भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: “येळकोट येळकोट जय मल्हार!” या घोषणेने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात भक्तिभाव जागा होतो. मात्र आज एक गंभीर प्रश्न उभा राहिला आहे—खंडोबाच्या नावाने उधळला जाणारा भंडारा खरोखर शुद्ध हळदीचा असतो की रसायनांचा? महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या खंडोबाच्या चरणी शतकानुशतके हळद अर्पण करण्याची परंपरा आहे. पण अलीकडच्या काळात बाजारात विकल्या […]

अधिक वाचा..

घरबसल्या तपासा पीएम आवास ग्रामीण योजनेतील तुमचे नाव; नवीन निधी वितरणाला मंजुरी

औरंगाबाद: ग्रामीण भागातील गरीब, शेतकरी, शेतमजूर आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना स्वतःचे हक्काचे पक्के घर मिळावे, या उद्देशाने केंद्र सरकारकडून Pradhan Mantri Awaas Yojana Gramin (PMAY-G) राबवली जात आहे. राज्य सरकारने घरकुल लाभार्थ्यांसाठी नवीन निधी वितरणाला मंजुरी दिली असून, थकीत हप्ते लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रखडलेली घरकुल बांधकामे पूर्ण होण्यास गती मिळणार […]

अधिक वाचा..

दादा, जरा फोन बघाल का? माणुसकीच्या नावाखाली नवी डिजिटल फसवणूक; नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन

मुंबई: आजच्या डिजिटल युगात ऑनलाइन व्यवहार, व्हिडिओ KYC आणि बायोमेट्रिक पडताळणी यांचा वापर झपाट्याने वाढत असताना सायबर गुन्हेगारांनीही फसवणुकीच्या नव्या पद्धती शोधल्या आहेत. “दादा, जरा फोन बघाल का?”, “OTP वाचून सांगा”, “फेस स्कॅन करा” अशा विनंत्यांच्या माध्यमातून नागरिकांची बायोमेट्रिक माहिती, आवाज आणि चेहऱ्याचे तपशील चोरून आर्थिक फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत. सायबर […]

अधिक वाचा..

शिरूर! सुलभ भिशीच्या नावाखाली पोलीस व नागरिकांना तब्बल ३० कोटींचा गंडा?

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात सध्या एकाच चर्चेला उधाण आले आहे. “सुलभ भिसी”च्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या एका महिलेचा कथित कारनामा समोर येत असून, यात बडे पोलिस अधिकारी–कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचेही तब्बल ३० कोटी रुपयांपर्यंत नुकसान झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. कारेगाव पोलिस स्टेशनमध्ये रोजची हजेरी, पोलिसांशी सलगी, अधूनमधून जेवणावळी, वारंवार भेटीगाठी अशा पद्धतीने संबंधित […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात भिसीच्या नावाखाली अनेक पोलिसांनाच गंडा; लाखो रुपयांचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात भिसी (चिट फंड) योजनेच्या नावाखाली महिला व पुरुष पोलिस कर्मचारी तसेच काही पोलिस अधिकाऱ्यांकडून विश्वास संपादन करून लाखो रुपये गोळा करून अनेकांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात काही पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांनीही पैसे  गुंतवल्याची माहिती समोर येत आहे.या प्रकरणामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून पोलिस दलातही […]

अधिक वाचा..

‘माझ्या बायकोचे नाव जिनिलिया आहे, जेनेलिया नाही; रितेश देशमुख यांचा खुलासा

मुंबई: मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवणारा अभिनेता रितेश देशमुख सध्या दोन कारणांमुळे चर्चेत आहे. एकीकडे तो ‘राजा शिवाजी’ या ऐतिहासिक चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असून त्याचा लूक समोर आला आहे; तर दुसरीकडे त्याने पत्नीच्या नावाबाबतचा गैरसमज दूर केला आहे. रितेशची पत्नी जिनिलिया देशमुख हिला अनेकदा ‘जेनेलिया’ असे संबोधले जाते. मात्र एका […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीचा मुहूर्त ठरला; सुनेत्रा पवार यांच्या नावाला पुण्यातून एकमताने पाठिंबा

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया अखेर सुरू होणार आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अध्यक्ष निवडीचा औपचारिक कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेनुसार, राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त झाल्यास पक्षाच्या अधिकृत यंत्रणेला ठरावाद्वारे नव्या अध्यक्षाची निवड करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार सुनेत्रा पवार यांच्या […]

अधिक वाचा..

चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेसचा तिढा सुटला! राजेश अडूर गटनेते, उपमहापौरपदी वसंत देशमुखांचा अर्ज

नागपूर: चंद्रपूर महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षातील सुरू असलेला तिढा अखेर सुटला आहे. काँग्रेसचे गटनेते म्हणून राजेश अडूर यांची नियुक्ती करण्यात आली असून उपमहापौरपदासाठी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार गटाचे वसंत देशमुख यांनी अर्ज दाखल केला आहे. आज सायंकाळी पाच वाजता काँग्रेसची अधिकृत गटनोंदणी होणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर महापालिकेतील काँग्रेस […]

अधिक वाचा..

‘द अजित पवार’ मध्ये कोण साकारणार मुख्य भूमिका? स्वतः अजित दादांनी सांगितलेलं नाव; म्हणाले…

मुंबई: महाराष्ट्राला चार दिवसांपूर्वी हादरवणारी घटना घडली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले आणि संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला. त्यांच्या अचानक जाण्याने समर्थकांसह राजकीय विरोधकही भावुक झाले आहेत. अशातच अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांचा एक जुना व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अजित पवार आपल्या संभाव्य बायोपिकबाबत बोलताना […]

अधिक वाचा..

न्यायाच्या नावाखाली हिंसक आणि अमानवी भाषेला प्रोत्साहन देता येणार नाही; डॉ. नीलम गोऱ्हे

संविधान व मानवी अधिकारांच्या चौकटीत दखल आवश्यक; डॉ. नीलम गोऱ्हे यांची ठाम भूमिका मुंबई: भंडारा येथे आयोजित एका गायनाच्या कार्यक्रमात गायिका अंजली भारती यांनी बलात्कारासारख्या अतिशय संवेदनशील विषयावर भाष्य करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबाबत वापरलेली निंदनीय व आक्षेपार्ह भाषा अत्यंत अस्वस्थ करणारी असून ती कोणत्याही परिस्थितीत समर्थन करण्याजोगी नाही, अशी ठाम […]

अधिक वाचा..