अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणाला जबर धक्का; घातपात की अपघात यावर तीव्र चर्चा

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रभावी नेते अजित पवार यांचे २८ जानेवारी रोजी झालेल्या विमान अपघातात निधन झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बारामती विमानतळावर उतरत असताना दाट धुक्यामुळे विमान धावपट्टीचा अंदाज न आल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहितीत सांगण्यात आले असले, तरी या घटनेमागे घातपात आहे का, यावर राज्यभर तीव्र चर्चा […]

अधिक वाचा..

सरपंचाची खुर्ची रिकामी होणार! राज्यातील 14,237 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचे आदेश

मुंबई: राज्यातील ग्रामीण राजकारणात मोठा बदल घडणार असून येत्या काळात राज्यातील तब्बल 14 हजार 237 ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले जाणार आहेत. ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपत असताना निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या खुर्च्या काही काळासाठी रिकाम्या राहणार आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आधीच रखडल्या आहेत. त्याच […]

अधिक वाचा..

रनवेवर थरारक क्षण! एअर इंडियाचं विमान धावपट्टीवर येताच गो-अराउंड, 10 मिनिटे हवेत घिरट्या अन्…

जयपूर: महाराष्ट्रात कथित विमान अपघाताच्या चर्चांनी खळबळ उडवून दिली असतानाच, आता जयपूरमध्ये आणखी एक मोठा विमान अपघात थोडक्यात टळल्याची घटना समोर आली आहे. एअर इंडियाच्या विमानाचं लँडिंग फेल झालं, मात्र पायलटच्या सतर्कतेमुळे सर्व प्रवासी सुरक्षित बचावले आहेत. दरम्यान, महाराष्ट्रातील एका नेत्यासंदर्भात विमान अपघाताच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत असतानाच ही जयपूरची घटना घडल्यामुळे देशभरात एकच खळबळ […]

अधिक वाचा..

आभार मानायचे राहिले… पुण्यासाठी घेतलेला दादांचा तो निर्णय ठरला अखेरचा

पुणे: महापालिका निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अक्षरशः रात्रंदिवस एक करून पुण्यात प्रचार केला. महिनाभर शहरात तळ ठोकून त्यांनी झंझावाती प्रचार केला असला, तरी पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष भाजपनंतर सर्वाधिक जागा मिळवणारा दुसरा मोठा पक्ष ठरला. या निकालानंतर महापालिकेतील विरोधी पक्षनेता पदासाठी सक्षम चेहरा निवडण्याचे अधिकार अजित पवार यांना देण्याचा […]

अधिक वाचा..

अजित पवारांनंतर सत्ता-समीकरण बदलणार? राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर मोठं प्रश्नचिन्ह

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला आहे. 29 जानेवारी रोजी बारामती तालुक्यात शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अचानक जाण्याने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासमोरही अनेक आव्हानं उभी राहिली आहेत. वक्तशीरपणा, धडाडीचे निर्णय, प्रशासनावरची पकड […]

अधिक वाचा..

राजकीय वाटचालीत अपार यश! पण अजित पवारांच्या स्वप्नांची पूर्तता होण्याआधीच नियतीचा घाला

पुणे: महाराष्ट्राच्या राजकारणातील धडाकेबाज, स्पष्टवक्ता आणि कामाचा झपाटा असलेले नेते म्हणून ओळखले जाणारे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामतीकडे येत असताना झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. या घटनेने केवळ बारामतीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. चार दशकांहून अधिक काळ चाललेल्या आपल्या राजकीय प्रवासात अजित पवार यांनी सामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य दिले. अनेक […]

अधिक वाचा..

अजित पवार विमान अपघाताचा ब्लॅक बॉक्स डीजीसीएकडे; काय होते पायलटचे शेवटचे शब्द

पुणे: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. बुधवारी (ता. 28 जानेवारी) सकाळी अजित पवार मुंबई विमानतळावरून बारामतीकडे रवाना झाले होते. VSR Venture प्रायव्हेट लिमिटेडच्या लियरजेट-45 XR या विमानातून उपमुख्यमंत्री अजित पवार, त्यांचे अंगरक्षक विदिप जाधव, कॅप्टन सुमित कपूर, को-पायलट शांभवी पाठक आणि फ्लाइट अटेंडंट पिंकी माळी प्रवास करत होते. हे […]

अधिक वाचा..

कायदे असूनही बालक असुरक्षितच! बालकांच्या सुरक्षेसाठी समाज कधी जागा होणार?

बदलापूर: बदलापूर येथे घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण समाज हादरून गेला आहे. अशा घटना केवळ कायद्याने थांबत नाहीत, तर त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाची जागरूकता तितकीच महत्त्वाची आहे. सरकार कितीही कठोर कायदे आणि नियम तयार करीत असले, तरी त्यांची अंमलबजावणी होत नसेल तर ते कागदावरच राहतात, ही दुर्दैवी वस्तुस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. बालकांवरील लैंगिक […]

अधिक वाचा..

लोकल प्रवासात ‘परफ्युम’ ठरतोय सापळा! ठाणे स्टेशनवरील तरुणीचा धक्कादायक अनुभव व्हायरल

परफ्युम विक्रीच्या बहाण्याने दागिने व मौल्यवान वस्तू लंपास करणाऱ्या टोळीपासून सतर्क राहण्याचे आवाहन मुंबई: मुंबईत लोकल ट्रेन आणि स्टेशन परिसरात प्रवास करताना फिरते विक्रेते परफ्युम, कपडे, घरगुती साहित्य विकताना सर्रास दिसतात. अनेकदा मदतीच्या भावनेतून प्रवासी अशा विक्रेत्यांशी संवाद साधतात किंवा वस्तू खरेदी करतात. मात्र, हाच दयाळूपणा कधी कधी धोकादायक ठरू शकतो. सध्या सोशल मीडियावर एका […]

अधिक वाचा..

भारतात निपाह व्हायरसचा शिरकाव; उपचार व लस नसल्याने खळबळ

कोलकाता: भारतामध्ये निपाह व्हायरसच्या नवीन प्रकरणांची पुष्टी झाल्यानंतर केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण आशियामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृत्यूदर ४० ते ७५ टक्क्यांपर्यंत असलेल्या या घातक विषाणूमुळे अनेक देश अलर्ट मोडवर गेले असून, भारतातून येणाऱ्या प्रवाशांवर कडक नजर ठेवली जात आहे. पश्चिम बंगालमध्ये प्रकरणे, प्रशासन सतर्क आरोग्य अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, कोलकाताजवळील एका खाजगी रुग्णालयात निपाह […]

अधिक वाचा..