अशोक गांजे यांना राज्यस्तरीय वारकरी भुषण पुरस्कार प्रदान…

शिरुर (अरुणकुमार मोटे): सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय वारकरी भूषण पुरस्कार 2023 अशोक दत्तात्रय गांजे यांना मिळाला. या पुरस्काराचे वितरण माऊली संकुल सभागृह अहमदनगर येथे पार पडले. सरपंच सेवा संघाचे अध्यक्ष बाबासाहेब पावसे यांनी या सोहळ्याचे आयोजन केले होते. या पुरस्कारासाठी शरदवाडी येथून उपसरपंच गणेशराव सरोदे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष सरोदे, भजनी […]

अधिक वाचा..

पालकांनो शाळेतील पाल्याची शाळेत येता- जाता काळजी घ्या…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शाळा भरण्याच्या वेळेत पायी जाणाऱ्या मुलींच्या अवतीभोवती मोटार सायकल वरून येवुन जाणून-बुजून काहीतरी कारण काढून थांबणे, त्यांच्या पाठीमागून पुढे जावुन थांबणे, मुलींकडे वेगळ्या नजरेने पाहणे असा धक्कादायक प्रकार टाकळी हाजी येथे घडला असून यापुढे पालकांना मुलांची शाळा भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळेत काळजी घ्यावी लागणार आहे. 15 दिवसांपासून असाच मुलींचा पाठलाग करण्याचा प्रकार […]

अधिक वाचा..

अकृषी विद्यापीठांमध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहाच्या कामाला गती द्यावी…

मुंबई: राज्यातील विद्यापींठात शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची त्याच परिसरात राहण्याची सोय व्हावी, यासाठी विद्यापीठांमध्ये विशेष वसतीगृह उभारण्यात येणार आहेत. या वसतिगृहाच्या कामाला गती द्यावी, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या उपस्थितीत राज्यातील अकृषी […]

अधिक वाचा..

तुळजापूरच्या महिलांनी साधला डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद

पुणे: तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरामध्ये भोपे कुटुंबातील महिलांना पूजा आणि इतर पूजा विधी करण्याचा मान मिळावा, यासाठी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याशी तुळजापूर मधील स्थानिक महिलांनी केलेल्या व्हिडीओ कॉलच्या माध्यमातून संवाद साधला. महिलांनी मंदिराच्या देवीची अलंकारपुजा करण्याची पूर्वीची परंपरा शासनाने आताही सुरू ठेवावी, अशी मागणी केली. दिनांक १२ फेब्रुवारी रोजी नीलमताईंनी शासनाकडे दिलेल्या मागण्यांचे […]

अधिक वाचा..

आमदार प्रशांत बंब यांच्यासह संपूर्ण पॅनलला सभासदांचा ‘दे धक्का’…

औरंगाबाद: गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजपचे आमदार व कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष प्रशांत बंब यांना सभासदांनी नाकारत सत्तांतराचा कौल दिला असून शिवसेना ठाकरे गटाचे कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या गटाने निवडणूक झालेल्या सर्व २० जागांवर दणदणीत विजय मिळविला. आमदार प्रशांत बंब यांचादेखील पराभव झाला आहे. नोव्हेंबर २०२० मध्ये कारखाना अध्यक्ष आ. बंब यांच्यासह विद्यमान […]

अधिक वाचा..

BBC च्या कार्यालयावरील आयकर छापे अघोषित आणीबाणीचे द्योतक; अतुल लोंढे

मोदी सरकारच्या विरोधात उठणारा प्रत्येक आवाज दडपला जातो… मुंबई: नरेंद्र मोदी हे हुकूमशाही पद्धतीने काम करत असून देशात लोकशाही व्यवस्था, संविधान सर्व काही धाब्यावर बसवले आहे. सरकारच्या विरोधात आवाज उठवणाऱ्यांवर कारवाई करुन तो आवाज दडपण्याचे काम केले जाते. बीबीसीच्या दिल्ली व मुंबईतील कार्यालयावर आयकर विभागाचे छापे हे त्याचाच भाग आहे. बीबीसीने गुजरात दंगलीसंदर्भात एक डॉक्युमेंटरी […]

अधिक वाचा..

पहाटेचा शपथविधी नव्हे तर जनतेचे मुलभूत प्रश्न काँग्रेससाठी महत्वाचे; नाना पटोले

देवेंद्र फडणवीसांना साडेतीन वर्षांनंतर साक्षात्कार कसा काय झाला? मुंबई: पहाटेचा शपथविधी शरद पवार यांच्याशी चर्चाकरून झाला होता या देवेंद्र फडणवीस यांच्या दाव्यात काँग्रेसला पडायचे नाही. या घटनेला साडेतीन वर्ष झाल्यानंतर फडणवीस यांना आत्ताच त्याचा साक्षात्कार का झाला? आधी का बोलले नाहीत? असे प्रश्न विचारुन काँग्रेससाठी पहाटेचा शपथविधी महत्वाचा नाही तर महागाई, बेरोजगारी, शेतकरी व जनतेचे […]

अधिक वाचा..

चंद्रपूर मेडिकल कॉलेजमधील असुविधांमुळे तातडीने नवीन मेडिकल इमारतीत या रुग्णालयाचे स्थलांतर करा…

चंद्रपूर: वैद्यकीय सुविधांचा अभाव, रुग्णालयाची अपुरी जागा, औषधांची कमतरता, अस्वच्छतेचा अभाव व अपुरी कर्मचाऱ्यांची संख्या आधी चंद्रपूर मेडिकल कॉलेजमधील असुविधांवरुन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. रुग्णालयातील असुविधांमुळे तातडीने नवीन मेडिकल इमारतीत या रुग्णालयाचे स्थलांतर करण्याच्या सूचना दानवे यांनी केल्या. तसेच यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही दानवे यांनी चंद्रपूर मेडिकल […]

अधिक वाचा..

धारीवाल वीज प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांना न्याय देणार

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यातील धारीवाल वीज प्रकल्पामुळे बाधित शेतकऱ्यांना न्याय देणार असल्याची आग्रही भूमिका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी घेतली. धारीवाल वीज प्रकल्पाने वीज निर्मितीसाठी आवश्यक पाणीसाठयासाठी एकच तळे बांधून साठवणूक केली. त्यामुळे जिल्ह्यातील येरुर व सोनेगाव येथील शेतकऱ्यांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्या पाणी साठा तळ्याची दानवे यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी […]

अधिक वाचा..

महासंघाच्या एका झेंड्याखाली चर्मकार समाजाने संघटित होण्याची गरज…

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील काठापूर येथे राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी चर्मकार समाजाने राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या झेंड्याखाली संघटित होण्याची गरज असल्याचे सांगितले. या देशात स्वातंत्र्यानंतर पहिले संघटन क्रांतीकारी नेते मा. बबनरावजी घोलप यांच्या नेतृत्वाने या महाराष्ट्रात प्रत्येक जिल्हा, तालुका, गाव पातळीवर संघटन उभे राहिले आहे. त्यामुळे चर्मकार समाजावरील अन्यायाविरुद्ध आवाज राष्ट्रीय […]

अधिक वाचा..