जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज तुमची खास डील फायनल होऊ शकते. यासोबतच तुमच्या शारीरिक विकासाच्या चांगल्या संधी निर्माण होत आहेत. तुम्हाला कोणत्याही मंगलोत्सवात सहभागी होण्याची संधी मिळेल. समाजात शुभ खर्चाने तुमची कीर्ती वाढेल. वृषभ: आज नवीन योजनांवर अधिक लक्ष केंद्रित करणार आहेत. एखाद्या पवित्र स्थळाला भेट देऊन मनःशांती मिळेल. तसेच तुम्हाला कोणत्याही कायदेशीर वादात यश मिळू शकते. तुम्हाला […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीकडून ‘गद्दार दिवस’ साजरा; आंदोलन करत गद्दारांचा केला निषेध…

मुंबई: पन्नास खोके, एकदम ओके… पन्नास खोके खाऊन माजलेत बोके…खोके सरकार हाय हाय,गद्दारांना इथे जागा नाय… महाराष्ट्रातून गद्दार, होणार हद्दपार… अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसने गद्दारांच्या विरोधात आंदोलन केले. आज ‘गद्दार दिवस’ म्हणून साजरा करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केल्यानंतर राष्ट्रवादी भवनच्या बाहेर महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी हातभार लावणार्‍या चाळीस गद्दारांच्या विरोधात हे […]

अधिक वाचा..

राज्यघटनेचे संरक्षण करायचे असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नाही; मुकुल वासनिक

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातून काँग्रेसचे सर्वात जास्त खासदार निवडून आणू; नाना पटोले मुंबई: भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटना तयार झाली पण या राज्यघटनेचे बीज स्वातंत्र्यापूर्वीच कराची अधिवेशनात पेरले गेले होते. स्वातत्र्यानंतर देश कसा असेल, कोणासाठी स्वांतत्र्य हवे, याचा विचार झाला तेव्हा सर्व धर्मांना बरोबर घेऊन जाणारा देश उभा करण्याचा विचार झाला आणि त्यातच राज्यघटनेचे बीज रोवले गेले. […]

अधिक वाचा..

कितीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही दडपशाहीच्याविरोधात लढत राहणार

मुंबई: या राज्यात लोकशाही राहिली आहे का? असा सवाल करतानाच रस्त्यावर आंदोलन करायला परवानगी मिळत नसेल तर कितीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही दडपशाहीच्या विरोधात लढत राहणार, असा स्पष्ट इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांनी माध्यमांशी बोलताना दिला. दरम्यान ‘महाराष्ट्र कभी झुका है, ना कभी झुकेगा’… ‘मोडेन पण वाकणार नाही’ जे ‘गद्दार’ […]

अधिक वाचा..

आज निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडी १८० ते २०० जागा जिंकेल…

मुंबई: आज राज्याच्या निवडणुका झाल्या तर महाविकास आघाडी १८० ते २०० जागा जिंकेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असेल असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. न्यूज एरिना इंडियाने केलेल्या निवडणूक सर्वेक्षणात महाराष्ट्रातील मतदारांची खरी भावना दिसून येत नाही, असे स्पष्ट मत महेश तपासे यांनी व्यक्त केले आहे. […]

अधिक वाचा..

मांडवगण फराटा येथे अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने बैठकीचे आयोजन

शिरुर (तेजस फडके) अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने मांडवगण फराटा (ता. शिरुर) येथे रविवार (दि 18) रोजी येथील माऊली मंदिर येथे बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी मराठा महासंघाचे राष्ट्रीय संयुक्त सरचिटणीस गुलाब गायकवाड  जिल्हा सरचिटणीस भास्कर पुंडे यांनी मराठा समाजाच्या विविध सद्यस्थितीतल्या समस्यांवरती भाष्य करत युवकांच्या रोजगाराच्या समस्या तसेच आपले रोजगार बाहेर कसे जातात आपण […]

अधिक वाचा..

बाभुळसर खुर्द येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या कामाचे सरपंच सोनाली फंड यांच्या हस्ते भूमिपूजन 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री आणि शिरुर -आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून तसेच शिरुर पंचायत समिती यांच्या 15 व्या वित्त आयोग, बंदित निधीतून बाभुळसर गावासाठी 10 लाख रुपये चा जलशुद्धीकरण प्रकल्प मंजूर करण्यात आलेला आहे. या कामाचे भूमिपूजन बाभुळसर खुर्द गावच्या सरपंच सोनाली फंड व उपसरपंच […]

अधिक वाचा..

शिरुर मध्ये पैसे मागितल्याच्या कारणावरुन महिलेसह तिच्या पतीस मारहाण

शिरुर (तेजस फडके): शिरुर येथील हुडको कॉलनीत उसने दिलेले पैसे मागितल्याच्या कारणावरुन एका व्यक्तीने एका महिलेसह तिच्या पतीला स्टम्प व बॅट तसेच हाताने लाथाबुक्याने मारहाण करुन दुखापत करुन “तु परत इकडे आला तर तुला संपवुन टाकेन” अशी धमकी दिल्याप्रकरणी एका महिलेने शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असुन हबीब सय्यद रा. शिरुर (ता. शिरुर), जि.पुणे […]

अधिक वाचा..

राहुल गांधी’ असणं खरंच सोपं नाही; संजय आवटे

मुंबई: वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी सख्ख्या काकाचा मृत्यू तुम्ही पाहाता. लाडक्या आजीचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसतो, तेव्हा तुम्ही उण्यापु-या चौदा वर्षांचे असता. एकविसाव्या वर्षी वडिलांच्या शरीराच्या झालेल्या चिंधड्या तुम्हाला दिसतात. तरीही, तुम्ही विचलित तर होत नाहीच. उलट, वडिलांच्या मारेक-यांना माफ करता. आई-वडिलांचा प्रेमविवाह. आई मूळची वेगळ्या देशाची. म्हणून, असभ्य, अश्लील भाषेत तिच्यावर रोज टीका […]

अधिक वाचा..

५०० रुपयांच्या १७६ कोटी नव्या नोटा कोणाच्या खिशात गेल्या?

मुंबई: मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नसल्याचा भाजपाचा दावा खोटा असून मोदी सरकार भ्रष्टाचारात बुडालेले आहे. आता आणखी एक घोटाळा उघड झाला असून २०१६-१७ या वर्षात ५०० रुपयांच्या ८८१०.६५ दशलक्ष नव्या नोटा छापण्यात आला परंतु आरबीआयकडे ७२५० दसलक्ष नोटाच पोहचल्या म्हणजेच ८८ हजार कोटी रुपये मुल्य असलेल्या १७६ कोटी नोटा गायब झाल्याची माहिती उघड झाली […]

अधिक वाचा..