शिरुरमध्ये राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन

शिरुर: राजमाता जिजाऊ यांच्या ४२५ व्या जयंतीनिमित्त शिरुर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी शहरातील जुन्या नगरपालिकेजवळ राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात येणार असुन दुपारी 2 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करुन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. या मिरवणुकीमध्ये झांज पथक, लेझिम पथक,तसेच मर्दानी खेळ होणार असुन […]

अधिक वाचा..

नगरपरिषदेचे अधिकारी सुभाष चौकाकडे जाणाऱ्या अतिक्रमणावर कारवाई करणार का…?

शिरुर (तेजस फडके): “शिरूरच्या बाजारपेठेत अतिक्रमण करत बांधकाम सुरू,नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष” असे वृत्त “शिरुर तालुका डॉट कॉम” ने प्रसिद्ध केले होते. तसेच याबाबत शिरुर नगरपालिकेकडे सुरेश खांडरे यांनी लेखी तक्रार केली होती. याबाबत शैलेश किसनराव खांडरे यांनी “शिरुर तालुका डॉट कॉम” कडे लेखी खुलासा केला असुन सुभाष चौकातील त्या चौकामधील सर्वच बांधकामे ही नगरपरिषदेने दिलेल्या […]

अधिक वाचा..

सहकार चळवळ मोडीत काढण्यासाठीच भाजपाकडून विरोधकांवर ईडीचे छापे

मुंबई: माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यांशी संबंधित ठिकाणांवर ईडीने छापे मारले यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही. भारतीय जनता पक्ष हा सीबीआय, आयकर, ईडी सारख्या तपास यंत्रणांचा विरोधी पक्षांना नाहक त्रास देण्यासाठीच गैरवापर करत असल्याचे देशाने पाहिले आहे. ईडीची आजची छापेमारी ही त्याचाच एक भाग असून सहकार चळवळ मोडीत काढण्यासाठी भारतीय जनता पक्षाचा हा डाव आहे, […]

अधिक वाचा..

महाविकास आघाडी विधानपरिषदेच्या जागा एकत्रित, एकदिलाने लढवेल…

मुंबई: मराठवाडयाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस तर नागपूरची जागा शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, कोकणातील जागा शेतकरी कामगार पक्ष व अमरावती व नाशिक कॉंग्रेस लढवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांना दिली. महाविकास आघाडीची बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे आज पार पडली. या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना जयंत पाटील यांनी […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC तील MEPL कंपनीच्या दूषित पाण्याबाबत ग्रामस्थांची उद्योगमंत्र्याकडे धाव

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील महाराष्ट्र इन्व्हायरो पावर लिमिटेड या कंपनीच्या दुषित पाण्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून निमगाव भोगी येथील शेतकऱ्यांची जमीन नापिक होत असुन अनेक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. तसेच येथील ओढे, नाले, विहिरी बोअरवेल यातील सगळेच पाणी दुषित झाल्याने पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे […]

अधिक वाचा..

आंबेगाव- शिरुर राष्ट्रवादीला रामराम ठोकत विकास शिंदे यांचा भाजप मध्ये प्रवेश

भाजपा ओबीसीच्या मोर्चाच्या शिरुर तालुकाध्यक्षपदी नियुक्ती  शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील बाभुळकर खुर्द येथील आंबेगाव-शिरुर राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे सरचिटणीस विकास शिंदे यांची भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी मोर्चाच्या तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे आंबेगाव-शिरुरच्या 39 गावात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असुन शिंदे हे राष्ट्रवादीचे कट्टर कार्यकर्ते होते. परंतु काही अंतर्गत कारणामुळे त्यांनी राष्ट्रवादीला […]

अधिक वाचा..

रस्ता ओलांडताना बच्चू कडूंचा अपघात

अमरावतीतील एका खाजगी रुग्णालयात बच्चू कडू यांच्यावर उपचार सुरु  मुंबई: मागील काही दिवसांपासून राज्यातील आमदारांच्या अपघाताची मालिकाच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार जयकुमार गोरे, आमदार धनंजय मुंडे, आमदार योगेश कदम यांच्या कारचा अपघात झाला होता. त्यातच आता प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. रस्ता ओलांडताना दुचाकीने बच्चू कडू यांना […]

अधिक वाचा..

शैक्षणिक दिशादर्शिका शिक्षण क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरेल

मुंबई: नियोजन हा यशस्वीतेचा मूलमंत्र आहे. शासकीय कामकाजाचेही संभाव्य नियोजन केले तर त्याचा लाभ प्रशासकीय कामकाज विहीत कालावधीत करण्यासाठी होऊन दर्जेदार शिक्षणाचे आणि आदर्श विद्यार्थी घडविण्याचे आपले उद्दिष्ट साध्य करणे सुलभ होईल. यादृष्टीने ‘शैक्षणिक दिशादर्शिका’ शिक्षण क्षेत्राला दिशा दाखविणारी ठरेल, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला. शालेय शिक्षण मंत्री श्री.केसरकर यांच्या […]

अधिक वाचा..

जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने कामगारांसाठी लढणारा आवाज हरपला; नाना पटोले

मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे ज्येष्ठ नेते व इंटकचे प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश छाजेड हे काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते होते. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी काँग्रेसची विचारधारा सोडली नाही. कामगारांच्या न्याय हक्कासाठी सतत झटणाऱ्या जयप्रकाश छाजेड यांच्या निधनाने काँग्रेसचा सच्चा पाईक व कामगारांसाठी लढणारा आवाज हरपला आहे, अशा शब्दात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या शोकभावना […]

अधिक वाचा..

10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी….

औरंगाबाद: फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणाऱ्या दहावी, बारावी परीक्षेसाठी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व अन्य पूर्ण तयारी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून करण्यात आली आहे. यावेळी दहावी, बारावीच्या परीक्षेत होम सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेली दोन वर्षे कोरोनाची परिस्थिती पाहता शाळा तेथे केंद्र (होम सेंटर) असा निर्णय घेण्यात आला होता. मात्र […]

अधिक वाचा..