विजयस्तंभावर येत नसल्याने सरकारची मानसीकता समजते; जितेंद्र आव्हाड

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील जयस्तंभ येथे अभिवादन करण्यासाठी माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यहे उपस्थित झाले होते. यावेळी त्यांनी जयस्तंभास अभिवादन केले. यावेळी बोलताना या ठिकाणी मानवंदना देणं चुकीच नाही, पूर्वी एवढ्या मोठ्या सैन्याना हरवणं अवघड होतं त्याचा इतिहास आहे, असे माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

यावेळी अधिक बोलताना पुण्याचे पालकमंत्री आणि सरकार वरती बोलायचं नाही, त्यामुळे कोणी येथे येत नाही, त्याबाबत देखील मला बोलायचे नाही, येथे न येण्यानेच सरकारची मानसिकता काय आहे ते समजून जायचे अशी टीका इथं येत नाही तर समजून जायच, अशी टिका माजी मंत्री व राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.