काशिद समुद्रात ६ जण बुडाले, चौघांना वाचवलं; एकाचा मृत्यू, १ बेपत्ता…

औरंगाबाद: कन्नड येथील सानेगुरुजी विद्यालयातील विद्यार्थी दोन विद्यार्थी रायगड जिल्ह्यातील काशीद समुद्रात बुडाल्याची दुर्घटना घडली आहे. त्यापैकी, एका मुलाचा मृतदेह सापडला असून दुसऱ्या मुलाचा कसून शोध सुरू आहे. येथील समुद्रात एकूण ५ जण बुडाले होते, त्यापैकी तीन जणांना वाचविण्यात यश आले असून एकाचा मृत्यू झाला आहे. तर, दुसरा अद्यापही बेपत्ता आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने […]

अधिक वाचा..
crime

सणसवाडीत कंपनी कामगारांकडून मालाचा अपहार

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील रोव्हेगा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील कामगारांनीच कंपनीच्या स्टोअर रुम मधील मालाचा अपहार केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ज्ञानेश्वर प्रल्हाद पवार व विनोद दत्तात्रय धुमाळ या दोघा कामगारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील रोव्हेगा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीतील स्टोअर रुम […]

अधिक वाचा..

पत्नीला कपडे धुण्यास सांगून पतीची आत्महत्या

शिरुर तालुक्यातील सनसवाडीतील खळबळजनक घटना शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथे एका परप्रांतियाने पत्नीला घराबाहेर कपडे धुण्यास सांगून घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याची घटना घडली तर राजनाथ छोटेलाल गौतम असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथे राजनाथ गौतम हा त्याचा पत्नीसह […]

अधिक वाचा..

माजी सैनिकाच्या पत्नीची फसवणूक करणारा मोकाट

माजी सैनिक संघटनेचा शिक्रापूर पोलीस स्टेशनवर मोर्चा शिक्रापूर (शेरखान शेख): वरुडे (ता. शिरुर) येथील एका माजी सैनिकाच्या पत्नीची जमीन खरेदीमध्ये लाखो रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल होऊन महिला उलटून देखील शिक्रापूर पोलीस आरोपीला अटक करत नसल्याने संतप्त माजी सैनिकांनी शिक्रापूर पोलीस स्टेशनवर मोर्चा काढून आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली आहे. वरुडे (ता. […]

अधिक वाचा..

एक जानेवारीच्या यशस्वी बंदोबस्ताबद्दल पोलीस अधिकाऱ्यांचा सन्मान

शिक्रापूर (शेरखान शेख): एक जानेवारी २०२३ रोजी कोरेगाव भीमा येथे होणारा २०५ वा शोर्यदिन शांततेत पार पाडण्यासाठी जबाबदारी पोलीस अधिकाऱ्यांवर असताना पोलीस अधिकाऱ्यांनी चोख बंदोबस्त लावत कायदा व सुव्यवस्थेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल पोलीस अधिकाऱ्यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सन्मानचिन्ह देत सन्मान करण्यात आला आहे. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे प्रत्येक वर्षी एक जानेवारी रोजी […]

अधिक वाचा..
ST

सुरक्षित प्रवास हेच एसटीचे प्रमुख ध्येय…

अपघात मुक्त सेवा देण्यासाठी एसटीचे चालक कटिबद्ध..! ११ जानेवारीपासून एसटीचे सुरक्षितता अभियान …  मुंबई: राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या निर्देशानुसार व राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटीमध्ये ११ जानेवारी ते २५ जानेवारी २०२३ दरम्यान सुरक्षितता मोहीम राबवली जात आहे. सध्या दररोज सुमारे ४० लाख प्रवाशांना दळणवळणाची सुरक्षित सेवा देणारी एसटी महाराष्ट्राची लोकवाहिनी बनली आहे. गेल्या ७५ वर्षात […]

अधिक वाचा..

कायदेशीर लढाईत उध्दव ठाकरेंची निकटवर्तीयांकडून दिशाभूल?

नवी मुंबई: सत्तासंघर्षाच्या लढाईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये काही जोडपत्र सादर केले नसल्याचा खुलासा केंद्रिय निवडणुक आयोगाने केला आहे. त्याचबरोबर शिंदे यांनी सादर केलेले प्रतिनिधी सभेचे इतिवृत्त हे शिवसेनेच्या घटनेप्रमाणे नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे शिंदे यांच्या याचिकेत असलेल्या अनेक त्रुटी या निकटवर्तींयांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून लपवून त्यांची दिशाभूल केली का? हा […]

अधिक वाचा..

कुणबी जोडो अभियानातून रायगडमध्ये एकटवला कुणबी समाज

पोलादपूर: स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 75 वर्षे होऊनही कोकणातील कुणबी समाज उपेक्षितच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी तसेच समाज संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने आता कुणबी जोडो अभियानाला सुरुवात झाली आहे. कुणबी जोडो अभियानातून रायगडमध्ये कुणबी समाज एकटवला आहे. महाड तालुक्यात काळ हजारोंच्या संख्येने समाजबांधव एकत्र आले. डिसेंबर 2022 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून कोकणातील कुणबी जोडो अभियानाची सुरुवात […]

अधिक वाचा..

अटलजींच्या मार्गाने देशाला सर्वोच्च शिखरावर पोहोचवू…

अटल सम्मान पुरस्काराने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सन्मानित  मुंबई: सर्व देशांनी घातलेल्या बहिष्काराची पर्वा नं करता तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी पोखरणमध्ये अणुचाचणी घेऊन जगाला भारताची ताकद दाखवली. त्यांनी भारत देशाला आत्मनिर्भर बनविले. अटलजींच्या मार्गांवर चालून देशाला सर्वोच्च शिखरावर पोहोचवू या, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. बांद्रा येथील हॉटेल रंगशारदामध्ये दीप कमल फाउंडेशनतर्फे […]

अधिक वाचा..

चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीसह मुलाचा गळा आवळून खून…

औरंगाबाद: चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीसह अडीच वर्षाच्या मुलाची गळा दाबून हत्या केल्‍याची धक्‍कादायक घटना शहरातील कांचनवाडी परिसरात आज सकाळी घडली असून आरती समीर म्हस्के (वय २९, रा. भाग्यनगर, आनंदविहार रोड), निशांत समीर म्हस्के अशी मृतांची नावे आहेत. औरंगाबाद शहरातील सातारा पोलिसांनी आरोपी पती समीर विष्णू म्हस्के याला ताब्यात घेतले आहे. समीरच्या आईचाही आरोपींमध्ये समावेश […]

अधिक वाचा..