Salt

आयोडीनयुक्त मिठाचे फायदे…

आरोग्य

आयुर्वेदानुसार समुद्राच्या पाण्यापासून बनणाऱ्या मीठात सर्वात कमी गुणधर्म आहेत. सैंधव व काळे मीठ सर्वश्रेष्ठ आहे. निसर्गाने ज्या ज्या गोष्टी केल्या त्या सर्वच अचूक व उपयोगी आहेत. सैंधव व काळे मीठ ह्या पासुन शरीराला ९४ पोषक तत्व मिळतात. तर आयोडीनयुक्त मीठातुन फक्त ३ प्रकारची पोषक तत्व मिळतात.

दही व दूधासोबत मीठ खाल्ले तर काय होते…?
१) अनेकजण जेवणात दूध व दूधापासुन बनलेले पदार्थ घेतात. तसेच चहा-कॉफी सोबतही तिखट मीठाचे पदार्थ खातात. दूध व दह्यासोबत आयोडीनयुक्त मीठ खाण्याने अनेक आजार होतात. तेच जर दही व दूधासोबत सैंधव खाल्ले तर शरीरात दोष वाढत नाहीत.
२) दही खाताना त्यात सैंधव/काळे मीठ जरुर मिसळून खावे. म्हणजे दह्याचा आंबटपणा बाधत नाही.
३) दूध व दूग्धजन्य पदार्थांची चव वाढवी ह्यासाठी त्या पदार्थात किंचीतसे अगदी चिमूटभर मीठ टाकले जाते. असे गोड चविष्ट खायचे असल्यास ते सैंधव/काळे मीठ घातलेले खावे. उदा. गाजर हलवा, तांदुळाची खीर, रव्याची खीर इ.

दह्यात आयोडीन-मीठ घातल्यास दह्यातील आवश्यक सर्व जीवाणू मरतात. तेच जर सैंधव/काळे मीठ घातल्यास एकही जीवाणू मरत नाही. ह्यासाठी दही किंवा दही रायते बनवताना सैंधव/काळे मीठच घालावे.

(सोशल मीडियावरुन साभार)