आहे. शिरुर हद्दीत बेकायदेशीर हॉटेल व्यवसायासाठी नगरपरिषदेने दिलेला वापर […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कार्यकर्ते संभ्रमात, विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती अशी अवस्था 

शिरुर (तेजस फडके): महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या प्रचंड उलथा-पालथ चालु असताना शिरुर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी “वेट अँड वॉच” ची भुमिका ठेवली आहे. शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार हे सुरवातीला अजित पवार यांच्या सोबत होते. मात्र शपथविधी नंतर त्यांनी सावध पवित्रा घेत पुन्हा आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे त्यांनी जाहीर केले. मात्र बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये तालुक्याचे […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस शुभ आहे आणि आज तुमच्या सर्व महत्वाकांक्षा पूर्ण होतील. ऑफिस आणि कामात तुमची कामगिरी सुधारेल. आज कोणीतरी तुमचे पैसे परत करण्यासाठी तुमच्या घरी येऊ शकते. तुमचा प्रवास सर्वसाधारणपणे फायदेशीर ठरेल. वृषभ: आज प्रत्येक कामात सावध राहण्याची गरज आहे. आज नोकरीच्या ठिकाणी अधिकाऱ्याशी किंवा व्यावसायिक क्षेत्रात एखाद्या व्यावसायिकाशी मतभेद होऊ शकतात. तुमच्या कार्य […]

अधिक वाचा..

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी 25 लाखांचा निधी देणार

मुंबई: ज्येष्ठ नागरिक सायबर गुन्ह्यांचे बळी ठरलेले दिसून येतात. मुंबईतील हे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून प्रायोगिक तत्वावर दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ सायबर गुन्हे मुक्त करण्यासाठी 25 लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केली. याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरात विरंगुळा केंद्र उभारण्यात येणार असून […]

अधिक वाचा..

‘ना टायर्ड हू ना रिटायर्ड हू’…! शरद पवार

नाशिक: नाशिकला येत असताना वरुणराजाने आपले चांगले स्वागत केले याचा आनंद शरद पवार यांनी व्यक्त करतानाच उपस्थित नाशिककरांना पावसाची स्थिती काय आहे अशी विचारणा केली त्यावेळी पुरेसा पाऊस नाही ही बाब शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी शरद पवार यांनी आम्ही निघाल्यावर पावसाचे थेंब जसे टाकले तसे संबंध जिल्हयात, राज्यात पावसाचा शिडकाव कर आणि […]

अधिक वाचा..

गद्दारांना सर्व गद्दारच दिसतात, काँग्रेसमध्ये कोणीही गद्दार नाही; नाना पटोले

मुंबई: राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरु असून त्यामागे भारतीय जनता पक्षच आहे. दिल्लीतून मोदी व शहा जशी स्क्रिप्ट लिहून देतात तीच भाषा बोलली जात आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यावर जी भाषा वापरली तशीच भाषा अजित पवार वापरत आहेत, हा काही योगायोग नाही तर दिल्लीतून मोदी-शहांनी दिलेली स्क्रिप्टच आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमधून काही लोक गेले […]

अधिक वाचा..