कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळावरील विमानांच्या ‘पार्किंग’ ची सुविधा वाढवा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: नाशिक आणि परिसरातील आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी विमानतळाचे उर्वरित काम नियोजित वेळेत पूर्ण करावे. त्याचबरोबर विमानतळावरील विमानांच्या ‘पार्किंग’च्या सुविधेत वाढ करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) संचालक मंडळाची 92 वी बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. अपर मुख्य सचिव (विमान चालन) संजय सेठी, मुख्यमंत्री […]

अधिक वाचा..
ajit pawar

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हे शिबिर नाही तर पुढच्या पिढीला मार्गदर्शन करणारे; अजित पवार

नागपूर: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी हे शिबिर नाही तर पुढच्या पिढीला मार्गदर्शन करणारे असून धाडसी व ठोस निर्णय घ्यायचे आहे. आजच्या चिंतन शिबिरातून आराखडा तयार करणार आहोत त्याला नागपूर डिक्लेरेशन म्हणून मांडणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चिंतन शिबिरात दिली. लोकांना विश्वास देणे आणि त्यांचे प्रश्न सोडवणे हे महत्वाचे […]

अधिक वाचा..

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या कार्यकारणीची बैठक संपन्न

मुंबई: लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी यांनी दिलेला नारा “वोट चोर, गद्दी छोड“ नुसार आगामी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सजग राहून कार्य करावे तसेच जनसुरक्षा कायदा, जो लोकशाही आणि व्यक्तीस्वातंत्र्याला अत्यंत मारक आहे, त्याविरोधात जनजागृती करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष विलास केशवराव औताडे यांनी केले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या […]

अधिक वाचा..

राज्यातील शासनमान्य ग्रंथालयांचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू

मुंबई: राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या विकासासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सहाय्यक परिक्षण अनुदानाचा पहिला हप्ता थेट ग्रंथालयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, सार्वजनिक ग्रंथालये केवळ पुस्तके ठेवण्याची ठिकाणे नसून समाजातील वाचनसंस्कृती जोपासणारी प्रेरणास्थळे आहेत.या ग्रंथालयांना वेळेवर अनुदान उपलब्ध […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री फणविसांनी निवडणूक आयोगाची दलाली बंद करावी

शंभरी पूर्ण करणाऱ्या रा. स्व. संघाने नथुराम व विखारी विचार सोडून संविधान व गांधी विचार स्विकारावा मुंबई: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी २ ऑक्टोबर रोजी विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला १०० वर्ष पूर्ण होत असून हा नियतीचा एक संकेत आहे. १०० वर्ष पूर्ण करणाऱ्या रा. स्व संघाने आता तरी नथुराम व विखारी विचार सोडून समता, बंधुता […]

अधिक वाचा..

राजकीय नेत्यांवर टीका करावी पण आई वडिलांना शिव्या देणे अयोग्य

मुंबई: राज्य सरकारने काढलेल्या जीआर मुळे ओबीसी समाजाचे नुकसान होत आहे. ओबीसी उपसमितीचे सदस्य असलेले ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे बाहेर एक भूमिका मांडत आहे तीच भूमिका त्यांनी बैठकीत मांडावी. ओबीसी विरोधातील हा शासन निर्णय कोण रद्द करणार, कधी करणार असा सवाल काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. मुंबईत माध्यमांशी […]

अधिक वाचा..

पंकजा मुंडे यांच्या कुणबी प्रमाणपत्र वाटपाबाबत श्वेतपत्रिका काढण्याच्या मागणीवर सरकारने काय कारवाई केली

मुंबई: राज्य सरकारने नियुक्त केलेल्या ओबीसी उपसमितीच्या सदस्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी समितीच्या पहिल्याच बैठकीत आतापर्यंत मराठा समाजाला जे कुणबी, मराठा कुणबी,कुणबी मराठा दाखले दिले त्याची श्वेतपत्रिका काढण्याबाबत समितीचे एकमत झाल्याची भूमिका मांडली आहे. याबाबत सरकारने काय कारवाई केली अशी विचारणा काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर यांनी केली आहे. राज्याचे इतर मागासवर्गीय व बहुजन […]

अधिक वाचा..

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे यांच्या आवाहनाला उदंड प्रतिसाद; वाढदिवसाला आले २५ हजारावर शैक्षणिक साहित्य

मुंबई: आपल्या वाढदिवसानिमित्त हार,पुष्पगुच्छ केक व भेटवस्तू न आणता समाजातील गरजू विद्यार्थ्यांना देण्यासाठी शैक्षणिक साहित्य घेऊन यावे या विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ . नीलम गो-हे यांनी केलेल्या आवाहनाला त्यांच्या चाहत्यांनी उदंड प्रतिसाद दिला असून २५ हजाराच्यावर शैक्षणिक साहित्य आल्याची माहिती गोऱ्हे यांच्या कार्यालयाकडून मिळाली आहे .दरम्यान डॉ गोऱ्हे यांनी आवाहन केलेल्या या शैक्षणिक उपक्रमाची राज्यभर चर्चा […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करावा; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी

मुंबई: राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने तब्बल ३० जिल्ह्यात नुकसान झाले आहे. राज्यातील १७ लाख ८५ हजार ७१४ हेक्टर इतके क्षेत्र या पावसाने बाधित झाले आहे. आधीच शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही त्यात शेतातील पीक देखील हातातून गेले आहे. त्यामुळे बळीराजा अडचणीत आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना राज्य सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी काँग्रेस […]

अधिक वाचा..