अजित पवारांचा मृत्यू हा अपघात नाही, तर षडयंत्रच! राखी सावंतचा खळबळजनक आरोप

बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी बारामतीत लँडिंग करताना चार्टर्ड विमान कोसळून झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले. या दुर्घटनेनंतर विमानाला भीषण आग लागली होती. या अपघातात अजित पवार यांच्यासह दोघे वैमानिक कॅप्टन सुमित कपूर आणि कॅप्टन शांभवी पाठक, अंगरक्षक विदीप जाधव तसेच फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचाही मृत्यू झाला. या घटनेने […]

अधिक वाचा..

बारामतीचा वाघ अजूनही समर्थ आहे! अजित दादांच्या निधनानंतर शरद पवार रणांगणात

बारामती: अजित पवारांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला असून, या धक्क्याचा सर्वात खोल परिणाम पवार कुटुंबावर आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर झाल्याचे दिसून येत आहे. राजकारणात कायम खंबीर आणि संयमी राहिलेले शरद पवार यांच्यासाठी हे नुकसान केवळ राजकीय नव्हे, तर अत्यंत वैयक्तिक असल्याचे बोलले जात आहे. अजित पवार हे शरद पवारांचे […]

अधिक वाचा..

अजित पवारांनंतर सत्ता-संघर्ष टोकाला! सुनेत्रा पवारांची एंट्री पण अर्थखात्याला भाजपचा ‘नकार’

अजित पवारांनंतर उपमुख्यमंत्रिपद कुणाकडे? सुनेत्रा पवारांच्या नावावर शिक्कामोर्तबाची शक्यता, अर्थखात्यावर भाजपचा दावा मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्या आकस्मिक निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. त्यांच्या रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदाची जागा कोण घेणार आणि महत्त्वाचे अर्थखाते कुणाकडे जाणार, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची उद्या (शुक्रवारी) […]

अधिक वाचा..

दादांनी ज्या कार्यालयात पक्षाचे संघटन उभे केले तिथे नतमस्तक व्हावे या भावनेतून आज पक्ष कार्यालयात आलो

डबडबलेल्या डोळ्यांनी सुनील तटकरे यांनी दादांच्या केबिनमध्ये जाऊन अभिवादन केले मुंबई: दादांनी ज्या कार्यालयात पक्षाचे संघटन उभे केले तिथे नतमस्तक व्हावे या भावनेतून आज पक्ष कार्यालयात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना दिली. आज कोणतीही पत्रकार परिषद आयोजित केलेली नाही याचा खुलासा पहिल्यांदा सुनील तटकरे यांनी केला. […]

अधिक वाचा..

राजकीय भूकंप! महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातून आज सर्वात मोठी आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुनेत्रा पवार या उद्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असून, त्यांच्यामुळे महाराष्ट्राला पहिली महिला उपमुख्यमंत्री मिळणार आहेत. या निर्णयामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात गेल्या काही तासांपासून घडामोडींना प्रचंड […]

अधिक वाचा..

नगरपालिका व महानगरपालिका निवडणुकीप्रमाणे जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीतही काँग्रेसला चांगले यश मिळेल

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करून संशयाचे ढग दूर करा मुंबई: राज्यात व केंद्रात १९९९ नंतर आघाडीचे राजकारण सुरु झालेले आहे. आघाडीच्या राजकारणात दोन पावलं मागे घ्यावी लागतात. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा विस्तार करण्यासाठी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. जेथे शक्य आहे तेथे आघाडी करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिकांना दिले होते. नगरपालिका […]

अधिक वाचा..

‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–2026’चे मुंबईत आयोजन

मुंबई: राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एम,एस,एम,ई,) क्षेत्राच्या कार्यक्षमता व उत्पादकतेत वाढ करून उद्योजकीय वातावरण अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने ‘महा निर्यात इग्नाईट कन्व्हेंशन–2026’ या जिल्हास्तरीय कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळांच्या माध्यमातून एक जिल्हा एक उत्पादन (ओडीओपी) व निर्यात प्रचालन उपक्रमांद्वारे निर्यातवृद्धीस चालना देण्यावर भर देण्यात येणार आहे. मुंबई उपनगरासाठी 2 फेब्रुवारी 2026 […]

अधिक वाचा..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाताची सीआयडी चौकशी पेक्षा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी व्हावी

नागपूर: समृद्धी महामार्गावर काँग्रेसच्या नगरसेवकाची बस थांबवून त्यांना धमकावण्यात आले, हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. यावेळी चाकू,तलवार, बंदूक असल्याची माहिती मिळाली पोलिस या प्रकरणी तपास करत असल्याची माहिती काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी दिली. समृद्धी महामार्गावर घडलेल्या प्रकरणी कोण होत, कोणी हल्ला केला याबाबत अधिकची माहिती नाही पण पोलिस याबाबत तपास करत असल्याचे वडेट्टीवार यांनी […]

अधिक वाचा..

काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी ‘प्रतिभा शोध’ अभियानात सहभागी व्हा; हरी शंकर गुप्ता

मुंबई: काँग्रेस पक्षाची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी आणि काँग्रेसचा विचार, इतिहास, लोकशाही व संविधानवादी मूल्ये तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षाच्या वतीने ‘प्रतिभा शोध’ (Talent Hunt) अभियान सुरू करण्यात आले आहे. राज्यातील सर्व स्तरांतील लोकांनी या अभियानात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन दिल्लीचे माजी आमदार व या अभियानाचे महाराष्ट्र प्रभारी हरी शंकर गुप्ता यांनी केले आहे. प्रदेश काँग्रेसचे […]

अधिक वाचा..

अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेचे भव्य आयोजन

अमरावती: संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ आणि श्री शिवाजी शिक्षण संस्था, अमरावती संचलित श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धा (पुरुष व महिला) २०२५–२६ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा दिनांक १ ते १० फेब्रुवारी २०२६ या कालावधीत श्री शिवाजी विज्ञान महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर पार पडणार […]

अधिक वाचा..