सुखबीर सिंग बादल यांच्यावरील हल्ल्याचा शिंदेंकडून तीव्र निषेध; आरोपींवर कठोर कारवाईचे निर्देश

मुंबई : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेड येथे झालेला हल्ला अत्यंत निंदनीय आणि धक्कादायक असल्याचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. घटनेची माहिती मिळताच एकनाथ शिंदे यांनी सुखबीर सिंग बादल यांच्या पत्नी आणि पंजाबच्या खासदार हरसिमरत कौर बादल […]

अधिक वाचा..

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या घटनेमागे भाजप आणि पोलिसांची फूस असल्याचा गंभीर आरोप केला. हा प्रकार लोकशाहीसाठी धोकादायक असून, काँग्रेस गांधींचा अहिंसेचा मार्ग सोडणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सपकाळ म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयात पोहोचले, तरी पोलिसांना […]

अधिक वाचा..

विकास लवांडे यांच्यावरील हल्ला वारकरी संप्रदायाचा अपमान; हल्लेखोरांवर कठोर कारवाई करा;  हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे प्रवक्ते विकास लवंडे यांच्यावरील शाईहल्ला, धक्काबुक्की आणि शिवीगाळीची घटना ही भ्याड मानसिकतेचे प्रतीक असून हा वारकरी संप्रदायाचा अपमान असल्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली. हल्लेखोरांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली. गांधी भवन येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सपकाळ म्हणाले की, विकास […]

अधिक वाचा..

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला. महिलांना आरक्षण मिळायला हवे होते; मात्र या मुद्द्यावर काँग्रेसने वर्षानुवर्षे केवळ राजकारण केले, अशी टीकाही त्यांनी केली. नवी दिल्ली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापराव […]

अधिक वाचा..

मिडल ईस्टमधील संघर्षाचा बळी: इराकजवळ तेल टँकरवरील हल्ल्यात मुंबईतील इंजिनियरचा मृत्यू

मुंबई: पश्चिम आशियात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या तणावपूर्ण संघर्षाने आता गंभीर वळण घेतले असून, United States आणि Israel यांनी Iran वर हल्ले केल्याने परिस्थिती अधिक चिघळली आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराकजवळील तेल टँकरवर झालेल्या हल्ल्यात मुंबईतील एका भारतीय अभियंत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. देवोनंदन प्रसाद सिंह (वय ५४), जे Mumbai येथील कांदिवली […]

अधिक वाचा..

किर्तनातील वक्तव्याचा राग; किर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकरांवर हल्ला

छत्रपती संभाजीनगर: किर्तनात केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्याच्या रागातून किर्तनकाराला घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील गांधिली गावात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले असून पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकर यांच्या कीर्तनातील एका वक्तव्यामुळे […]

अधिक वाचा..

नागपूर स्फोटप्रकरणी सरकारवर हल्लाबोल; ‘हे हत्याकांडच’;  विजय वडेट्टीवार

मुंबई: नागपूर येथील SBL कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात २२ निष्पाप कामगारांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरून विधानसभेत जोरदार खळबळ उडाली. हा प्रकार केवळ हलगर्जीपणा नसून प्रशासकीय यंत्रणा आणि कंपनी मालकांच्या संगनमताने केलेले ‘हत्याकांड’ असल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला. विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून हा मुद्दा उपस्थित करताना वडेट्टीवार यांनी एफआयआरमधील त्रुटींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. […]

अधिक वाचा..

पुण्यात काँग्रेस कार्यालयावर हल्ला; भाजपवर गंभीर आरोप

पुणे: पुण्यात राजकीय वातावरण तापले असून काँग्रेस कार्यालयावर झालेल्या हल्ल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. “माझ्या वक्तव्याची मोडतोड करून ‘ध’ चा ‘मा’ करण्यात आला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असे मी सांगितले होते. त्याचा प्रत्यय आज पुण्यात आला,” असा आरोप संबंधित नेत्याने केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या कार्यालयावर चाल […]

अधिक वाचा..

महापालिका निकालानंतर मनोज जरांगे पाटील यांचा अजित पवारांवर हल्लाबोल; फडणवीसांनाही इशारा

मुंबई: महापालिका निवडणुकीच्या निकालात राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असून शिवसेना शिंदे गटालाही चांगले यश मिळाले आहे. मात्र, या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला तसेच शरद पवार गटालाही मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, “यांनी बघायला काही […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात वाळू माफियाचा हैदोस; शेतकऱ्याच्या कुटुंबासह ६ महिन्यांच्या गरोदर महिलेवर जीवघेणा हल्ला…

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी–लगडवाडी परिसरात वाळू माफियांची दहशत पुन्हा एकदा उघडकीस आली असून, बेकायदेशीर वाळू वाहतुकीला विरोध केल्याच्या रागातून एका शेतकऱ्यासह त्याच्या कुटुंबीयांवर अमानुष हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत ६ महिन्यांची गरोदर महिला, वृद्ध आईसह चौघे जखमी झाले आहेत. लक्ष्मण मारुती कोळपे (वय ३९, रा. चिंचणी, ता. […]

अधिक वाचा..