संत सावता महाराज समाधी सोहळ्यासाठी ‘मूळ पादुका’ मागणीवर विधानपरिषदेत चर्चा

मुंबई: संत परंपरेने समृद्ध महाराष्ट्रात संत शिरोमणी संत सावता महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळ्याला यंदा सुमारे ७३० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर अरण येथे होणाऱ्या सोहळ्यासाठी पांडुरंगाच्या ‘मूळ पादुका’ नेण्याच्या मागणीवर विधानपरिषदेत लक्षवेधीद्वारे सविस्तर चर्चा झाली.सभागृहात विविध सदस्यांनी आपापली मते मांडल्यानंतर पीठासीन अधिकारी म्हणून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सर्व संबंधितांनी एकत्रित बैठक घेऊन […]

अधिक वाचा..

काँग्रेसचा भाजपावर जोरदार हल्ला; देश दोन विचारधारांच्या उंबरठ्यावर; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: देशात सध्या दोन विचारधारांची स्पष्ट लढाई सुरू असून एक विचारधारा काँग्रेसची तर दुसरी भाजपाची आहे. संविधानाला अभिप्रेत सर्वसमावेशक भारत घडवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे, तर देश फक्त मुठभर लोकांच्या हाती असावा, स्त्री-पुरुष समानता न मानणारा आणि मनुवादी विचारांना मानणारा भारत घडवण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. चिपळूण […]

अधिक वाचा..

कात्रजमध्ये भीषण अपघात; तीन वर्षांच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू

पुणे : कात्रज परिसरात अपघातांची मालिका सुरू असतानाच शनिवारी सकाळी सुमारे नऊच्या सुमारास वंडर सिटीसमोर कात्रजकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर भीषण अपघात झाला. ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत तीन वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, वडील आपल्या तीन वर्षांच्या मुलाला दुचाकीवरून घेऊन जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेत चिमुकल्याच्या डोक्यावरून […]

अधिक वाचा..

दादांच्या जाण्याने आजीचे अश्रू थांबत नाहीत, शरद पवारही अस्वस्थ; युगेंद्र पवारांची भावनिक पोस्ट

एक महिना पूर्ण: अजित पवारांच्या आठवणीत युगेंद्र पवारांची भावनिक पोस्ट बारामती: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज एक महिना पूर्ण झाला. त्यांच्या जाण्याने राज्यभरात शोककळा पसरली होती. आजही त्यांच्या आठवणीने कुटुंबीय आणि समर्थक भावूक होत आहेत. याच पार्श्वभूमीवर त्यांचे पुतणे आणि श्रीनिवास पवार यांचे सुपूत्र युगेंद्र पवार यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट […]

अधिक वाचा..

गणेगाव दुमाला येथील म्हसोबावाडी शाळेच्या जागेत अतिक्रमण केल्याप्रकरणी 4 जणांविरोधात गुन्हा दाखल 

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील गणेगाव दुमाला येथील म्हसोबावाडीच्या जुन्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारात अतिक्रमण करुन शाळेचे कामकाज विस्कळीत केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शाळेच्या मैदानाचे ट्रकरच्या साह्याने काकऱ्या मारुन नुकसान, बोअरवेलच्या मोटारीची वायर व पाईप तोडणे, तसेच विद्यार्थ्यांच्या ये-जा करण्याचे प्रवेशद्वार बंद केल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी म्हसोबावाडी जिल्हा […]

अधिक वाचा..

एसटी च्या ‘NCMC स्मार्ट कार्ड’ नोंदणीला उस्फूर्त प्रतिसाद; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) डिजिटल सेवांच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल म्हणजे ‘NCMC स्मार्ट कार्ड’ उपक्रम होय. सवलत धारक प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, नोंदणीची संख्या आता 1 लाखाच्या महत्त्वपूर्ण टप्प्यापर्यंत पोहोचली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ही […]

अधिक वाचा..

ठाण्यातून राष्ट्रवादीचा पलटवार! रोहित पवारांचे राजकारण ‘घृणास्पद’; आनंद परांजपे

ठाणे: अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी विमान अपघाती निधनावरून आमदार रोहित पवार राजकारण करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ठाण्यात माध्यमांशी बोलताना त्यांनी रोहित पवारांचे वर्तन “अत्यंत चुकीचे आणि घृणास्पद” असल्याचे म्हटले. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील […]

अधिक वाचा..

अजित पवार विमान अपघात! महिनाभरानंतरही गूढ कायम; अमोल मिटकरींचे घातपाताचे गंभीर आरोप

मुंबई: अजित पवार यांच्या विमान अपघाताला आज एक महिना पूर्ण झाला असताना तपासाचा अंतिम निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात विविध दावे-प्रतिदावे होत असून प्रकरण अधिकच गूढ बनले आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या परिसरात माध्यमांशी बोलताना आमदार अमोल मिटकरी यांनी अपघात सूनियोजित असल्याची शक्यता व्यक्त केली. विमान रडारवरून अचानक गायब झाले, लँडिंग गिअरमध्ये छेडछाड […]

अधिक वाचा..

जेलमध्ये वाल्मिक कराड, बाहेर मुलाची ‘बोलणार’ पोस्ट; बीडमध्ये चर्चेचा स्फोट

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर उसळलेला संताप अजूनही ओसरलेला नाही. राज्यभर आंदोलनं, आरोपींना अटक करण्यासाठी सरकारवर दबाव आणि राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच आता या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. या हत्याकांडात नाव आलेले वाल्मिक कराड सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मात्र, त्यांच्या मुलगा सुशील कराड याने सोशल मीडियावर टाकलेली एक ओळ […]

अधिक वाचा..

ग्रामपंचायतींवर जुन्या सरपंचांच्या नियुक्तीला ब्रेक; मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला स्थगिती

मुंबई: राज्यातील ग्रामपंचायतींच्या कारभारासंदर्भात महत्त्वाचा अंतरिम दिलासा देत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागाच्या वादग्रस्त निर्णयाला तूर्तास स्थगिती दिली आहे. मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर पुन्हा जुन्याच सरपंचांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याच्या निर्णयावर खंडपीठाने गंभीर आक्षेप नोंदवला. पुढील आदेश येईपर्यंत कोणतीही नवीन प्रशासक नियुक्ती करू नये, असे स्पष्ट निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या प्रकरणावर […]

अधिक वाचा..