बागेश्वर बाबांच्या वक्तव्यावरून महाराष्ट्र पेटला; माफी नंतरही वाद कायम

शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्यावर संताप; राज्यभर आंदोलन, राजकीय प्रतिक्रिया तीव्र नागपूर: धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रात तीव्र वाद निर्माण झाला आहे. नागपूर येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी “छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करून थकले होते आणि त्यांनी सत्ता समर्थ रामदास यांच्याकडे सोपवण्याची इच्छा व्यक्त केली होती” असे विधान केले. […]

अधिक वाचा..

साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी

मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून आला आहे. बदलीच्या दिवशीच त्यांनी ‘पॉवर प्ले’ करत जिल्ह्यातील सहा ते सात पोलीस अधिकाऱ्यांच्या कथित नियमबाह्य बदल्या केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून शिवसेना सातारा जिल्ह्याने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतली आहे. […]

अधिक वाचा..

मुलासाठी कुणासोबतही झोपेन’ वक्तव्यामुळे ‘वडापाव गर्ल’ चंद्रिका दीक्षित वादात

मुंबई: ‘वडापाव गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि Bigg Boss OTT 3 फेम Chandrika Dixit पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अलीकडेच एका पॉडकास्टमध्ये दिलेल्या मुलाखतीतील तिचे वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल झाले असून त्यावरून मोठी चर्चा रंगली आहे. दिल्लीमध्ये वडा पावचा स्टॉल लावल्यामुळे चंद्रिका दीक्षितला सोशल मीडियावर ‘वडा पाव गर्ल’ म्हणून मोठी लोकप्रियता […]

अधिक वाचा..

शिस्तीचा बोजवारा! एसपींच्याच कॅबिनमध्ये कर्मचारी मद्यधुंद अवस्थेत; पोलिस दल पुन्हा वादात

बीड: बीड जिल्हा पोलिस दल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. काही मनमानी वर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे दलाची प्रतिमा मलिन होत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या शासकीय निवासस्थानी एका कर्मचाऱ्याला गांजा ओढताना पकडण्यात आले होते. त्या घटनेची चर्चा अद्याप थंडावलेली नसतानाच आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खुद्द […]

अधिक वाचा..

‘बिग बॉस मराठी’च्या घरात राखीचा धुमाकूळ; पिठफेक ते खुर्ची फेकण्यापर्यंत वादाचा कळस

मुंबई: बिग बॉस मराठीच्या सहाव्या आठवड्यात घरातील वातावरण अक्षरशः तापले आहे. या आठवड्यात एकूण नऊ सदस्य एलिमिनेशनसाठी नॉमिनेट झाले असून सचिन कुमावत, राकेश बापट, प्रभू शेळके, अनुश्री माने, रोशन भजनकर, सागर कारंडे, दिपाली सय्यद, प्राजक्ता शुक्रे आणि रुचिता जामदार यांच्यावर घराबाहेर जाण्याची टांगती तलवार आहे. घराची सूत्रे राखीकडे; सदस्यांवर दबाव या सगळ्यात ड्रामा क्वीन म्हणून […]

अधिक वाचा..

लोकसभेत ‘हल्ल्याचा प्लॅन’ वाद: मोदींसह आणखी एक खासदार टार्गेटवर असल्याचा पीयूष गोयल यांचा दावा

नवी दिल्ली: संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान ४ फेब्रुवारी रोजी लोकसभेत घडलेल्या घटनेवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. काँग्रेसच्या महिला खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला करण्याचा कथित प्लॅन आखल्याचा धक्कादायक दावा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केल्यानंतर मोठी खळबळ उडाली होती. आता या प्रकरणात केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी आणखी एक गंभीर दावा करत वादाला नवे वळण […]

अधिक वाचा..

जयंत पाटील यांचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात; रुपाली ठोंबरे आणि अमोल मिटकरींचा संताप

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीविषयी शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी केलेल्या विधानावरून राजकीय वर्तुळात वाद उडाला आहे. जयंत पाटील म्हणाले होते की, “उपमुख्यमंत्री पदाचा शपथविधी १५ दिवसांनी झाला असता, तर काय घडले असते?”यावर प्रतिक्रिया व्यक्त करत रुपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, “जयंत पाटील यांचे विधान महाराष्ट्रातील महिलांना किंवा राज्याला गरजेचे नाही. त्यांनी अशा […]

अधिक वाचा..

गौतमी पाटील–राधा पाटील वादावर गौतमीचं शांत पण सडेतोड उत्तर; म्हणाली…

पुणे: लावणी या पारंपरिक नृत्यप्रकाराला ग्लॅमरची नवी ओळख मिळवून देणाऱ्या गौतमी पाटील आणि राधा पाटील या दोन कलाकार सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. दोघांचेही लावणी कॉन्सर्ट हाऊसफुल्ल होत असून चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळतोय. मात्र या लोकप्रियतेसोबतच दोघींमधील कथित ‘कोल्ड वॉर’ देखील चर्चेचा विषय ठरत आहे. अलीकडेच अभिजात मराठीला दिलेल्या मुलाखतीत गौतमी पाटीलने राधा पाटीलसोबतच्या वादावर पहिल्यांदाच […]

अधिक वाचा..

अजित पवार गेले, पण वाद उफाळला! पवार कुटुंबात नेमकं काय सुरू आहे

मुंबई: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि अनुभवी अर्थतज्ज्ञ नेते अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्य कसे चालवायचे, आर्थिक घडी कशी बसवायची याचा दांडगा अनुभव असलेला नेता काळाच्या पडद्याआड गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळाजवळ अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला आणि यात […]

अधिक वाचा..

‘मुंब्रा हिरवा करू’ वक्तव्यावरून राजकीय वाद! AIMIM नगरसेविका सहर शेख अडचणीत

मुंब्रा: ठाणे महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक ३० मधून निवडून आलेल्या AIMIM पक्षाच्या नव्या नगरसेविका सहर शेख यांच्या विजय भाषणातील “पुढील पाच वर्षांत संपूर्ण मुंब्रा हिरवा करू” या वक्तव्यावरून मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. २२ वर्षीय सहर शेख यांनी निवडणूक विजयाच्या आनंदात […]

अधिक वाचा..