ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्यावर लक्ष केंद्रित; राज्यस्तरीय समितीची पहिली बैठक संपन्न

पुणे: गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुर्नगठीत केलेल्या राज्यस्तरीय समितीची पहिली बैठक पुण्यात पार पडली. या बैठकीत जिल्हास्तरीय समित्यांचे स्वरूप लवकरच निश्चित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला, अशी माहिती विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिली. पुणे विधान भवनातील झुंबर सभागृहात झालेल्या या बैठकीत विविध विभागांचे अधिकारी, आमदार आणि आरोग्य तज्ज्ञ […]

अधिक वाचा..

ऊसतोड कामगारांच्या मुलांसाठी बीडमध्ये ११ वसतिगृहे; १५९ कोटींच्या निधीला मंजुरी; सुनेत्रा पवार

बीड: बीड जिल्हा येथे ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यात तब्बल ११ वसतिगृहे उभारण्यास मंजुरी देण्यात आली असून या प्रकल्पासाठी सुमारे १५९ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळाल्याची माहिती खासदार सुनेत्रा पवार यांनी दिली. ऊसतोड हंगामादरम्यान हजारो कुटुंबे स्थलांतरित होत असल्याने मुलांचे शिक्षण खंडित होते. अनेक मुलांना शाळा सोडावी लागते […]

अधिक वाचा..

ऊसतोड मजुरांची जगण्यासाठी धडपड पुस्तकांऐवजी हातात उसाची मोळी

पाबळ (सुनिल जिते): आपण शिक्षणात आघाडी घेतली असली तरी ऊस तोडणी कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित असलेली पाहायला मिळत आहेत. आपले इतभर पोट भरण्यासाठी या कामगारांना आपले गाव सोडून परगावी ऊस तोडणी करण्यासाठी यावे लागते. मात्र, या कामगारांबरोबर त्यांची चिमुरडी मुलेही वणवण भटकताना दिसत आहेत. तर काही मुले आपल्या आई-वडिलांना मदत करताना त्यांच्या हातातील उसाचे भेळे […]

अधिक वाचा..
waghale-sugarcane

Video: वाघाळे येथे शॉर्टसर्किटमुळे दोन एकर ऊस जळून खाक…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथे आज (गुरुवार) दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत दोन एकर ऊस जळून खाक झाला आहे. गणेश बबन गावडे यांच्या शेतात असलेल्या वीज खांबावर अचानक झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे समोर आले आहे. शेतामध्ये काम करत असलेल्या सुनील गावडे यांनी धुराचे लोट दिसताच तत्काळ गावकऱ्यांना फोन करून घटनास्थळी […]

अधिक वाचा..

कवठे येमाई येथे उसाच्या शेतात सापडला मृतदेह; खुन झाल्याचा संशय

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील गांजेवाडी, गणेशनगर परीसरात बुधवारी (दि.२०) सकाळी उसाच्या शेतात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. फाकटे (ता. शिरूर) येथील देवराम नानाभाऊ टेके (वय अंदाजे ५०) यांचा मृतदेह आढळून आला असून त्यांच्या मृत्यूमागे खूनाचा संशय व्यक्त केला जात आहे. हा खुण झाला असेल तर तो कोणत्या कारणामुळे व का करण्यात […]

अधिक वाचा..

शेतकरीपुत्राने तयार केल ऊसभरणी यंत्र; अवघ्या ४५ मिनिटांत उसाचा एक ट्रेलर भरणार

सातारा: दरवर्षीच गाळप हंगामात उसाच्या वाहतुकीची मोठी समस्या असते. कारण, कामगार टंचाईमुळे ऊस वाहतूक वेळेत होत नाही. परिणामी साखर कारखान्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या लक्षात घेऊन सातारा तालुक्यातील रामकृष्णनगरच्या सनी दिलीप काळभोर या शेतकरीपुत्रानेऊस भरणी यंत्राची निर्मिती केली आहे. या यंत्राद्वारे दिवसात ७० ते ७५ टन ऊस भरला जात आहे. सातारा जिल्ह्यात १५ […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात शेतजमिनीवरील उसाची चोरी; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील निमोणे येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे, जिथे एक शेतकरी आपल्या खरेदी केलेल्या शेतजमिनीत गेलेल्या असता, त्याने स्वतः लावलेला ऊस कोणीतरी चोरी करून नेल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी, पुणे येथील रहिवासी ज्योती शिवाजी जाधव (वय ४२) यांनी शिरूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवला आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीप्रमाणे, त्यांनी […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात शेजाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे दुसऱ्या शेतकऱ्याचा ऊस पेटून ५० हजार रुपयांचे नुकसान

शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील फाकटे गावात शेतात पाचट जाळल्याने शेजाऱ्याच्या एक एकर ऊस पिकास आग लागून सुमारे ५०,००० रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात बाळासाहेब धोंडीबा हिंगे आणि त्यांचा मुलगा सचिन बाळासाहेब हिंगे (रा. अवसरी बुद्रुक, ता. आंबेगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. […]

अधिक वाचा..

..म्हणून पराग साखर कारखाना ऊसाला कमीत कमी ३००० रु. भाव देणार

शिरूर (अरुणकुमार मोटे): रावडेवाडी (ता. शिरूर) येथील पराग अॅग्रो फूड्स अॅण्ड़ अलाईड प्रॉडक्ट्स प्रा.लि या साखर कारखान्याने सन २०२४-२५ च्या गळीत हंगामात गाळपास आलेल्या ऊसाला कमीत कमी ३०००/- रु. प्रती टन या प्रमाणे बाजारभाव देणार असल्याची माहिती पराग साखर कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत दळवी यांनी दिली आहे. पराग कारखान्याचे सन २०२४-२५ चे चालू गळीत […]

अधिक वाचा..

ऊस पिकावर थंडीचा परिणाम दिसतोय

अति थंडीचा जास्त कालावधी, हवेतील कोरडेपणा आणि थंड व कोरडे वारे यामुळे पानांतील पेशी निर्जीव होतात. त्यामुळे हा भाग पांढरा किंवा हिरवट पिवळसरच राहतो. हवामान बदलामुळे झालेली ही शारिरिक विकृती आहे. ही समस्या पानापुरतीच मर्यादित राहील, त्याचा संसर्ग इतर पानावर होत नाही. तसेच तापमानात वाढ झाल्यानंतर ही समस्या संपते. अचानकपणे होणाऱ्या हवामान बदलांचा पिकांवर विपरीत […]

अधिक वाचा..