डबल टॅरिफनंतर अमेरिकेचा सर्वात मोठा यूटर्न, दिले मोठे संकेत

नवी दिल्ली: बुधवारपासून भारतीय आयातींवर 50% टॅरिफ लागू झाल्यानंतर आता अमेरिकेच्या भूमिकेत अचानक मोठा ट्विस्ट आला आहे. अमेरिकेने भारतासोबत व्यापार करार करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत आणि दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू असल्याचेही म्हटले आहे. अमेरिकेत भारतीय आयातींवर 25 टक्के Reciprocal टॅरिफ आणि रशियन तेल खरेदी करण्यासाठी अतिरिक्त 25 टक्के असे एकूण 50% टॅरीफ लादल्यानंतर दोन्ही […]

अधिक वाचा..

तिरंगी मालिकेसाठी अफगाणिस्तानने केला संघ जाहीर; या 22 वर्षीय खेळाडूला मिळाली जागा

आशिया कप 2025 च्या आधी, 29 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान यूएईच्या यजमानपदाखाली तिरंगी मालिका खेळवली जाईल, ज्यामध्ये पाकिस्तान आणि अफगाणिस्तान संघ देखील सहभागी होतील. या तिरंगी मालिकेसाठी, अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने आपला संघ जाहीर केला आहे, ज्यामध्ये एकूण 17 खेळाडूंना स्थान मिळाले आहे. अफगाणिस्तान संघाला 29 सप्टेंबर रोजी पाकिस्तान संघाविरुद्ध तिरंगी मालिकेत पहिला सामना खेळायचा […]

अधिक वाचा..

टेंभी नाक्यावर आनंद दिघेंनी सर्व सण-उत्सव सुरू केले, पण गणेशोत्सव नाही कारण…

ठाणे: शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी ठाण्यातील टेंभी नाक्यावर नवरात्रोत्सव आणि दहीहंडी यांसारख्या सण-उत्सवांची सुरुवात केली. टेंभी नाक्यापासून काही अंतरावर असलेल्या तलाव पाळी जवळील जिल्हा शाखेत स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रमही सुरू केला. या उत्सवांबरोबरच मलंग आंदोलन, दुर्गाडी घंटानाद आंदोलन सुरू केल्याने त्यांची प्रखर हिंदुत्ववादी नेता अशी ओळख होती. सर्व सण उत्सव सुरू करणाऱ्या दिघे […]

अधिक वाचा..

गणेशोत्सवात मद्य विक्री बंदीला उच्च न्यायालयाकडून स्थगिती

पुणे: गणेशोत्सव काळात शहरातील मध्य भागातील मद्य विक्रीची दुकाने दहा दिवस बंद ठेवण्याचा आदेशाला मंगळवारी उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. स्थिगितीनंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सुधारित आदेश दिले. त्यानुसार मध्य भागातील मद्य विक्री दुकाने गणेश चतुर्थी (२७ ऑगस्ट), गौरी आगमन (३१ ऑगस्ट), गौरी विसर्जन (२ सप्टेंबर) आणि विसर्जन सोहळ्याच्या (६ सप्टेंबर) दिवशी बंद राहणार आहेत. […]

अधिक वाचा..

कोणत्याही परिस्थितीत संविधान आणि कायद्याचे पालन करायला हवे

मुंबई: कोणत्याही परिस्थितीत संविधान आणि कायद्याचे पालन करायला हवे. आपल्या श्रद्धेला कुणी डिवचलं तरी देखील कायदा हातात घेऊ नका, असं आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमातून केलं आहे. कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी देशासह जगभरात सुरू असलेल्या विविध घडामोडींवर भाष्य केलं. सध्या जगभरात कट्टरता असहिष्णुता आणि […]

अधिक वाचा..

पालकमंत्री गोरे-आमदार कल्याशेट्टींमुळे मिळालेली मानेंची खुर्ची डळमळीत

दोन आमदार देशमुखांचा गुप्त करार सोलापूर: बाजार समितीत पुन्हा एकदा सत्ता समीकरणांचा खेळ रंगताना दिसतो आहे. पालकमंत्री गोरे व आमदार कल्याणशेट्टी यांच्या मदतीने सभापतिपदाची खुर्ची पटकावलेले माजी आमदार दिलीप माने यांचे स्थान आता डळमळीत होऊ लागल्याची चर्चा आहे. अविश्वासाच्या सावटाने बाजार समितीचे राजकारण तापले आहे. नाराज संचालकांची मोट बांधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मागील निवडणुकीत कट्टर […]

अधिक वाचा..

व्यापार हत्यार बनलं असून हा हिंदुस्थानसाठी वेकअप कॉल 

मुंबई: अमेरिकेने लादलेल्या 50 टक्के टॅरिफची अंमलबजावणी सुरू झाली असून यामुळे हिंदुस्थानवर मोठा आर्थिक बोझा पडणार आहे. याचा विविध क्षेत्रांवर परिणाम होणार आहे. याबाबत आता ‘रिझर्व्ह बॅक ऑफ इंडिया’चे माजी गव्हर्नर आणि प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. रघुराम राजन यांनी मोठे विधान केले आहे. जागतिक पातळीवर व्यापाराला हत्यार बनवले जात असून हिंदुस्थानसाठी हा वेकअप कॉल असल्याचे रघुराम […]

अधिक वाचा..

विरार इमारतीच्या दुर्घटनेत 14 जणांचा मृत्यू 

वसई: विरार इमारत दुर्घटनेत मागील वीस तासांपासून राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक व पालिकेच्या अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत 17 जणांचा शोध लागला असून त्यात 14 जणांचा मृत्यू तर 1 जण जखमी झाले आहे. तर 2 जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढत आहे. मंगळवारी रात्री विरार पूर्वेच्या विजयनगर परिसरातील रमाबाई अपार्टमेंट या […]

अधिक वाचा..

गोरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्रात तोडपाण्याचा उद्योग, महाराष्ट्र बिहार होण्याच्या मार्गावर

पुणे: पुण्यात गोरक्षकांनी आमदार सदाभाऊ खोत यांच्याशी केलेल्या गैरवर्तनाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी निषेध व्यक्त केला. गोरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्रामध्ये तोडपाण्याचा उद्योग सुरू असून महाराष्ट्र बिहारप्रमाणे होण्याच्या मार्गावर असल्याची टीका नायकवडी यांनी केली. त्यामुळे या गोरक्षकांच्या मुद्यावरुन अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या इद्रिस नायकवडी यांनी सरकारलाच घरचा आहेर दिला. गोरक्षणाच्या […]

अधिक वाचा..

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंबाबत बाळा नांदगावकर यांची भावनिक पोस्ट

मुंबई: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गणेश चतुर्थीनिमित्त मनसेप्रमुख राजसाहेब ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे उपस्थित होते. या भेटीच्या वेळी ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे प्रमुख नेते पदाधिकारी देखील उपस्थित होते. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे गेल्या काही दिवसांमध्ये तीनवेळा एकत्र आल्याचं […]

अधिक वाचा..