loni nagpanchami

नागपंचमी निमित्त रंगला कलगी-तुरा…

मंचर (कैलास गायकवाड): लोणी (ता. आंबेगाव) येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतीक भवन बाजार तळ येथे नागपंचमी निमित्त आज (मंगळवार) शाहीर रामदास गुंड सूर्यावाले विरुद्ध शाहीर नासाहेब साळुंखे तुरेवाले यांच्यात हा महाराष्ट्रातील भव्य कलगीतुरा सामना रंगला होता. गेली दोन वर्षे कोरोना महामारीमुळे हा कलगीतुरा कार्यक्रम झाला नव्हता. त्यामुळे यावर्षी कलगीतुरा शोकिनांनी मोठी गर्दी केली होती. […]

अधिक वाचा..
cng

पेट्रोल आणि डिझेलपेक्षा सीएनजी महाग…

नागपूर : पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे इंधनाचा स्वस्त पर्याय म्हणून सीएनजीकडे पाहिलं जात होते. मात्र, सीएनजीच्या दरातही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. नागपूरमध्ये CNG दराचा उडाला भडका आहे. कारण नागपुरात सीएनजी पेट्रोल-डिझेलपेक्षाही महाग विकले जात आहे. नागपूरमध्ये आजचा CNG चा दर हा 116 रुपये प्रति किलो आहे. तर पेट्रोलचा दर हा 106 रुपये 5 पैसे व […]

अधिक वाचा..
Gas Cylinder

गॅस सिलेंडर झाले एवढे स्वस्त: जाणून घ्या किमती

मुंबई: LPG सिलिंडरचे नवे द आले आहेत. LPG सिलिंडरच्या किमतीत 1 ऑगस्टपासून कपात करण्यात आली आहे. आज गॅस सिलिंडरच्या दरात 36 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. या किमती दिल्ली, मुंबई ते चेन्नई आणि देशातील इतर सर्व शहरांमध्ये लागू आहेत. व्यावसायिक सिलिंडरवर LPG सिलिंडरमध्ये दिलासा दिला जातो. इंडियन ऑइलने जारी केलेल्या नवीन दरानुसार, आता दिल्लीत 19 […]

अधिक वाचा..

जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी प्रयत्न गरजेचे: डॉ. श्रीपाल सबनीस

मुंबई: देशासह राज्यात जातीव्यवस्था वाढत आहे. जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी मराठा समाजाने पुढाकार घेण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी प्रबोधन शिबिरे घेऊन सर्वांनी प्रयत्न करायला हवे’, असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्‍त केले. संस्कृती प्रकाशन संस्थेतर्फे प्रा. उद्धव हरिभाऊ कोळपे लिखित “क्षात्रधर्म व मराठा’ या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. सबनीस यांच्या […]

अधिक वाचा..
kalgitura

नागपंचमीच्या दिवशी कलगीतुऱ्याचे आयोजन…

मंचर (कैलास गायकवाड): लोणी (तालुका आंबेगाव) येथे नागपंचमीच्या दिवशी कलगीतुराचे आयोजन दरवर्षी केले जाते. येत्या मंगळवारी नागपंचमीला २/८/२०२२ रोजी कार्यक्रमाचे आयोजन ग्रामस्थांनी केले आहे. कलगीतुरा स्थापना सुरुवात सन १९९३ झाली. आंबेगाव, जुन्नर, खेड, शिरूर, श्रीगोंदा, पारनेर आदी भागातून मोठ्या प्रमाणावर श्रोतेवर्ग उपस्थित राहत असतात. महाराष्ट्रातील सर्वात मोठा कलगीतुरा लोणी (तालुका आंबेगाव जिल्हा पुणे) या ठिकाणी […]

अधिक वाचा..
Eknath Shinde and Nathabhau Shewela

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या: नाथाभाऊ शेवाळे

रांजणगाव गणपती (तेजस फडके): महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई द्या, अशी मागणी महाराष्ट्र जनता दल (सेक्युलर) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली आहे. महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस चालू आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभर अतिवृष्टी होऊन राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीचे, फळझाडे, […]

अधिक वाचा..
Shivajirao Adhalrao Patil

शिवाजीराव आढळराव पाटील यांना हात-पाय तोडण्याची धमकी…

खेड (पुणे) : शिरूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे एकनाथ शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा पुतळा जाळून अश्लील भाषेत शिवीगाळ केली. लांडेवाडी येथील घरी जाऊन हात-पाय तोडण्याची धमकी दिली. याप्रकरणी 17 जणांवर खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी गणेश सांडभोर, राम गावडे, महेंद्र घोलप, अमोल विटकर, […]

अधिक वाचा..
Petrol

सिलेंडरनंतर सीएनजी, पीएनजीही महागले; पेट्रोल-डिझेलचे दर पाहा…

मुंबई: इंधनाच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत असून, सर्वसामान्य नागरिकांचे महागाईमुळे हाल होऊ लागले आहेत. महानगरकडून पुन्हा एकदा सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सीएनजी 4 तर पीएनजी 3 रुपयांनी महाग झाले आहे. ही दरवाढ मंगळवारी (ता. १२) मध्यरात्रीपासून लागू करण्यात आली आहे. दरम्यान, गेल्या 24 तासांत जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय […]

अधिक वाचा..
vote

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षणाबाबत मोठी बातमी…

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या आरक्षण सोडत कार्यक्रमास स्थगिती मुंबई : राज्यातील 25 जिल्हा परिषदा व त्यांतर्गतच्या 284 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी देण्यात आलेला आरक्षण सोडत कार्यक्रम सर्वोच्च न्यायालयात आज (मंगळवार) झालेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर स्थगित करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीनंतर राज्य निवडणुक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे […]

अधिक वाचा..

माजी महिला सरपंचाच्या दुर्देवी मृत्यूने गावात हळहळ…

मंचर: आंबेगाव तालुक्यातील जवळी गावात कौलारू छप्पर अंगावर कोसळल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. रंगुबाई धोंडीभाऊ काळे (वय 46) असे मृत्यू झालेल्या महिलेची नाव आहे. रंगुबाई काळे या जवळी गावच्या माजी सरपंच होत्या. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वदूर जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसातच ही घटना घडली. रंगुबाई काळे या ठाकर समाजाच्या […]

अधिक वाचा..