Eknath Shinde and Nathabhau Shewela

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या: नाथाभाऊ शेवाळे

महाराष्ट्र

रांजणगाव गणपती (तेजस फडके): महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या, अशी मागणी महाराष्ट्र जनता दल (सेक्युलर) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली आहे.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर अतिवृष्टी होऊन राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे, फळझाडे, जनावरे यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. अनेक गरीब कुटुंबांची घरे पावसात पडली असून, अनेक कुटुंब बेघर झाली आहेत. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र जनता दल (सेक्युलर) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

hotel matoshree ranjangaon ganpati
hotel matoshree ranjangaon ganpati

महाराष्ट्रात काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी व गरीब कुटूंबाचे झालेले नुकसान लक्षात घेता त्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी महाराष्ट्र जनता दल (सेक्युलर) पक्षाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. त्याची पुर्तता करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांना दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी ज्या-ज्या जिल्ह्यात नुकसान भरपाई झाली आहे. तेथे सर्वांना मदत दिली जाईल, असे सांगितले.