शिक्रापूर चाकण रस्त्यावर अज्ञात वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यालगत हॉटेल पुर्णब्रम्ह वडापाव सेंटरचे समोर महिंद्रा सुप्रो कारला अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात साजिद मुनावर पठाण या युवकाचा मृत्यू झाला असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्याने साजिद पठाण हा युवक […]

अधिक वाचा..

रत्नागिरीत होणार राज्यस्तरीय शिक्षक मेळावा

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे सुरेश सातपुते यांची माहिती शिक्रापूर (शेरखान शेख): महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची राज्यस्तरीय शिक्षण परिषद व शिक्षक मेळावा रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष सुरेश सातपुते यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची राज्यस्तरीय शिक्षण परिषद व शिक्षक मेळावा १७ फेब्रुवारी […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल…

मेष: मन थोडे अस्वस्थ होऊ शकते. शांत राहा. अनावश्यक राग टाळा. व्यापाराला गती मिळेल. खते व रसायने इत्यादींच्या व्यवसायात नफा मिळू शकतो. वाहनांच्या देखभालीवरील खर्च वाढेल. वृषभ: आत्मविश्वास उंचावेल. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. व्यवसायात वाढ होईल. सोने आणि वस्त्रोद्योगाच्या व्यवसायात फायदा होईल. शैक्षणिक कार्यात यश मिळेल. अधिकाऱ्यांशी वैचारिक मतभेद होतील. मिथुन: मन शांत राहील. पण […]

अधिक वाचा..

काँग्रेसला राज्यात व देशात एक नंबरचा पक्ष करण्यासाठी भाजपाच्या पराभवाचा संकल्प करा

मुंबई: भारत जोडो यात्रा यात्रेचा संदेश राज्यभर पोहचवण्यासाठी हाथ से हाथ जोडो अभियान राज्यात सुरु करण्यात आले असून घरोघरो जावून राहुलजी गांधींचा संदेश पोहचवा. भारत जोडो यात्रेमुळे जनतेत सकारात्मक संदेश गेला आहे. अमरावती व नागपूर विधान परिषद निवडणुकीत भाजपाचा पराभव करून काँग्रेसने विजय मिळवला आहे. कसबा व चिंचवडच्या पोटनिवडणुकीतही मविआचेच उमेदवार विजयी होतील. भाजपाच्या कारभाराला […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात त्या युवकाने कंपनीची तक्रार करत मागितली खंडणी अन…

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका कंपनीला मानव विकास परिषदेचे लेटरहेड देत माहिती मागून नंतर कंपनीच्या एचआर मॅनेजरला धमकी देत खंडणी मागितल्याची घटना घडली असल्याने मानव विकास परिषदेचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश महादेव दरेकर याच्या विरुद्ध खंडणी प्रकरणी गुन्हे दाखल करत त्याला अटक करण्यात आली आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील क्रोमवेल इंजिनिअरिंग या कंपनी […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र कृषीसेवा मुख्य परीक्षेला स्थगिती दयावी अंबादास दानवेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र…

मुंबई: गेल्या २१ दिवसांपासून कृषी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची दखल घेत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून महाराष्ट्र कृषीसेवा मुख्य परीक्षेला तात्काळ स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त परिक्षांतर्गत होणाऱ्या कृषी सेवा मुख्य परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम (दि. ११) […]

अधिक वाचा..

शिरुर पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी बक्षी समितीचा अहवाल जाळून व्यक्त केला निषेध

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर पंचायत समितीच्या लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी बक्षी समितीने वेतन त्रुटीच्या बाबतीत शिफारशींत अन्याय केल्यामुळे बक्षी समितीचा अहवाल पंचायत समिती समोर जाळून कर्मचाऱ्यांनी घोषणा देत निषेध व्यक्त केला. सातव्या वेतन आयोगामध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतन त्रुटी होत्या. त्या वेतन त्रुटी दूर करण्यासाठी बक्षी समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचा खंड दोनचा अहवाल प्रकाशित करण्यात […]

अधिक वाचा..

अशोक गांजे यांना राज्यस्तरीय वारकरी भुषण पुरस्कार प्रदान…

शिरुर (अरुणकुमार मोटे): सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय वारकरी भूषण पुरस्कार 2023 अशोक दत्तात्रय गांजे यांना मिळाला. या पुरस्काराचे वितरण माऊली संकुल सभागृह अहमदनगर येथे पार पडले. सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते. या पुरस्कारासाठी शरदवाडी येथून उपसरपंच गणेशराव सरोदे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष सरोदे, भजनी […]

अधिक वाचा..

पालकांनो शाळेतील पाल्याची शाळेत येता- जाता काळजी घ्या…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शाळा भरण्याच्या वेळेत पायी जाणाऱ्या मुलींच्या अवतीभोवती मोटार सायकल वरून येवुन जाणून-बुजून काहीतरी कारण काढून थांबणे, त्यांच्या पाठीमागून पुढे जावुन थांबणे, मुलींकडे वेगळ्या नजरेने पाहणे असा धक्कादायक प्रकार टाकळी हाजी येथे घडला असून यापुढे पालकांना मुलांची शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत काळजी घ्यावी लागणार आहे. 15 दिवसांपासून असाच मुलींचा पाठलाग करण्याचा प्रकार […]

अधिक वाचा..

अकृषी विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहाच्या कामाला गती द्यावी…

मुंबई: राज्यातील विद्यापींठात शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची त्याच परिसरात राहण्याची सोय व्हावी, यासाठी विद्यापीठांमध्ये विशेष वसतीगृह उभारण्यात येणार आहेत. या वसतिगृहाच्या कामाला गती द्यावी, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत राज्यातील अकृषी […]

अधिक वाचा..