अधिवेशनकाळात एकनाथ शिंदे यांच्या खात्यांची तात्पुरती फेरवाटप; कारण काय?

मुंबई: राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे असलेली काही महत्त्वाची खाती शिवसेनेतील इतर मंत्र्यांकडे तात्पुरत्या स्वरूपात सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र पाठवले आहे. कोणाकडे कोणते खाते? पत्रानुसार पुढीलप्रमाणे जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत: सार्वजनिक बांधकाम विभाग – दादा भुसे नगरविकास मंत्रालय – उदय सामंत गृहनिर्माण विभाग […]

अधिक वाचा..

अजित पवारांच्या मृत्यूचा तपास थातूरमातूर नको, अन्यथा…

मुंबई: अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, या प्रकरणाच्या तपासावरून संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. आमदार Rohit Pawar यांनी या संपूर्ण प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत सखोल आणि पारदर्शक चौकशीची जोरदार मागणी केली आहे. “चौकशी नावापुरती नको” “अजित पवार यांच्या मृत्यूची चौकशी केवळ नावापुरती नको, तर ती सखोल आणि पारदर्शक व्हायला हवी. […]

अधिक वाचा..

‘दादा’विना अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात; विरोधी पक्षनेत्याविना इतिहासात प्रथमच सत्र

मुंबई: महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज (२३ फेब्रुवारी)पासून सुरू झाले असून ते २५ मार्च २०२६ पर्यंत चालणार आहे. एकूण २० कामकाजाच्या दिवसांचे हे अधिवेशन अनेक कारणांनी महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर प्रथमच अर्थसंकल्प सादर होणार असून त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. ६ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र […]

अधिक वाचा..
jalinder-bhadale

पुणे जिल्ह्यात ऊसाचे पाचट जाळताना शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू…

पुणे : पारगाव (ता. दौंड) येथे ऊसाच्या शेतातील पाचट जाळताना एका शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ऊसाचे पाचट पेटवताना आगीने उग्र रूप धारण केल्याने शेतकऱ्याला त्या आगीतून बाहेर पडता न आल्याने मृत्यू झाला आहे. जालिंदर भालचंद्र भाडळे (वय ६९) असे मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. रविवारी (ता. 22) दुपारी सुमारे दीड वाजण्याच्या […]

अधिक वाचा..

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांचे विरोधकांना चोख प्रत्युत्तर

विकासकामांचा पाढा आणि विरोधकांच्या भूमिकांवर प्रहार मुंबई: साडेतीन वर्षात राज्य सरकारने केलेल्या कामांचा आढावा घेत राज्यातील महायुती सरकार हे स्थगिती सरकार नसून प्रगती सरकार असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विरोधकांच्या आरोपांचा समाचार घेतला. यावेळी बोलताना, दावोस मध्ये झालेले ३० लाख कोटींचे औद्योगिक करार त्यातून ४० […]

अधिक वाचा..

मंत्रालयातील ‘लक्ष्मीदर्शन’ प्रकरणावरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल; चहापानावर बहिष्कार

मुंबई: राज्यातील महायुती सरकारच्या कथित भ्रष्ट कारभाराचा निषेध करत अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित अधिकृत चहापान कार्यक्रमावर महाविकास आघाडीने बहिष्कार टाकला. मंत्रालयात सुरू असलेल्या ‘लक्ष्मीदर्शन’ प्रकारावरून तसेच घटनात्मक पदांच्या कथित अवमानावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूबाबतही प्रश्न उपस्थित केले. हा घातपात की अपघात, याबाबत सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी, अशी […]

अधिक वाचा..

आता… ‘गाव तिथे एसटी’ नव्हे… ‘आदिवासी पाडा तिथे एसटी’; प्रताप सरनाईक

मुंबई: सह्याद्री आणि मेळघाटच्या दुर्गम डोंगरदऱ्यांमध्ये आता ‘लालपरी’चे चाक फिरणार आहे. राज्यातील अतिदुर्गम आदिवासी पाड्यांपर्यंत एसटी सेवा पोहोचवण्याचा ऐतिहासिक निर्णय परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी जाहीर केला.“आता केवळ गाव तिथे एसटी नाही, तर आदिवासी पाडा तिथे एसटी,” असा ठाम निर्धार व्यक्त करत त्यांनी विकासाचा नवा अध्याय सुरू झाल्याचे […]

अधिक वाचा..

मराठी शाळांवर अस्तित्वाचा प्रश्न; ६०० शाळा धोक्यात, २५ हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरी

मुंबई: राज्यात मराठी भाषा संवर्धनाचे धोरणात्मक निर्णय जाहीर होत असताना दुसरीकडे मराठी माध्यमाच्या शाळांवर अस्तित्वाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षक समायोजन प्रक्रियेतील नव्या निकषांमुळे सुमारे ६०० मराठी शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर असल्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सुमारे २५ हजार विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिक्षक समायोजनामुळे लहान शाळांवर गदा […]

अधिक वाचा..

राहुल गांधी यांचा मोदींवर हल्ला, भारत-अमेरिका व्यापार करारावरून राजकारण तापले

युनाइटेड स्टेट्स सर्वोच्च न्यायालयाचा ट्रम्प यांच्या टॅरिफवर निर्णय अमेरिका: अमेरिका अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणावर सुपरिम कोर्ट ऑफ द युनाइटेड स्टेट्स यांनी आक्षेप घेतल्यानंतर भारतातील राजकारण ढवळून निघाले आहे. न्यायालयाने ट्रम्प यांनी लादलेले काही टॅरिफ बेकायदेशीर ठरवले असून, राष्ट्रपतींना अशा प्रकारे टॅरिफ लावण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट केले. न्यायालयाच्या निर्णयानंतर काही तासांतच ट्रम्प […]

अधिक वाचा..

लालबागेत भीषण अपघात; चार वर्षांच्या अथांग तावडेचा मृत्यू, बसचालकावर संतापाची लाट

मुंबई: मुंबईतील लालबाग परिसरात घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण शहर हादरले आहे. या दुर्घटनेत चार वर्षांचा चिमुकला अथांग तावडे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या आठवडाभरापासून रुग्णालयातील पीआयसीयू (PICU) विभागात त्याच्यावर अतिदक्षता उपचार सुरू होते. सुरुवातीला तो उपचारांना प्रतिसाद देत होता; मात्र अखेर त्याची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. सिग्नलवर थांबलेल्या दुचाकीला भरधाव बसची धडक अथांग आपल्या वडिलांसोबत […]

अधिक वाचा..