दिल्ली दौऱ्यावर सुनेत्रा पवार; अमित शाह यांची भेट, विलिनीकरणाच्या चर्चांना वेग

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते अजित पवार यांच्या निधनानंतर पक्षाची धुरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आली आहे. जबाबदारी स्वीकारताच सुनेत्रा पवार यांनी राजकीय हालचालींना वेग दिला असून त्या सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. दिल्लीतील या दौऱ्यात सुनेत्रा पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवेळी पार्थ पवार, जय पवार, पक्षाचे […]

अधिक वाचा..

‘लग्नानंतर होईलच प्रेम’मध्ये जबरदस्त ट्विस्ट! काव्याच्या अपघातानंतर पार्थचा मोठा निर्णय

जीवा-नंदिनीच्या प्रेमकथेची चाहत्यांकडून मागणी मुंबई: स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ सध्या रंगतदार वळणावर आली आहे. पार्थ-काव्या आणि जीवा-नंदिनी यांच्या नात्यांभोवती फिरणाऱ्या या कथानकात अलीकडेच मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. मालिकेत रम्या गुंडांना पैसे देऊन पार्थ आणि काव्यावर हल्ला घडवून आणते. त्याआधीच पार्थ आणि काव्याने एकमेकांवरच्या प्रेमाची कबुली दिलेली असते. हल्ल्यात काव्याच्या डोक्याला मार […]

अधिक वाचा..

व्हॅलेंटाइन स्पेशल! ‘वीण दोघातली ही तुटेना’मध्ये रंगणार समर-स्वानंदीचा खास रोमँटिक सोहळा

मुंबई: १४ फेब्रुवारीला जगभरात ‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा केला जातो. प्रेमाचा हा खास दिवस आता झी मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘वीण दोघातली ही तुटेना’ मध्येही रोमँटिक आणि भावनिक वळण घेऊन येणार आहे. प्रेक्षकांसाठी मालिकेत खास व्हॅलेंटाइन स्पेशल भाग सादर होणार असून अनेक रंजक घडामोडी पाहायला मिळणार आहेत. मालिकेत आजी अधिरावर एक खास जबाबदारी सोपवते. जसं ती स्वतः […]

अधिक वाचा..

बिग बॉस मराठी ६: धमकीप्रकरणी बाहेर पडलेली दिव्या शिंदे पहिल्यांदाच बोलली; ‘विषय आता सुरू झाला…’

मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये घरातील सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून दिव्या शिंदेला घराबाहेर काढण्यात आलं होतं. एका टास्कदरम्यान दिव्यानं आक्रमक भूमिका घेत माफी मागण्यास नकार दिला. त्यानंतर तिला आणि राकेशला कन्फेशन रुममध्ये बोलावून बिग बॉसनं समज देण्याचा प्रयत्न केला; मात्र दिव्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिली. अखेरीस बिग बॉसनं तिला घर सोडण्याचा आदेश […]

अधिक वाचा..
shradha-jadhav-aamdabad

शिरूर! श्रद्धा जाधव यांची कृषी अधिकारीपदी निवड; जिद्द आणि कष्टांना यशाची जोड…

शिरूर (नितीन थोरात): शिरूर तालुक्यातील आमदाबाद गावातील श्रद्धा चंद्रकला राजेंद्र जाधव यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण करून कृषी अधिकारी पदाला गवसणी घालत तालुक्याच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी केली आहे. त्यांच्या या यशामुळे आमदाबादसह टाकळीहाजी परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्वत्र त्यांचे अभिनंदन केले जात आहे. श्रद्धा यांच्या वडिलांचे, शेतकरी राजेंद्र गणपत […]

अधिक वाचा..

मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईकरांना ग्वाही

महायुतीला कौल देऊन मुंबईकरांनी विकासाला स्वीकारलं मुंबई: वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाळासाहेबांची स्वप्नं पूर्ण करण्याबरोबर मुंबईला जागतिक दर्जाचं फिनटेक केंद्र बनवणार, अशी ग्वाही शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबई महापालिकेत महायुतीचे महापौर रितू तावडे आणि उपमहापौर संजय घाडी यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत […]

अधिक वाचा..
nirmala-navale

‘पैसा-जिंकला, माणूस हरला’! ‘दारू-ड्रग्जचा वापर झाला’; पराभवानंतर निर्मला नवले यांचा गंभीर आरोप

पुणे: शिरूर पंचायत समितीच्या कारेगाव गणातून राष्ट्रवादीच्या उमेदवार व माजी सरपंच निर्मला नवले यांचा अवघ्या ३०० मतांनी पराभव झाला. सोशल मीडियावर ‘रीलस्टार’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या नवले यांच्या पराभवाची सध्या सर्वत्र चर्चा रंगली आहे. दरम्यान, या निकालानंतर नवले यांनी स्वतः प्रतिक्रिया देत पराभवाची कारणे मांडली असून मनातील खदखदही व्यक्त केली आहे. Live Result! शिरूर तालुक्यातील जिल्हा […]

अधिक वाचा..

प्रदूषणाविरुद्ध गणेश नाईक आक्रमक; 54 टायर कारखान्यांना बंदची नोटीस, नियमभंगावर कारवाईचे आदेश

पालघर: वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी वाडा तालुक्यातील प्रदूषणाच्या मुद्द्यावर कडक भूमिका घेत प्रदूषण करणाऱ्या टायर कारखान्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. डाकिवली व कोनसई येथील ग्रामस्थांनी जनता दरबारात तक्रार केल्यानंतर नाईक यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला संबंधित कारखान्यांची तातडीने पाहणी करून नियमभंग करणाऱ्यांना टाळे ठोकण्याचे निर्देश दिले. वाडा तालुक्यात सुमारे 74 टायर पायरोलोसिस कंपन्या […]

अधिक वाचा..

‘कमळी’मध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट; कामिनीला घराबाहेर काढणार? नवीन प्रोमो चर्चेत

  मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय ‘कमळी’ मालिकेत सध्या नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. सिद्धटेकहून शिक्षणासाठी मुंबईत आलेली कमळी प्रत्येक वेळी नव्या वळणामुळे प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. आता मालिकेत आणखी एक मोठा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी कामिनीने सरोज आणि कमळीच्या वयाच्या एका मुलीचा अपघात घडवून आणला होता. त्या अपघातात सरोज बचावली, मात्र त्या […]

अधिक वाचा..

लोकसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव; शरद पवार गटाच्या खासदारांच्या सह्यांमुळे राजकीय चर्चांना उधाण

दिल्ली: एकीकडे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाच्या चर्चा रंगात असताना, दिल्लीत मात्र शरद पवार गटाच्या खासदारांनी वेगळीच राजकीय भूमिका घेतल्याचे समोर आले आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात काँग्रेसने दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या तीन खासदारांनी स्वाक्षऱ्या केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. काँग्रेसने लोकसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्तावाची […]

अधिक वाचा..