1) भारतातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता आहे?
उत्तर : शेती
2) रोजगार हमी योजना राबवणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : महाराष्ट्र
3) दरडोई सर्वाधिक उत्पन्न असणारे राज्य कोणते?
उत्तर : महाराष्ट्र
4) एक रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते?
उत्तर : वित्त सचिव
5) शंभर रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते?
उत्तर : रिझर्व बँकेचे गव्हर्नर
6) ग्राहक संरक्षण कायदा कोणाच्या काळात राबविला गेला होता?
उत्तर : राजीव गांधी
7) महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना केव्हा झाली?
उत्तर : 1 मे 1962
8) ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो?
उत्तर : ग्रामसेवक
9) ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते?
उत्तर : 7 ते 17
10) जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यामधील महत्त्वाचा दुवा कोणता?
उत्तर : पंचायत समिती
11) जिल्हा परिषदेचे सर्वात महत्त्वाची समिती कोणती?
उत्तर : स्थायी समिती
12) गावात कोतवालाची नेमणूक कोण करते?
उत्तर : तहसीलदार
13) सातबारा उतारा कोण देतो?
उत्तर : तलाठी
14) जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?
उत्तर : जिल्हाधिकारी
15) गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतो?
उत्तर : पोलिस पाटील
16) महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची संख्या किती आहे?
उत्तर : 34
17) सूर्यमालेतील एकूण ग्रह यांची संख्या किती आहे?
उत्तर : आठ
18) पृथ्वीला किती उपग्रह आहेत?
उत्तर : एक