वाहतुकीचे नियम मोडल्यास भरावा लागेल 10 पट अधिक दंड; जाणून घ्या दंडाची नवीन रक्कम

महाराष्ट्र

मुंबई: जर तुम्ही गाडी चालवताना वाहतुकीचे नियम मोडत असाल तर आता अधिक सावध राहा. कारण १ मार्च २०२५ पासून नवीन दंड नियम लागू झाले आहेत. पूर्वीपेक्षा १० पट अधिक दंड आणि तुरुंगवासाची शिक्षा लागू करण्यात आली आहे.

पूर्वी आणि आताच्या दंडाची रक्कम

हेल्मेटशिवाय दुचाकी चालवल्यास

पूर्वी: ₹100 दंड

आता: ₹1,000 दंड आणि 3 महिने लायसन्स निलंबित

दुचाकीवर २ पेक्षा जास्त प्रवासी असल्यास  

पूर्वी: ₹200 दंड

आता: ₹1,000 दंड

सीट बेल्ट न घालता वाहन चालवल्यास

पुर्वी: ₹100 दंड

आता: ₹1,000 दंड

सिग्नल तोडल्यास

पूर्वी: ₹500 दंड

आता: ₹5,000 दंड

गाडी चालवताना मोबाईल वापरल्यास

पुर्वी: ₹500 दंड

आता: ₹5,000 दंड

वेगमर्यादा ओलांडून किंवा स्टंट केल्यास

पूर्वी: ₹1,000 दंड

आता: ₹5,000 दंड

दारू पिऊन गाडी चालवल्यास

पूर्वी: ₹2,000 दंड आणि 6 महिने तुरुंगवास

आता: ₹10,000 दंड आणि 6 महिने तुरुंगवास

दुसऱ्यांदा पकडले गेल्यास ₹15,000 दंड आणि 2 वर्ष तुरुंगवास.

रुग्णवाहिकेसारख्या आपत्कालीन वाहनांसाठी रस्ता न सोडल्यास

पूर्वी: ₹1,000 दंड

आता: ₹10,000 दंड

ड्रायव्हिंग लायसन्स नसल्यास

पूर्वी: ₹500 दंड

आता: ₹5,000 दंड

इन्शुरन्सशिवाय वाहन चालवल्यास

पूर्वी: ₹1,000 दंड

आता: ₹2,000 दंड आणि 3 महिने तुरुंगवास

१८ वर्षांखालील मुलाने गाडी चालवल्यास

पूर्वी: ₹5,000 दंड

आता: ₹25,000 दंड, 3 वर्ष तुरुंगवास आणि 1 वर्ष वाहन नोंदणी रद्द

(तसेच, २५ वर्षांपर्यंत लायसन्स दिले जाणार नाही.