यांनी महाराष्ट्राला फक्त सुडाचे राजकारण दिले…

नागपूर: आमची ही वज्रमूठ सभा ही विदर्भातील शेतकऱ्यांची वज्रमूठ आहे… विदर्भवासियांची वज्रमूठ आहे… ही ‘वज्रमूठ सभा’ सध्याच्या राज्यकर्त्यांना विचारत आहे की, मागच्या १० महिन्यात तुम्ही काय दिवे लावले…या सरकारने महाराष्ट्राला काय दिले ?… कोणते प्रकल्प विदर्भासाठी आणले ? …शेतकऱ्यांना काय मिळाले ? …अवकाळीसाठी शेतकऱ्यांना काय मदत दिली ?… तरुणांना सरकारने काय दिले ?…असे अनेक सवाल […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांनो, तुमच्यावर आत्महत्येची वेळ आणणाऱ्या भाजपाला निडणुकीतून धडा शिकवा

मुंबई: राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून शेतकऱ्यांच्यामागे अवकाळी पाऊस लागला व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले पण हे सरकार शेतकऱ्यांना मदत करत नाही. गारपीट झाली, शेतकरी ढसाढसा रडतोय त्याला मदत देत नाही पण जाहीरातींवर मात्र कोट्यवधी रुपये खर्च करत आहे. केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील शिंदे सरकारच्या चुकीच्या धोणामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या दहापटिने वाढल्या आहेत. सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलिसांमुळे २६/११ च्या हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकाच्या पत्नीला मिळाला न्याय 

रांजणगाव गणपती (तेजस फडके): मुंबई येथे झालेल्या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात अतिरेक्यांनी केलेल्या गोळीबारात शहिद झालेले सैनिक अंबादास पवार यांच्या पत्नीकडुन एका बांधकाम व्यावसायिकाने बांधकाम करण्यासाठी घेतलेले ३ लाख रुपये तो देण्यास टाळाटाळ करत असल्याने रांजणगाव MIDC पोलिसांनी शहीद सैनिकाच्या पत्नीस हे पैसे मिळविण्यासाठी न्याय मिळवून देण्यात रांजणगाव एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे. सदरची कामगिरी […]

अधिक वाचा..

बाजार समिती, खरेदी विक्री संघ निवडणुकीत भाजपा व शिंदे गटाशी युती करु नये

महाविकास आघाडीतच निवडणुक लढवा, अन्यथा कारवाई करु मुंबई: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची राज्यात महाविकास आघाडी आहे. राज्यातील सर्व प्रकारच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवण्याचा पक्षाचा निर्णय आहे. परंतु काही ठिकाणी शिंदे गट व भाजपाशी युती केल्याच्या तक्रारी येत आहेत, हे पक्षशिस्तीचे उल्लंघन आहे. अशी युती करणाऱ्यांवर कड कारवाई केली जाईल, […]

अधिक वाचा..

कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

शिक्रापूर (शेरखान शेख): जनतेच्या कामात हलगर्जीपणा व निष्काळजीपणा केल्याबद्दल शिरुर येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शिरूर तालुका भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष व शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापूसाहेब काळे यांनी निवेदनाद्वारे पुणे येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता यांच्याकडे केली आहे. निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील बापूसाहेब काळे यांनी अधीक्षक अभियंता यांना दिलेल्या निवेदनानुसार […]

अधिक वाचा..

आनंदाश्रम शाळेतील २२० विद्यार्थ्यांना साहित्य वाटप

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील समता शिक्षण संस्थेच्या आनंदाश्रम प्राथमिक शाळेतील तब्बल 220 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील समता शिक्षण संस्थेच्या आनंदाश्रम प्राथमिक शाळेत पुणे येथील ब्रेन बीज सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने विद्यार्थ्यांना दोन गणवेश, रेनकोट, बूट, स्वेटर यांसह पहिली ते सातवी पर्यंतच्या प्रत्येक […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कपड्याचे भले मोठे दुकान जळून खाक

दुकान खाक झाल्याने तब्बल एक कोटीचे नुकसानीच अंदाज शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरु येथील एस टी स्टँड समोर असलेले वामा फॅशन हे भलेमोठे कपड्याचे दुकान सकळच्या सुमारास जळून खाक होऊन तब्बल 1 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात असून नागरिकांसह अग्निशमक दलाच्या जवानांकडून आग विझवण्यात यश आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एस […]

अधिक वाचा..

कारेगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्त्यास लेखी पत्राद्वारे धमकी

शिरुर (तेजस फडके): कारेगाव येथील माहिती अधिकार कार्यकर्ते वैभव मुरलीधर देशमुख यांनी शिरुर आणि तळेगाव ढमढेरे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात सन 2021 ते आत्तापर्यंत झालेल्या बेकादेशीर गुंठेवारीची खरेदीखते रद्द करण्याची मागणी केल्याने अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराच्या दरवाज्यावर “माहिती अधिकार माहिती थांबावा अन्यथा तुला थांबवेल” असा धमकी वजा संदेश दिला असल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत वैभव […]

अधिक वाचा..

पऱ्हाडवाडीत यात्रेचा खर्च टाळून शाळेला मदत

यात्रेनिमित्त शालेय मुलांचा बालआनंद मेळावा संपन्न शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरूर) येथील पऱ्हाडवाडी येथे ग्रामस्थांनी यात्रेनिमित्त होणारा खर्च टाळून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचा वार्षिक स्नेहसंमेलन व बाल आनंद मेळावा आयोजित केल्याने शाळेला मोठी मदत झाली आहे. केंदूर (ता. शिरूर) येथील पऱ्हाडवाडी येथे गेली तीन वर्षांपासुन सदर स्त्युत्य उपक्रम राबविला जात आहे, शाळेत भौतिक […]

अधिक वाचा..

शाळा सोडल्याचा दाखला नसेल तरीही प्रवेश!

पालकांच्या संमतीनेच ठरेल ‘इंग्रजी’ शाळांची फी…   औरंगाबाद: चालू शैक्षणिक वर्षाची सुरवात १२ जूनपासून होणार आहे. तत्पूर्वी, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याची लगबग सुरु झाली आहे. दोन वर्षांतून एकदा १५ टक्के शुल्क वाढीचा अधिकार संबंधित इंग्रजी माध्यमांच्या शाळांना आहे. दाखला नसेल, तरीही मिळणार प्रवेश पहिली-दुसरीत शिकत असलेला मुलगा इतर दुसऱ्या शाळेत प्रवेश घेत असल्यास त्याला […]

अधिक वाचा..