मुंबई महापौरपदावर सस्पेन्स कायम; फडणवीस शिंदे बसून निर्णय घेणार

मुंबई: राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणूक निकालात बहुसंख्य ठिकाणी भाजप–शिवसेना महायुतीने सत्ता मिळवली आहे. मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नाशिक, जळगाव, धुळे, अमरावती, अकोला, अहिल्यानगर आदी महापालिकांमध्ये महायुतीचा झेंडा फडकला आहे. मात्र, या सत्तेनंतर आता सर्वांचे लक्ष मुंबईच्या महापौरपदाकडे लागले आहे. महापौर कोणाचा होणार, या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सस्पेन्स कायम ठेवणारे वक्तव्य केले […]

अधिक वाचा..

कोण बनणार मुंबईचा महापौर? राजकीय समीकरणांचा खेळ!

“या चिमण्यांनो, परत फिरा रे…” मुंबईच्या हितासाठी! मुंबई: मुंबईच्या महापौरपदावर कोण विराजमान होणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सध्या राजकीय समीकरणे प्रचंड वेगाने बदलत असून, प्रत्येक पक्ष आपापली ताकद अजमावत आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळातही शिवसेनेतून काही नेते बाहेर पडले, काहींनी वेगळे राजकीय मार्ग निवडले. राज ठाकरे यांनी “माझ्या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलंय” […]

अधिक वाचा..

कोल्हापूरचे माजी गोकुळ अध्यक्ष विश्वासराव पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

मुंबई: कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान संचालक विश्वासराव आबाजी पाटील यांनी आज शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षातील असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी विश्वासराव पाटील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत करत भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या पक्षप्रवेशावेळी शिरोली दुमला […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर

मुंबई: राज्यातील आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली. या निवडणुकांमध्ये पक्षाच्या प्रचाराची धुरा राज्य व राष्ट्रीय पातळीवरील वरिष्ठ नेत्यांकडे सोपवण्यात आली असून, सर्व जिल्ह्यांमध्ये जोरदार प्रचार केला जाणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. राष्ट्रवादी […]

अधिक वाचा..

मुंबई महापालिकेत महायुतीचा विजय; उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया भाजप कागदावर, शिवसेना जमिनीवर

मुंबई: राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीने निर्णायक विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला ८९ तर शिवसेनेला २९ जागा मिळाल्या असून महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या युतीला एकूण ७१ जागांवर समाधान मानावे लागले, तर काँग्रेसला २४ जागा मिळाल्या आहेत. इतर व अपक्षांचे मिळून १२ नगरसेवक निवडून आले […]

अधिक वाचा..

राष्ट्रीय शिक्षण धोरणातून सक्षम व सृजनशील भारत घडेल; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ संपन्न; १ लाख ७२ हजार ५२२ स्नातकांना पदव्या प्रदान मुंबई: राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० हे सक्षम, सृजनशील आणि ज्ञानसमृद्ध भारत घडविण्याचा भक्कम पाया असून, या धोरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवोपक्रम, संशोधन आणि उद्योजकतेची भावना विकसित होईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. मुंबई विद्यापीठाचा वार्षिक दीक्षान्त समारंभ […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचे ‘टीसीएस’कडून जतन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक–खासगी भागीदारीला बळ मुंबई: महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे अधिक प्रभावीपणे घडत असून, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) आणि टीसीएस फाउंडेशन यांचे या कार्यात मोलाचे योगदान लाभत आहे. वारसा जतनामध्ये खासगी क्षेत्राचा सक्रिय सहभाग वाढावा, या धोरणाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातत्याने […]

अधिक वाचा..

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या

मुंबई: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेतील गंभीर त्रुटी उघड केल्या असून, मतदारांचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास ढासळत चालल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. शहरांमधील अत्यल्प मतदानाची टक्केवारी ही केवळ मतदार उदासीनतेचे नव्हे, तर संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवरील अविश्वासाचे द्योतक असल्याचे मत काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी व्यक्त केले आहे. जिल्हा परिषद व […]

अधिक वाचा..

ठाकरे गटाला दुहेरी धक्का! शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार नीला देसाई यांचे निधन

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. मागील २५ वर्षांपासून मुंबईवर वर्चस्व राखणाऱ्या ठाकरे गटाला यंदा पराभव स्वीकारावा लागला असून, मुंबईत त्यांना केवळ ६५ जागांवर विजय मिळवता आला. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. दरम्यान, निवडणूक निकालानंतर काही तासांतच ठाकरे गटासाठी आणखी एक अत्यंत दु:खद घटना घडली. शिवसेनेच्या […]

अधिक वाचा..

कोण होणार पुण्याचा महापौर! महापौरपदासाठी या नावांची जोरदार चर्चा

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवत तब्बल १११ जागांवर आघाडी घेतली असून शहरातील राजकारणात आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. अंतिम निकाल हाती आल्यानंतर आकड्यांमध्ये किरकोळ बदल होण्याची शक्यता असली, तरीही भाजपचा विजय स्पष्ट आणि निर्णायक मानला जात आहे. या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस गटांना मोठा फटका बसला असून, एकत्रितपणे त्यांना केवळ १७ […]

अधिक वाचा..